शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

नोंद आठ लाख मजुरांची, कामावर केवळ पाच हजार

By admin | Updated: September 22, 2016 01:31 IST

जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असली तरी, कामासाठी लागणारे हात अपुरे आहेत. शासनदरबारी आठ लाख मजुरांची नोंद असताना कामावर केवळ पाच लाख मजूर राबत आहे.

कुशल कारागिरांची वाणवा : कामाप्रती वाढतेय उदासीनतारूपेश उत्तरवार यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असली तरी, कामासाठी लागणारे हात अपुरे आहेत. शासनदरबारी आठ लाख मजुरांची नोंद असताना कामावर केवळ पाच लाख मजूर राबत आहे. त्यातही कुशल कारागिरांचा तुटवडा आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणारा वर्ग कमी झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. कामाप्रती असलेली उदासीनता यानिमित्ताने पुढे आली आहे.प्राचीन ग्रंथात व्यक्तींच्या चांगल्या कर्मासाठी त्याचे हात महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. याकरिता एक संस्कृत सुभाषित प्रचलित आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, क रमुले तु गोविंद:, प्रभाते कर दर्शनम्’. याचा अर्थ आपल्याला लक्ष्मीची म्हणजेच पैशाची प्राप्ती व्हावी म्हणून कुठल्याही तंत्र, मंत्र अथवा आराधनेची आवश्यकता नाही. आपल्या दोन हातांनी काम केले तर, दोन पैसे नक्की मिळतील. विद्या प्राप्त करायची असेल तर हाताने पुस्तके वाचली पाहिजे. यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महराजांनी कष्टकऱ्यांना ग्रामगीता अर्पण केली. आपल्या भजनात कामातच राम असल्याचे सुतोवाच करीत काम करण्याचा संदेश प्रत्येकांना दिला.मात्र कामात राम शोधणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. आजची पिढी शिक्षित आहे. मात्र ती दोन पैसे कमविण्यासाठी नोकरीच्या मागे धावत आहे. स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय उभारण्यासाठी ते तयार नाही. द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना बँका कर्ज द्यायला तयार नाही. स्थानिक कामगारांच्या बाबतीत हे चित्र अधिक आहे. रोजगार हमी योजनेत १०० दिवसांचा रोजगार पक्का आहे. रोजगार न मिळाल्यास हप्ता देण्याची हमी होती. यामुळे जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार २५७ लोकांनी काम हवे आहे म्हणून जॉबकार्ड काढले. प्रत्यक्षात उपलब्ध झालेल्या ४६ हजार कामावर जाण्यासाठी मजूर तयार नाहीत. केवळ योजनेचा लाभ लाटण्यासाठी या नोंदी झाल्या असाव्या असाही अर्थ यातून काढला जात आहे. रोहयोमध्ये सेल्फवरची कामे उपलब्ध आहेत. त्याची मजूरीही चांगली आहे. यानंतरही मजूर कामावर जात नाही. सध्या चार हजार ३१३ मजूर काम करीत आहे. उन्हाळयात हा आकडा दोन लाखांपर्यंत पोहोचतो. मात्र सहा लाख मजूर समोरच येत नाही.