शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दुष्काळ हे सुलतानी संकटच

By admin | Updated: February 28, 2016 02:33 IST

सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघावा असे लोकप्रतिनिधींना कधीच वाटले नाही. यामुळे माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी अडवून जिरविण्याचे काम करण्यात आले नाही.

एच.एम. देसरडा : जलयुक्त शिवार हा अशास्त्रीय कार्यक्रम केवळ टक्केवारीसाठीयवतमाळ : सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघावा असे लोकप्रतिनिधींना कधीच वाटले नाही. यामुळे माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी अडवून जिरविण्याचे काम करण्यात आले नाही. जे काम झाले, त्यात प्रचंड गैरप्रकार झाला. यामुळे आज पडलेला पाऊस अपुरा ठरून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच हा दुष्काळ सुलतानी संकटच असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. पाणी प्रश्नासाठी जनहीत याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार हा अशास्त्रीय कार्यक्रम केवळ टक्केवारीसाठी सुरू आहे. अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यातून टक्केवारी लाटत असल्याचा आरोप देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील अवर्षण, पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. राज्यातील विविध विभाग, जिल्हे, तालुके आणि गावामध्ये पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. जलसंपत्ती मुबलक असताना पाणीटंचाई भेडसावत आहे. याचे वास्तव जाणण्यासाठी शेती, पाणी आणि रोजगार संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ४ फेबु्रवारीला नांदेडपासून या संवाद यात्रेला प्रारंभ झाला. मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांसह विदर्भाची आता पाहणी केली जात आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात २९ फेब्रुवारीला जनहीत याचिका दाखल करणार असल्याचे देसरडा यांनी स्पष्ट केले.दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. शेतमालास भाव देण्यात यावा, पिकांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. शेतकरी आत्महत्येस सरकारचे धोरण जबाबदार आहे. यामुळे जबाबदार मंत्र्यांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी देसरडा यांनी केली. पत्रकार परिषदेला प्रा. एच. एम. देसरडा, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार, साखर विभागाचे सहसंचालक कृष्ण हरिदास उपस्थित होते. (शहर वार्ताहर)