शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पुसद शहरात लॉकडाऊनच्या काळात भूजल संरक्षण कायद्याला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

भूजल सर्वेक्षण कायद्यानुसार नागरिकांना विहीर, कूपनलिका खोदायची असल्यास शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी देताना संबंधित यंत्रणा त्या लगतचा परिसर कोरडा होणार नाही, याची दक्षता घेते. शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी दिली जाते. यात विशिष्ट अंतराच्या आत दुसऱ्या विहीर व कूपनलिकेला परवानगी मिळत नाही.

ठळक मुद्देबोअरसाठी ५०० फूट खोदकाम । नगरपरिषद व संबंधित विभागाचे दुर्लक्ष

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात पारा ४३ ते ४५ अंशावर पोहोचला आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल जात आहे. परिणामी शहर व तालुक्यात सर्वत्र बोअर मारण्याचा सपाटा सुरू आहे. त्यासाठी ५०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. यात भूजल संरक्षण कायद्याला तिलांजली दिली जात असताना बोअरचालकांवर कोणतीही कारवाई होत नाही.भूजल सर्वेक्षण कायद्यानुसार नागरिकांना विहीर, कूपनलिका खोदायची असल्यास शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी देताना संबंधित यंत्रणा त्या लगतचा परिसर कोरडा होणार नाही, याची दक्षता घेते. शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी दिली जाते. यात विशिष्ट अंतराच्या आत दुसऱ्या विहीर व कूपनलिकेला परवानगी मिळत नाही. मात्र कोरोना संकटाच्या काळात शहर व तालुक्यात बोअर खोदकामाला जोर आला आहे. भूजल सर्वेक्षणाच्या नियमांना तिलांजली देत बोअर मशीनचालक वाटेल तेवढे खोदकाम करीत आहे. शासनाकडून परवानगी घेण्याची जबाबदारी आमची नसल्याचे सांगून त्यांची मनमानी सुरू आहे.जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने शहर व तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकरी बोअर मारतात. पाणी लागण्याची खात्री असलेल्या ठिकाणीच बोअर मारले जाते. तथापि त्या जागेची भूजल सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून तपासणी होणे गरजेचे असते. त्याला बगल देत बोअरचालक मनमानीपणे खोदकाम करीत आहे. शहर व तालुक्यातील अनेक गावात हा धिंगाणा सुरू आहे. अनेकदा रात्री खोदकाम होत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. अनेक ठिकाणी चक्क ५०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. वास्तविक २०० फुटानंतर दूषित पाणी असते. त्यात जादा क्षार असतात. ते पाणी पिण्यायोग्य नसते. तरीही बोअरचालक मनमानीपणे ५०० फुटापर्यंत खोदकाम करीत आहे.महसूल व कर बुडतो पाण्यातकोणतीही परवानगी घेतली जात नसल्याने शासनाचा महसूल आणि विविध विभागांचा कर पाण्यात बुडत आहे. बोअरला परवानगी देण्याचे काम यवतमाळच्या भूजल सर्वेक्षण विभागाकडे आहे. त्यांचेच त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे पालिकेचा याच्याशी संबंध नसल्याचे मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी