शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेचे १९ बळी - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:00 IST

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. 

यवतमाळ - अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन १९ लोकांचा बळ गेला तर जवळपास सातशे शेतकरी-शेतमजूर बाधित झाले आहे, या पार्श्वभूमिवर बुधवारी खासदार नाना पटोले हे यवतमाळला येऊन गेले. येथील शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूरांची सध्याची स्थिती ही शासन व प्रशासनासाठी भूषणावह नसल्याचे ते म्हणाले. यवतमाळ जिल्हयात शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी विषेश पॅकेजही शासन देत आहे. तरीसुद्धा शेतकºयांच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नसल्याचे ते म्हणाले. शासनाने फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकºयांना केवळ दोन लाख रुपये जाहीर केले आहे. त्याने शेतकरी-शेतमजूरांचे प्राण वापस येईल का, असे सांगून विषबाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ६० ते ७० हजार रुपये स्वत: उपचारासाठी खर्च करावे लागत असल्याचे ते म्हणाले. देशातील अशाप्रकारची ही मोठी गंभीर घटना यवतमाळ जिल्हयात घडली असताना त्याचे कुणालाही कोणते सोयर-सुतक  नसून शासनाने शेतकरी-शेतमजूरांना मरणासाठी सोडल्याचा आरोप त्यांनी केला.  सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कृषी व महसूल विभागातील ६० टक्के पदे रिक्त असल्याचे सांगून योग्य व वेळेवर शेतकºयांना मार्गदर्शन मिळाले असते तर हा प्रकार टाळता येऊ शकला असता. परंतु कृषी विभागातील कृषी सहाय्यकांची मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. बीटी कॉटन आल्यानंतरच्या परिणामाबद्दल विचारच केल्या गेला नाही. बियाण्यांचा अभ्यास नाही, त्याचे परिणाम शेतकºयांना भोगावे लागतात. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बीटीची चौकशी व्हावी आणि या कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच या प्रकरणाच्या सखाले चौकशीसाठी विद्यमान न्यायधीशांच्या अध्यक्षतेत समितीचे गठण करण्याची मागणीसुद्धा आपण करणार असल्याचे नानाभाऊ पटोले म्हणाले. यासाठी आपण उद्याच दिल्ली येथे जात असून पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे नानाभाऊ म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे देवानंद पवार, मिलिंद धुर्वे आदी उपस्थित होते.

दोन लाखांत शासन नवरा परत मिळेल का?फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या बंडू सोनुले या शेतमजूराची पत्नी गीता बंडू सानुले पत्रपरिषदेला उपस्थित होती. शासनाने दोन लाख रुपये जाहीर केल्याचे तीला सांगितले असता, मी भीक मागून का होईना शासनाला माझ्याकडून दोन लाख रुपये देईल, त्या बदल्यास शासन माझ्या पतीचे प्राण मला परत आणून देऊ शकेल का, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेFarmerशेतकरी