शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबरदिवा नसल्यानेच पेटविले राळेगाव ‘एसडीओं’चे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:56 IST

वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाºयांनी शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देजिल्हा दंडाधिकाऱ्यांचा अहवाल : सखी-कृष्णापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे.मंत्री, सनदी अधिकारी व राज्य सेवेतील दंडाधिकाºयांच्या वाहनांवरील दिवे काढले गेले आहे. त्यामुळे सर्वत्र ओरड पहायला मिळते. सध्या केवळ पोलिसांच्या वाहनावर अंबरदिवे आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असल्याचे कारण सांगून पोलिसांना अंबरदिवे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंत्री, जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दिवा नाही, मात्र ठाणेदारांच्या वाहनावर अंबरदिवा असे विसंगत चित्र सर्वत्र पहायला मिळते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तालुका, उपविभागीय आणि वेळप्रसंगी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाही संतप्त जमावापुढे जावे लागते. त्यामुळे दंडाधिकाºयांनाही अंबरदिवा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी ‘सीएमओ’ व सचिवालयात सनदी अधिकाºयांकडून केली गेली आहे. अंबरदिवा नसल्याने काय घटना घडू शकतात याचा हवालाही देण्यात आला आहे. त्यात राळेगाव तालुक्याच्या सखी (कृष्णापूर) गावात १६ सप्टेंबर २०१७ रोजी घडलेल्या घटनेचाही समावेश आहे.या घटनेबाबत यवतमाळच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला गोपनीय अहवाल सादर केला आहे. त्यात राळेगावचे एसडीओ संदीपकुमार अपार यांच्या शासकीय वाहनावर अंबरदिवा नसल्यानेच त्यांचे वाहन पेटविले गेल्याचे अहवालात म्हटले आहे. कृष्णापूर भागात वाघाचे हल्ले वाढले होते. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग वाघाला पकडण्यासाठी कोणत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत नसल्याने गावकºयांचा वन खात्याच्या अधिकाºयांवर रोष होता. घटनेच्यावेळी गावात आलेले वाहन वन विभागाचेच आहे, असे समजून गावकऱ्यांनी हे वाहन पेटवून दिले. या वाहनावर अंबरदिवा असता तर हे वाहन एसडीओ-तहसीलदारांचे आहे, अशी ओळख पटली असती. पर्यायाने जमाव ंआक्रमक झाला नसता व वाहन पेटविण्याची ही घटना टळली असती, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.दिव्याअभावी कृष्णापूर घटनेच्या पुनरावृत्तीची भीतीवाहनावर अंबरदिवा नसल्याने कृष्णापूरच्या घटनेची कुठेही पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी दंडाधिकारीय अधिकारी संतप्त जमावाच्या गर्दीत जाणे टाळतात, बहुतांश विलंबाने जाण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. जमाव अनेकदा पोलिसांची वाहने पेटवितो, मात्र दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना सहसा हात लावत नाही, असा अनुभव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना अंबरदिवा लावण्याची परवानगी देऊन त्यांची ओळख पुन्हा बहाल करावी, असा महसूल अधिकाºयांमधील सूर आहे.