शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

दुष्काळ हे सुलतानी संकटच

By admin | Updated: February 28, 2016 02:33 IST

सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघावा असे लोकप्रतिनिधींना कधीच वाटले नाही. यामुळे माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी अडवून जिरविण्याचे काम करण्यात आले नाही.

एच.एम. देसरडा : जलयुक्त शिवार हा अशास्त्रीय कार्यक्रम केवळ टक्केवारीसाठीयवतमाळ : सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघावा असे लोकप्रतिनिधींना कधीच वाटले नाही. यामुळे माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी अडवून जिरविण्याचे काम करण्यात आले नाही. जे काम झाले, त्यात प्रचंड गैरप्रकार झाला. यामुळे आज पडलेला पाऊस अपुरा ठरून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच हा दुष्काळ सुलतानी संकटच असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. पाणी प्रश्नासाठी जनहीत याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार हा अशास्त्रीय कार्यक्रम केवळ टक्केवारीसाठी सुरू आहे. अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यातून टक्केवारी लाटत असल्याचा आरोप देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील अवर्षण, पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. राज्यातील विविध विभाग, जिल्हे, तालुके आणि गावामध्ये पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. जलसंपत्ती मुबलक असताना पाणीटंचाई भेडसावत आहे. याचे वास्तव जाणण्यासाठी शेती, पाणी आणि रोजगार संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ४ फेबु्रवारीला नांदेडपासून या संवाद यात्रेला प्रारंभ झाला. मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांसह विदर्भाची आता पाहणी केली जात आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात २९ फेब्रुवारीला जनहीत याचिका दाखल करणार असल्याचे देसरडा यांनी स्पष्ट केले.दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. शेतमालास भाव देण्यात यावा, पिकांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. शेतकरी आत्महत्येस सरकारचे धोरण जबाबदार आहे. यामुळे जबाबदार मंत्र्यांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी देसरडा यांनी केली. पत्रकार परिषदेला प्रा. एच. एम. देसरडा, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार, साखर विभागाचे सहसंचालक कृष्ण हरिदास उपस्थित होते. (शहर वार्ताहर)