शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’मुळे झाले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:14 IST

जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यातच बदल : तासन्तास चालणाऱ्या बैठका अर्ध्या तासात पूर्ण, जिल्हाधिकाºयांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे. पूर्वी मुख्यालयात तासन्तास चालणाºया आढावा बैठका आता अर्ध्या तासात आटोपून खºया अर्थाने कामासाठी वेळ दिला जात आहे. यामुळे संगणकीकृत गाव शेततळे, नरेगाची वेळेत मजुरी, अशा विविध योजनांनी गती पकडली आहे.जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा काही दिवसापूर्वी प्रचंड दबावात व तणावात कार्यरत होती. यामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला होता. जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारताच यंत्रणेत सहकार्याची भावना निर्माण करून कामकाजाची गती वाढविण्यास प्रोत्साहन दिले. संगणकीकृत गाव यामध्ये सप्टेंबरपर्यंत केवळ ७९९ गावे झाली होती. आता केवळ तीन महिन्यात दोन हजार ८५ गावे रिएडीट आज्ञावलीअंतर्गत संगणकीकृत झाली. यात जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला.शेततळे निर्मितीसाठी एसडीओंनी पुढाकार घेतला असून तीन महिन्यात २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्डची पडताळणी पूर्ण करून मजुरी वितरण नियमित केले आहे. बीएलओच्या कामाला शिक्षकांनी विरोध केला होता. मात्र यात जिल्ह्याने इतर पाच मतदारसंघाच्या तुलनेत आघाडी घेतली असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडून शाबासकी मिळाली.प्रत्येक सोमवारी आढावा बैठक होत असून ठळक मुद्यांवरच आवश्यक ते निर्देश देऊन निकाली काढली जाते. महत्त्वाच्या मुद्यांवर तालुका व उपविभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना बोलविण्याऐवजी ‘व्हीसी’व्दारे आढावा घेतला जातो. यामुळे सर्वच घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.तहसील कार्यालय व इतर यंत्रणेतील पेंडन्सी दूर करण्यासाठी कर्मचाºयांना प्रोत्साहित केले असून आठवड्यातील सुट्यांच्या दिवशी जुने काम हातावेगळे केले जात आहे. महिला वर्गही या मिशनमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाला आहे.निवेदन घेऊन येणाऱ्यांसाठी अर्जंट रेफरन्सछोट्याछोट्या समस्या घेऊन सामान्य नागरिक जिल्हा मु्ख्यालयी येतात. त्यांचे अर्ज, निवेदने निकाली काढण्यासाठी ‘अर्जंट रेफरन्स’ हे सॉफ्टवेअर विकसित केले असून संकीर्ण अंतर्गत नोंद घेतली जाते. प्रत्येक दिवशी त्या विभागाकडे अर्जाच्या पूर्ततेबाबत पाठपुरावा होतो.प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी छोटे छोटे फेरबदल केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून तीन महिन्यांतच जिल्हा राज्य पातळीवर पहिल्या पाचमध्ये आहे. यासाठी कर्मचारी व अधिकाºयांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.’- डॉ.राजेश देशमुख,जिल्हाधिकारी, यवतमाळ