शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

साठेबाजींमुळे डाळींचे दर भिडले गगनाला

By admin | Updated: May 8, 2015 23:57 IST

शेतकऱ्यांपासून कवडीमोल भावात तूर विकत घेतल्यानंतर आता मात्र साठेबाजी करून तूर व इतर डाळींचे भाव ....

‘विजस’चा आरोप : शासनाने ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणीयवतमाळ : शेतकऱ्यांपासून कवडीमोल भावात तूर विकत घेतल्यानंतर आता मात्र साठेबाजी करून तूर व इतर डाळींचे भाव वाढविण्यात आले आहे. यातून सर्वसामान्यांची लूट सुरू असून शासनाने ती त्वरित थांबविण्यासाठी कठोर पाडले उचलावीत अशी मागणी, विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे. मागील जानेवारी ते मार्चमध्ये शेतकऱ्यांनी आपली तूर जेमतेम ५ हजार रुपये भावात विकल्यानंतर आता तुरीचे भाव सात ते आठ हजारांवर जात असून महिन्यापूर्वी किरकोळ दर ७५ ते ८० रुपये असलेली तूर डाळ आता थेट १०५ रुपयांवर पोहोचली आहे. या प्रचंड दरवाढीच्या फटका ग्राहकांना सोसावा लागत असून डाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील दहा दिवसात साठेबाजी करणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांनी कृत्रिमपणे ही प्रचंड वाढ सर्वच डाळींमध्ये केली आहे. सरकारने शेतकऱ्यांची मंदीच्या नावावर पडेल किंमतीमध्ये सारी तूर विकत घेऊन आता मार्चमध्ये कोसळलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे कारण समोर करून तूर, चणा, वाटाणा, मसूर, मूग आदीच्या दरात बाजारात अचानकपणे झालेली वाढ व्यापारी कटाचा भाग असून सरकारने गरिबांची व जनतेची लूट थांबविण्यासाठी साठेबाजारी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी व गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीमधून तूर डाळीचे वाटप ४० रुपयांप्रमाणे सुरु करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)किरकोळ दर आणखी वाढण्याची शक्यतामागील महिन्याच्या शेवटी बाजारात तूर डाळ दजार्नुसार प्रति क्विंटल ८ हजार २०० ते ९ हजार ५०० रुपयांपर्यंत होती. आता मात्र किरकोळ दर १०० रुपयांवर पोहोचल्याने गरीब, मध्यमवर्गियांनी तूर डाळीची खरेदी थांबविली आहे. त्याऐवजी वाटाणा डाळ आणि लाखोळी डाळीची खरेदी वाढविली आहे. ठोकमध्ये वाटाणा डाळ प्रति क्विंटल ३ हजार ते साडेतीन हजार रुपये, बटरी डाळ ४ हजार दोनशे ते साडेचार हजार रुपये आणि लाखोळी डाळ ३ हजार १०० ते ३ हजार ३५० रुपये आहे. या डाळींना मागणी वाढल्याने यांच्या किंमतीमध्येही दररोज वाढ होत आहे. सरकारने वेळीच कारवाई न केल्यास या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची भिती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.