शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

धावंडा नदीच्या काठावरच टाकली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:56 IST

धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसला धोक्याची घंटा, नदीचे खोलीकरण-रुंदीकरणामुळे संकटाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत पूर संरक्षण भिंतीकरिता ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून धावंडा नदीचे एक हजार ५६० मीटर आणि मोरणा नदीचे २६० मीटर रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मंजूर केले आहे.अरुणावती पाटबंधारे विभागाअंतर्गत सदर बाब येते. या कामाची निविदा काढण्यात आली. अकलूज येथील राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा मंजूर झाली. त्यानंतर नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. जूनपूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात निघालेली माती काठावर टाकून दबाई करण्याचा प्रस्ताव होता. मात्र नदीच्या वळणदार मार्गामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे काठावर टाकलेल्या मातीमुळे धोका अधिक वाढला. पुरामुळे ही माती वाहत जावून एक तर जवळपासच्या निवासी परिसरात पसरेल किंवा हीच माती वाहून धरणात जमा होण्याची शक्यता आहे.तक्रारीनंतर माती उचलणारमाती काठावरच टाकली जात असल्याची बाब काही नागरिकांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना.राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून माती त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. अरुणावती पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अलाटकर यांना विचारले असता त्यांनी कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच माती उचलली जाईल, असे सांगितले. आता लवकरच राज्यमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली.शहराच्या मध्यवस्तीतून वाहते नदीशहराच्या अगदी मध्यातून धावंडा नदी वाहते. नदीच्या पश्चिम भागाला नांदगव्हाण धरण आहे. मात्र सध्या हे धरण उध्वस्त झाले आहे. परिणामी पावसाळ्यात पुराचे पाणी जोरदार प्रवाहाने नदीतून प्रवाहित होते. आता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण सुरू आहे. मात्र माती काठवरच टाकली जात असल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे.

टॅग्स :riverनदी