शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नोंद आठ लाख मजुरांची, कामावर केवळ पाच हजार

By admin | Updated: September 22, 2016 01:31 IST

जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असली तरी, कामासाठी लागणारे हात अपुरे आहेत. शासनदरबारी आठ लाख मजुरांची नोंद असताना कामावर केवळ पाच लाख मजूर राबत आहे.

कुशल कारागिरांची वाणवा : कामाप्रती वाढतेय उदासीनतारूपेश उत्तरवार यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असली तरी, कामासाठी लागणारे हात अपुरे आहेत. शासनदरबारी आठ लाख मजुरांची नोंद असताना कामावर केवळ पाच लाख मजूर राबत आहे. त्यातही कुशल कारागिरांचा तुटवडा आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणारा वर्ग कमी झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. कामाप्रती असलेली उदासीनता यानिमित्ताने पुढे आली आहे.प्राचीन ग्रंथात व्यक्तींच्या चांगल्या कर्मासाठी त्याचे हात महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. याकरिता एक संस्कृत सुभाषित प्रचलित आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, क रमुले तु गोविंद:, प्रभाते कर दर्शनम्’. याचा अर्थ आपल्याला लक्ष्मीची म्हणजेच पैशाची प्राप्ती व्हावी म्हणून कुठल्याही तंत्र, मंत्र अथवा आराधनेची आवश्यकता नाही. आपल्या दोन हातांनी काम केले तर, दोन पैसे नक्की मिळतील. विद्या प्राप्त करायची असेल तर हाताने पुस्तके वाचली पाहिजे. यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महराजांनी कष्टकऱ्यांना ग्रामगीता अर्पण केली. आपल्या भजनात कामातच राम असल्याचे सुतोवाच करीत काम करण्याचा संदेश प्रत्येकांना दिला.मात्र कामात राम शोधणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. आजची पिढी शिक्षित आहे. मात्र ती दोन पैसे कमविण्यासाठी नोकरीच्या मागे धावत आहे. स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय उभारण्यासाठी ते तयार नाही. द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना बँका कर्ज द्यायला तयार नाही. स्थानिक कामगारांच्या बाबतीत हे चित्र अधिक आहे. रोजगार हमी योजनेत १०० दिवसांचा रोजगार पक्का आहे. रोजगार न मिळाल्यास हप्ता देण्याची हमी होती. यामुळे जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार २५७ लोकांनी काम हवे आहे म्हणून जॉबकार्ड काढले. प्रत्यक्षात उपलब्ध झालेल्या ४६ हजार कामावर जाण्यासाठी मजूर तयार नाहीत. केवळ योजनेचा लाभ लाटण्यासाठी या नोंदी झाल्या असाव्या असाही अर्थ यातून काढला जात आहे. रोहयोमध्ये सेल्फवरची कामे उपलब्ध आहेत. त्याची मजूरीही चांगली आहे. यानंतरही मजूर कामावर जात नाही. सध्या चार हजार ३१३ मजूर काम करीत आहे. उन्हाळयात हा आकडा दोन लाखांपर्यंत पोहोचतो. मात्र सहा लाख मजूर समोरच येत नाही.