शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

कामे होत नसल्याची ‘डीपीसी’त खंत

By admin | Updated: August 3, 2014 00:20 IST

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनीही आपली खंत व्यक्त केली. आपलीही कामे होत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. शिवाय पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मान्यतेनंतर कामात होत

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनीही आपली खंत व्यक्त केली. आपलीही कामे होत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. शिवाय पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मान्यतेनंतर कामात होत असलेल्या बदलाविषयी आश्चर्य व्यक्त केले. आमदार संजय राठोड यांनी आमचा कोणी वालीच नसल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीने एकही काम घेतले नाही. जिल्हा परिषदेनेही दखल घेतल नाही. अशा स्थितीत आमदारांनी जायचे कुठे, हा प्रश्न उपस्थित केला. खासदार भावना गवळी यांनी यावरून थेट पालकमंत्र्यांवरच शरसंधान साधले. पालकमंत्र्यांना अधिकारी आहेत, म्हणून त्याचा चुकीच्या पध्दतीने वापर केल्याचे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. ७५ टक्के निधी केंद्राचा असून डावलण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवनियुक्त पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कामात बदल होतोच कसा, हा प्रश्न उपस्थित केला. यानंतर सभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजना यावर खर्च झालेल्या अहवालाचे वाचन करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुलाच्या योजनेतील निधी अखर्चित असल्याची बाब पुढे आली. यावर अध्यक्ष ना.शिवाजीराव मोघे यांनी अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. १५ एप्रिल २०१४ पासून ७० हजार रुपये अनुदान असलेल्या घरांना सरसकट एक लाख रुपये शासनाने जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. बीआरजीएफमध्ये ८० टक्के निधी सिमेंट रस्त्यावरच खर्च झाला आहे. या जुन्या कामांचे सोशल आॅडिट करण्याची मागणी खासदार गवळी यांनी केली. केंद्रीय विद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न केव्हा निकाली निघणार यावरही चर्चा झाली. आठ वर्षांपासून इमारतीचे बांधकाम रखडले असल्याचे सांगण्यात आले. मुळात केंद्रीय बोर्डाच्या भोपाळ कार्यालयाकडे जिल्हा प्रशासनाकडून चुकीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. यात सुधारणा करून नवीन प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले. पीक विम्याच्या लाभाचा मुद्दाही बैठकीत आला. विम्याच्या लाभासाठी उंबरठा उत्पादन काढताना याची माहिती संबंधित शेतकरी आणि संपूर्ण ग्रामस्थांना देणे आवश्यक आहे. अशा पध्दतीने माहिती न देताच उंबरठा उत्पादन निश्चित केले जाते. म्हणून शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. मारेगाव तालुक्यात तर, ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पेरलीच नाही, अशा शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आल्याचे आमदार वामनराव कासावार यांनी सांगितले. वॉटरशेडची कामे कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय सुरू असल्याचा मुद्दा वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य खर्चे यांनी मांडला. आमदार नंदिनी पारवेकर, आमदार विजय खडसे, आमदार श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)