शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

धावंडा नदीच्या काठावरच टाकली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:56 IST

धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसला धोक्याची घंटा, नदीचे खोलीकरण-रुंदीकरणामुळे संकटाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत पूर संरक्षण भिंतीकरिता ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून धावंडा नदीचे एक हजार ५६० मीटर आणि मोरणा नदीचे २६० मीटर रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मंजूर केले आहे.अरुणावती पाटबंधारे विभागाअंतर्गत सदर बाब येते. या कामाची निविदा काढण्यात आली. अकलूज येथील राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा मंजूर झाली. त्यानंतर नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. जूनपूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात निघालेली माती काठावर टाकून दबाई करण्याचा प्रस्ताव होता. मात्र नदीच्या वळणदार मार्गामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे काठावर टाकलेल्या मातीमुळे धोका अधिक वाढला. पुरामुळे ही माती वाहत जावून एक तर जवळपासच्या निवासी परिसरात पसरेल किंवा हीच माती वाहून धरणात जमा होण्याची शक्यता आहे.तक्रारीनंतर माती उचलणारमाती काठावरच टाकली जात असल्याची बाब काही नागरिकांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना.राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून माती त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. अरुणावती पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अलाटकर यांना विचारले असता त्यांनी कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच माती उचलली जाईल, असे सांगितले. आता लवकरच राज्यमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली.शहराच्या मध्यवस्तीतून वाहते नदीशहराच्या अगदी मध्यातून धावंडा नदी वाहते. नदीच्या पश्चिम भागाला नांदगव्हाण धरण आहे. मात्र सध्या हे धरण उध्वस्त झाले आहे. परिणामी पावसाळ्यात पुराचे पाणी जोरदार प्रवाहाने नदीतून प्रवाहित होते. आता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण सुरू आहे. मात्र माती काठवरच टाकली जात असल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे.

टॅग्स :riverनदी