शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण पाणीटंचाईतही बांधकामे जोरात

By admin | Updated: May 27, 2016 02:08 IST

पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय

खासगी आणि शासकीयसुध्दा : नगरपरिषद-प्राधिकरण मेहेरबान यवतमाळ : पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय आणि खासगी बांधकामांवर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उच्च न्यायालयाने दुष्काळी भागात बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले असले तरी यवतमाळ शहरात मात्र ठिकठिकाणी बांधकाम सुरू आहे. यवतमाळ शहरात कधी नव्हे ती यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निळोणा धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच धरण कोरडे पडले आहे. शहरात आठ दिवसाआड तेही जेमतेम पाणी मिळत आहे. शहरातील बहुतांश खासगी बोअरवेल आणि नगर परिषदेच्या मालकीचे बोअरवेलही कोरडे पडले आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी हाच चर्चेचा विषय आहे. थेंब न् थेंब साठविण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील बहुतांश भागात बांधकामांचा सपाटा आहे. यात शासकीय आणि खासगी बांधकामांचा समावेश आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर कंत्राटदार करीत आहे. तर नगरपरिषदेच्यावतीने नाल्या आणि सिमेंट रस्त्यांचे बांधकाम वेगात सुरू आहे. यासोबतच शहरात ठिकठिकाणी मोठ्ठाले अपार्टमेंट उभारण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यात ही कामे थांबतील, असे वाटत होते. परंतु आजही त्याच गतीने शहरातील खासगी बांधकामे सुरू आहे. दारव्हा रोड, आर्णी रोड, धामणगाव रोड यासह विविध ठिकाणी बिल्डर मोठे मोठे अपार्टमेंट उभारत आहेत. यासोबतच शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. अनेकांनी अपार्टमेंटच्या ठिकाणी खोदलेले बोअरवेल कोरडे पडले आहे. त्यामुळे ही मंडळी बाहेरुन पाणी आणत आहे. नेमके पाणी कोठून येते हे सर्वश्रृत असले तरी त्यांच्यावर कुणीही कारवाई करीत नाही. दुष्काळी परिस्थितीत बांधकाम थांबविण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम थांबविता येते, परंतु नगरपरिषदच शहरात रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करीत आहे त्यामुळे बिल्डरांना नोटीस देण्यास नगरपरिषदही पुढाकार घेत नाही. यवतमाळ शहराची भूजल पातळी खालावली आहे. अशा स्थितीत आणखी १५ दिवस पाऊस येण्याची चिन्हे नाही. निळोणा आटला आहे. चापडोहवर भिस्त आहे. भूगर्भातील पाणी बांधकामावर वापरले तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी) टँकरचे पाणी बांधकामावर पाण्याची उधळपट्टी थांबणार कधी ?यवतमाळ शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामावर रात्रीच्यावेळी टँकरने पाणी पुरविले जाते. पिण्याचे पाण्याचे कारण पुढे करून टँकर फुकटात भरले जातात. मात्र तेच पाणी दुप्पट दराने बांधकाम व्यावसायिकांना विकले जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या बांधकामावर रात्रीच्या वेळी फेरफटका मारला तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर पाणी ओततांना दिसून येतात. शहरातील विविध मंगल कार्यालय आणि लॉनवर पाण्याची उधळपट्टी होत आहे. हिरवळ टिकविण्यासाठी हजारो लिटर पाणी झाडांना दिले जात आहे. तर दुसरीकडे त्याच परिसरातील नागरिक मात्र गुंडभर पाण्यासाठी पायपीट करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर राजकीय पाठबळातून टँकर लॉनवर पोहोचत असल्याची माहिती आहे. पाण्याचा हा अपव्यय पाण्याची बचत सांगणारेच करीत असल्याचे दिसत आहे. शहरातील भीषण परिस्थिती बघता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची गरज आहे.