शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:53 IST

जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्प कोरडेच : आता भिस्त परतीच्या पावसावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे. त्यामुळे जिल्ह्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ५५.४१ टक्के पावसाची नोंद झाली. दरवर्षी याच कालावधीत किमान ७० टक्केच्यावर पाऊस बरसतो. त्या तुलनेत हा पाऊस १५ टक्यांनी कमी आहे. त्यातही यंदा बरसलेल्या पावसात मोठा खंड पडला. तुरळक आणि पिकायोग्य सरींनी पिकांना जीवदान मिळाले खरे, मात्र नदी, नाले अद्याप कोरडेच आहेत. शेतात पिके डौलाने उभी आहेत. मात्र जमिनीत पाणी मुरले नसल्याने जिल्ह्याची पाणी पातळी ०.६५ टक्क्यांनी खोल गेली होती. ही पातळी अपुºया पावसाने आणखी खोल जाण्याचा धोका वाढला आहे.यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोना जलाशयात आता केवळ २ फूट पाणी शिल्लक आहे. चापडोह प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही प्रकल्पातील पाण्यावर यवतमाळकरांची तहान अवलंबून आहे. मात्र हे पाणी केवळ दोन महिने अर्थात नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पुरेल एवढेच आहे. नंतर पाण्यासाठी चापडोह प्रकल्पावर इमर्जन्सी पंप बसवावे लागणार आहे. आजपर्यंत या प्रकल्पावर कधीच इमर्जन्सी पंप बसविले गेला नाही, हे विशेष.दारव्हा शहराला पाणीपुरवठा करणाºया कुंभारकिन्ही प्रकल्पातही २७ टक्केच पाणी आहे. वणीला पाणीपुरवठा करणाºया नवरगाव प्रकल्पातही अपुरा जलसाठा आहे. पुसद शहराला पाणी पुरवठा करणाºया पूस प्रकल्पात २२.३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. या शहरांसह जिल्हा मुख्यालयाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील पेयजलाचे चित्र यापेक्षाही बिकट होणार आहे. परिणामी येत्या उन्हाळ्यापूर्वीच जिल्हावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता बळावली आहे. ही परिस्थिती पालटण्याची ताकद केवळ परतीच्या पावसातच आहे. हा पाऊस बरसल्यास पेयजलाचा गंभीर प्रश्न थोडा तरी सुटण्यास मदत होणार आहे.यवतमाळ, राळेगाव, कळंबला फटकाजिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव आणि कळंब तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. यवतमाळ तालुक्यात ३२.८२ टक्के, कळंब ३१ टक्के तर राळेगावमध्ये ३१ टक्के पावसाची नोंद झाली. या तालुक्यात आत्ताच पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी किती पायपीट करावी लागेल.३० सप्टेंबरनंतर चित्र स्पष्टभूजल सर्व्हेक्षण विभागाने गेल्या मे महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची तपासणी केली. पावसाळा संपल्यानंतर १५ सप्टेंबरपासून पुन्हा भूजलाची नोंद घेतली जाते. त्यामुळे ३० सप्टेंबरनंतरच जिल्ह्यातील भूजल पातळीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच शासन आणि प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची शक्यता आहे.पुसदने सरासरी गाठलीपुसद तालुक्यात १००.१४ टक्के पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र त्यानंतरही तालुक्यातील पूस प्रकल्पामध्ये केवळ २२.३० टक्के जलसाठ्याची नोंद झाल्याने पावसाच्या टक्केवारीकडे साशंकतेने पाहिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी होणारी पावसाची टक्केवारी तालुक्यातील शेतकºयांना फसवी वाटते आहे.