शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अंबरदिवा नसल्यानेच पेटविले राळेगाव ‘एसडीओं’चे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:56 IST

वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाºयांनी शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देजिल्हा दंडाधिकाऱ्यांचा अहवाल : सखी-कृष्णापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे.मंत्री, सनदी अधिकारी व राज्य सेवेतील दंडाधिकाºयांच्या वाहनांवरील दिवे काढले गेले आहे. त्यामुळे सर्वत्र ओरड पहायला मिळते. सध्या केवळ पोलिसांच्या वाहनावर अंबरदिवे आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असल्याचे कारण सांगून पोलिसांना अंबरदिवे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंत्री, जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दिवा नाही, मात्र ठाणेदारांच्या वाहनावर अंबरदिवा असे विसंगत चित्र सर्वत्र पहायला मिळते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तालुका, उपविभागीय आणि वेळप्रसंगी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाही संतप्त जमावापुढे जावे लागते. त्यामुळे दंडाधिकाºयांनाही अंबरदिवा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी ‘सीएमओ’ व सचिवालयात सनदी अधिकाºयांकडून केली गेली आहे. अंबरदिवा नसल्याने काय घटना घडू शकतात याचा हवालाही देण्यात आला आहे. त्यात राळेगाव तालुक्याच्या सखी (कृष्णापूर) गावात १६ सप्टेंबर २०१७ रोजी घडलेल्या घटनेचाही समावेश आहे.या घटनेबाबत यवतमाळच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला गोपनीय अहवाल सादर केला आहे. त्यात राळेगावचे एसडीओ संदीपकुमार अपार यांच्या शासकीय वाहनावर अंबरदिवा नसल्यानेच त्यांचे वाहन पेटविले गेल्याचे अहवालात म्हटले आहे. कृष्णापूर भागात वाघाचे हल्ले वाढले होते. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग वाघाला पकडण्यासाठी कोणत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत नसल्याने गावकºयांचा वन खात्याच्या अधिकाºयांवर रोष होता. घटनेच्यावेळी गावात आलेले वाहन वन विभागाचेच आहे, असे समजून गावकऱ्यांनी हे वाहन पेटवून दिले. या वाहनावर अंबरदिवा असता तर हे वाहन एसडीओ-तहसीलदारांचे आहे, अशी ओळख पटली असती. पर्यायाने जमाव ंआक्रमक झाला नसता व वाहन पेटविण्याची ही घटना टळली असती, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.दिव्याअभावी कृष्णापूर घटनेच्या पुनरावृत्तीची भीतीवाहनावर अंबरदिवा नसल्याने कृष्णापूरच्या घटनेची कुठेही पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी दंडाधिकारीय अधिकारी संतप्त जमावाच्या गर्दीत जाणे टाळतात, बहुतांश विलंबाने जाण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. जमाव अनेकदा पोलिसांची वाहने पेटवितो, मात्र दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना सहसा हात लावत नाही, असा अनुभव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना अंबरदिवा लावण्याची परवानगी देऊन त्यांची ओळख पुन्हा बहाल करावी, असा महसूल अधिकाºयांमधील सूर आहे.