शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

जिल्ह्यावर टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:53 IST

जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्प कोरडेच : आता भिस्त परतीच्या पावसावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे. त्यामुळे जिल्ह्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ५५.४१ टक्के पावसाची नोंद झाली. दरवर्षी याच कालावधीत किमान ७० टक्केच्यावर पाऊस बरसतो. त्या तुलनेत हा पाऊस १५ टक्यांनी कमी आहे. त्यातही यंदा बरसलेल्या पावसात मोठा खंड पडला. तुरळक आणि पिकायोग्य सरींनी पिकांना जीवदान मिळाले खरे, मात्र नदी, नाले अद्याप कोरडेच आहेत. शेतात पिके डौलाने उभी आहेत. मात्र जमिनीत पाणी मुरले नसल्याने जिल्ह्याची पाणी पातळी ०.६५ टक्क्यांनी खोल गेली होती. ही पातळी अपुºया पावसाने आणखी खोल जाण्याचा धोका वाढला आहे.यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोना जलाशयात आता केवळ २ फूट पाणी शिल्लक आहे. चापडोह प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही प्रकल्पातील पाण्यावर यवतमाळकरांची तहान अवलंबून आहे. मात्र हे पाणी केवळ दोन महिने अर्थात नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पुरेल एवढेच आहे. नंतर पाण्यासाठी चापडोह प्रकल्पावर इमर्जन्सी पंप बसवावे लागणार आहे. आजपर्यंत या प्रकल्पावर कधीच इमर्जन्सी पंप बसविले गेला नाही, हे विशेष.दारव्हा शहराला पाणीपुरवठा करणाºया कुंभारकिन्ही प्रकल्पातही २७ टक्केच पाणी आहे. वणीला पाणीपुरवठा करणाºया नवरगाव प्रकल्पातही अपुरा जलसाठा आहे. पुसद शहराला पाणी पुरवठा करणाºया पूस प्रकल्पात २२.३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. या शहरांसह जिल्हा मुख्यालयाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील पेयजलाचे चित्र यापेक्षाही बिकट होणार आहे. परिणामी येत्या उन्हाळ्यापूर्वीच जिल्हावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता बळावली आहे. ही परिस्थिती पालटण्याची ताकद केवळ परतीच्या पावसातच आहे. हा पाऊस बरसल्यास पेयजलाचा गंभीर प्रश्न थोडा तरी सुटण्यास मदत होणार आहे.यवतमाळ, राळेगाव, कळंबला फटकाजिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव आणि कळंब तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. यवतमाळ तालुक्यात ३२.८२ टक्के, कळंब ३१ टक्के तर राळेगावमध्ये ३१ टक्के पावसाची नोंद झाली. या तालुक्यात आत्ताच पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी किती पायपीट करावी लागेल.३० सप्टेंबरनंतर चित्र स्पष्टभूजल सर्व्हेक्षण विभागाने गेल्या मे महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची तपासणी केली. पावसाळा संपल्यानंतर १५ सप्टेंबरपासून पुन्हा भूजलाची नोंद घेतली जाते. त्यामुळे ३० सप्टेंबरनंतरच जिल्ह्यातील भूजल पातळीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच शासन आणि प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची शक्यता आहे.पुसदने सरासरी गाठलीपुसद तालुक्यात १००.१४ टक्के पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र त्यानंतरही तालुक्यातील पूस प्रकल्पामध्ये केवळ २२.३० टक्के जलसाठ्याची नोंद झाल्याने पावसाच्या टक्केवारीकडे साशंकतेने पाहिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी होणारी पावसाची टक्केवारी तालुक्यातील शेतकºयांना फसवी वाटते आहे.