शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

चंद्रपुरातील दारूबंदी फसली; जप्त दारूचा लिलाव करा- विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 20:53 IST

यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे.

यवतमाळ : वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरपाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर महिला, शाळकरी विद्यार्थ्यांना दारू तस्करीत ओढणा-या या दारूबंदीचा फेरविचार करावा, जप्त दारू नाश न करता त्याचा लिलाव करावा, त्यातून मिळणा-या रकमेतून पोलिसांचे खबरे व दारू पकडणाºया संंबंधित पोलिसांना बक्षीस द्यावे, अशी मागणीही ना. वडेट्टीवार यांनी केली.  ३० टक्के दारू बनावट : पोलीस रिपोर्ट ना. वडेट्टीवार जिल्हा दौ-यावर आले असता सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिकृत दारूपेक्षाही चंद्रपूर जिल्ह्यात अनधिकृत दारूची विक्री वाढली आहे. पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार जप्त झालेल्या दारूपैकी ३० टक्के दारू ही बनावट आहे. दोन वर्षात पोलीस कारवाईत १८० कोटींची दारू जप्त झाली आहे. मात्र या दारूचा लिलाव होत नाही. त्यामुळे माफियांचे फावत आहे. जप्त झालेल्या दारूंचा लिलाव करून त्यातील २० टक्के रक्कम कारवाई करणाºया पोलीस अधिकारी व खबºयांना द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनापुढे ठेवणार आहोत. पर्यटनस्थळी दारूला परवानगी द्याचंद्रपूरमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांचे पसंतीचे स्थान आहे. मात्र हौसे खातर आलेला पर्यटक येथील रिसॉर्ट, हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबत नाही, तो नागपूरला जातो. त्यामुळे स्थानिक हॉटेल व रिसॉर्ट ओस पडले आहेत. पर्यटनाचा महसूलच घटला आहे. याबाबतही किमान पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल, रिसॉर्टमध्ये दारू विक्रीला परवानगी द्यावी. तर १७ हजार कोटींच्या महसुलावर पाणी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करून त्याचा उपयोग होत नाही, उलट दारू माफिया निर्माण झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करावी. असे करताना १७ हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार हेही तितकेच धक्कादायक वास्तव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा. राज्यात दारूबंदी केल्यास येथील सीमा पूर्णपणे सील करता येणे शक्य आहे. एकाच जिल्ह्यात दारूबंदी केल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे चंद्रपुरात चोरट्या मार्गाने प्रचंड दारू येत आहे. यासाठी शाळकरी मुले, महिला यांचा वापर होत आहे. हे दारू सुरू असण्यापेक्षाही बंदी असल्याचे घातक परिणाम आहे. याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव ठेवणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.