शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:05 IST

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले.

ठळक मुद्दे मुकुटबन परिसरातही दोन बछडे वास्तव्याला

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. वाघांची ही वाढती संख्या भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षाची नांदी ठरू शकते. त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजनांची गरज असून सोलर फेनसिंग हा त्यावरील प्रभावी उपाय ठरण्याची शक्यता आहे.जंगलात आढळणारा पट्टेदार वाघ, हा तेथील वनसंपदा परिपूर्ण असल्याचे द्योतक मानले जाते. सुदैवाने संपूर्ण जग वाघाच्या प्रजातीला वाचविण्यासाठी धडपडत असताना जिल्ह्यातील पांढरकवडा उपवनविभागात १२ पट्टेदार वाघ आहेत. तसेच दहा नवीन पिलसुद्धा जन्माला आली आहे. वाघाला अनुकूल असे वातावरण आहे. यातूनच वाघांची संख्या वाढत असल्याचे मागील काही वर्षात दिसून येत आहे.

शेती करणे झाले कठीणवाघांची संख्या वाढत असताना त्यांचे संचार क्षेत्रही वाढले आहे. टिपेश्वर अभयारण्याबाहेरही वाघांचे वास्तव्य असल्याच्या अनेक खुणा दिसत आहे. मुकुटबन परिसर त्याचप्रमाणे राळेगाव तालुक्यातील सराटी, बंदर येथेही मागील काही दिवसांपासून मानव आणि वाघ, असा संघर्ष पेटला आहे.

सोलर कंपाऊंडचा प्रस्तावएकीकडे ‘इकोटुरिझम’चा ओढा वाढत असून कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याचा बातम्यांचा प्रसार व प्रचार होत आहे. यातून वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे. निसर्गाशी पूरक असलेले वन्यजीव व शेतकरी या दोघांच्याही संघर्षाला टाळण्यासाठी उपाययोजनेची खरी गरज निर्माण झाली आहे.

वाघ-मनुष्य संघर्ष पेटला, शेतकऱ्यांत दहशतया सुवार्तेसोबतच मनुष्य व वाघ असा संघर्षही पेटला आहे. राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगल परिसरात वाघाने तब्बल ११ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे वाघ वाचवीत असताना मानवाचे संरक्षण, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. जंगल भागाला लागून उदर भरणासाठी शेती करणारा गरीब शेतकरी वाढती वाघाची संख्या संकट समजतो आहे. यातून जनक्षोभही उसळत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे.

वाघाच्या संवर्धनासाठी एनटीसीएकडून दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजना कोणत्या राहतील, अशी विचारणा झाली होती. सोलर फेनसिंग हा उत्तम पर्याय असल्याची मागणी केली आहे.- डॉ.विराणीवन्यजीव रक्षक, पांढरकवडा

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य