शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

पोरांनो, शाळेत न जाताही घ्या शालेय शिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 15:59 IST

महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळविण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे.

ठळक मुद्देमुक्त विद्यालय मंडळराज्यात अमलबजावणी सुरू अमरावती विभागात होणार ५६ संपर्क केंद्र

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळविण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली असून चालू शैक्षणिक सत्रात त्याची अमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती विभागात तब्बल ५६ संपर्क केंद्रही उघडली जाणार आहेत.गरिबी, आजारपण किंवा इतर विविध कारणांनी अनेकांचे शालेय शिक्षण अर्धवट राहते. तर काही विशिष्ट आजारग्रस्त विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी मुक्त विद्यालय मंडळाच्या निमित्ताने सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाशीच हे मंडळ संलग्न असल्याने अभ्यासक्रमात फारसा फरक राहणार नाही. घरीच अभ्यास करून मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा देऊन वंचितांना आपले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा देताना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शैक्षणिक साहित्यही मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाने यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या पाचही जिल्ह्यात मुक्त विद्यालय मंडळाचे संपर्क केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबवित असलेल्या शाळांमध्येच हे केंद्र उघडले जाणार आहे.प्रत्येक तालुक्यात किमान एक संपर्क केंद्र दिले जाणार आहे. त्यानुसार अमरावतीत १४, यवतमाळात १६, बुलडाण्यात १३, अकोला ७ आणि वाशीम जिल्ह्यात ६ संपर्क केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, एका केंद्रावर ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यास त्या तालुक्यात दोन संपर्क केंद्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची मुक्त विद्यालय मंडळात नोंदणी करून घेणे, गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचे परीक्षा अर्ज भरून घेणे, त्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र देणे आदी कामे या संपर्क केंद्रात होणार आहेत. शिवाय, दर शनिवारी आणि रविवारी येथे प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील अडचणीही सोडवून घेता येणार आहे.प्रौढांनाही संधीअनेकांच्या नशिबी दोन वेळच्या जेवणासाठी बालपणापासूनच मजुरी येते. पोटासाठी शाळा सुटते. वय वाढल्यावर गुणवत्ता असूनही शिकता येत नाही. शाळेत जाऊन बसावे तर ‘लोक काय म्हणतील’ हा न्यूनगंडही सतावतो. अशा प्रौढ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालयामुळे शाळेत न जाताही अगदी पहिलीपासून बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य होणार आहे. तर शहरांमध्ये वाढत असलेल्या ‘होम स्कूलींग’प्रमाणे ग्रामीण पोरांनाही मुक्त विद्यालयामुळे शाळेत न जाता शिकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी संपर्क केंद्र उघडली जाणार असून त्यासाठी शाळांची नोंदणी करण्याचे आदेश विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र