शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

भीषण पाणीटंचाईतही बांधकामे जोरात

By admin | Updated: May 27, 2016 02:08 IST

पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय

खासगी आणि शासकीयसुध्दा : नगरपरिषद-प्राधिकरण मेहेरबान यवतमाळ : पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय आणि खासगी बांधकामांवर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उच्च न्यायालयाने दुष्काळी भागात बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले असले तरी यवतमाळ शहरात मात्र ठिकठिकाणी बांधकाम सुरू आहे. यवतमाळ शहरात कधी नव्हे ती यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निळोणा धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच धरण कोरडे पडले आहे. शहरात आठ दिवसाआड तेही जेमतेम पाणी मिळत आहे. शहरातील बहुतांश खासगी बोअरवेल आणि नगर परिषदेच्या मालकीचे बोअरवेलही कोरडे पडले आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी हाच चर्चेचा विषय आहे. थेंब न् थेंब साठविण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील बहुतांश भागात बांधकामांचा सपाटा आहे. यात शासकीय आणि खासगी बांधकामांचा समावेश आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर कंत्राटदार करीत आहे. तर नगरपरिषदेच्यावतीने नाल्या आणि सिमेंट रस्त्यांचे बांधकाम वेगात सुरू आहे. यासोबतच शहरात ठिकठिकाणी मोठ्ठाले अपार्टमेंट उभारण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यात ही कामे थांबतील, असे वाटत होते. परंतु आजही त्याच गतीने शहरातील खासगी बांधकामे सुरू आहे. दारव्हा रोड, आर्णी रोड, धामणगाव रोड यासह विविध ठिकाणी बिल्डर मोठे मोठे अपार्टमेंट उभारत आहेत. यासोबतच शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. अनेकांनी अपार्टमेंटच्या ठिकाणी खोदलेले बोअरवेल कोरडे पडले आहे. त्यामुळे ही मंडळी बाहेरुन पाणी आणत आहे. नेमके पाणी कोठून येते हे सर्वश्रृत असले तरी त्यांच्यावर कुणीही कारवाई करीत नाही. दुष्काळी परिस्थितीत बांधकाम थांबविण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम थांबविता येते, परंतु नगरपरिषदच शहरात रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करीत आहे त्यामुळे बिल्डरांना नोटीस देण्यास नगरपरिषदही पुढाकार घेत नाही. यवतमाळ शहराची भूजल पातळी खालावली आहे. अशा स्थितीत आणखी १५ दिवस पाऊस येण्याची चिन्हे नाही. निळोणा आटला आहे. चापडोहवर भिस्त आहे. भूगर्भातील पाणी बांधकामावर वापरले तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी) टँकरचे पाणी बांधकामावर पाण्याची उधळपट्टी थांबणार कधी ?यवतमाळ शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामावर रात्रीच्यावेळी टँकरने पाणी पुरविले जाते. पिण्याचे पाण्याचे कारण पुढे करून टँकर फुकटात भरले जातात. मात्र तेच पाणी दुप्पट दराने बांधकाम व्यावसायिकांना विकले जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या बांधकामावर रात्रीच्या वेळी फेरफटका मारला तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर पाणी ओततांना दिसून येतात. शहरातील विविध मंगल कार्यालय आणि लॉनवर पाण्याची उधळपट्टी होत आहे. हिरवळ टिकविण्यासाठी हजारो लिटर पाणी झाडांना दिले जात आहे. तर दुसरीकडे त्याच परिसरातील नागरिक मात्र गुंडभर पाण्यासाठी पायपीट करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर राजकीय पाठबळातून टँकर लॉनवर पोहोचत असल्याची माहिती आहे. पाण्याचा हा अपव्यय पाण्याची बचत सांगणारेच करीत असल्याचे दिसत आहे. शहरातील भीषण परिस्थिती बघता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची गरज आहे.