शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चंद्रपुरातील दारूबंदी फसली; जप्त दारूचा लिलाव करा- विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 20:53 IST

यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे.

यवतमाळ : वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरपाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर महिला, शाळकरी विद्यार्थ्यांना दारू तस्करीत ओढणा-या या दारूबंदीचा फेरविचार करावा, जप्त दारू नाश न करता त्याचा लिलाव करावा, त्यातून मिळणा-या रकमेतून पोलिसांचे खबरे व दारू पकडणाºया संंबंधित पोलिसांना बक्षीस द्यावे, अशी मागणीही ना. वडेट्टीवार यांनी केली.  ३० टक्के दारू बनावट : पोलीस रिपोर्ट ना. वडेट्टीवार जिल्हा दौ-यावर आले असता सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिकृत दारूपेक्षाही चंद्रपूर जिल्ह्यात अनधिकृत दारूची विक्री वाढली आहे. पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार जप्त झालेल्या दारूपैकी ३० टक्के दारू ही बनावट आहे. दोन वर्षात पोलीस कारवाईत १८० कोटींची दारू जप्त झाली आहे. मात्र या दारूचा लिलाव होत नाही. त्यामुळे माफियांचे फावत आहे. जप्त झालेल्या दारूंचा लिलाव करून त्यातील २० टक्के रक्कम कारवाई करणाºया पोलीस अधिकारी व खबºयांना द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनापुढे ठेवणार आहोत. पर्यटनस्थळी दारूला परवानगी द्याचंद्रपूरमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांचे पसंतीचे स्थान आहे. मात्र हौसे खातर आलेला पर्यटक येथील रिसॉर्ट, हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबत नाही, तो नागपूरला जातो. त्यामुळे स्थानिक हॉटेल व रिसॉर्ट ओस पडले आहेत. पर्यटनाचा महसूलच घटला आहे. याबाबतही किमान पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल, रिसॉर्टमध्ये दारू विक्रीला परवानगी द्यावी. तर १७ हजार कोटींच्या महसुलावर पाणी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करून त्याचा उपयोग होत नाही, उलट दारू माफिया निर्माण झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करावी. असे करताना १७ हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार हेही तितकेच धक्कादायक वास्तव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा. राज्यात दारूबंदी केल्यास येथील सीमा पूर्णपणे सील करता येणे शक्य आहे. एकाच जिल्ह्यात दारूबंदी केल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे चंद्रपुरात चोरट्या मार्गाने प्रचंड दारू येत आहे. यासाठी शाळकरी मुले, महिला यांचा वापर होत आहे. हे दारू सुरू असण्यापेक्षाही बंदी असल्याचे घातक परिणाम आहे. याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव ठेवणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.