शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

वर्चस्वाच्या लढाईतून दुहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

उमेशला शोधण्याासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी राॅडने उमेशवर हल्ला चढवत त्याला संपविण्यात आले. हे पाहून वसीमने तेथून पळ काढला. पाठलाग करून त्याच्यावरही सपासप वार करण्यात आले. यावेळी वसीमच्या कंबरेलाही धारदार चाकू खोचलेला होता. मात्र, तो त्याला काढण्याची संधीच मिळाली नाही. नंतर आरोपी तेथून पसार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आर्णी मार्गावर पल्लवी लॉनसमोर वर्चस्वाच्या लढाईतून धारदार शस्त्राने घाव घालून दोघांची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणात काही तासातच नेताजीनगरातील पुढाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. वसीम पठाण दिलावर पठाण (३६, रा. नेताजीनगर), उमेश तुळशीराम येरमे (३४, रा. नेताजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. आरोपी नीलेश सुरेश उईके (२२) रा. शिवाजीनगर, नीरज ओमप्रकाश वाघमारे (३३, रा. मधुबन सोसायटी, धामणगाव रोड), छोटे खान अन्वर खान पठाण (५४), शेख रहेमान शेख जब्बार (२८, दोघेही रा. नेताजीनगर), नितीन बाबाराव पवार (२४, रा. वडगाव) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी रात्रीच अटक केली. मृतक वसीमची पत्नी निखत पठाण हिच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम पठाण याचा महिनाभरापूर्वी नीरज वाघमारेच्या कार्यालयासमोर शेख रहेमान याच्याशी वाद झाला होता. तेव्हा नीरज वाघमारेने वसीमला समजावून सांग नाही तर त्याचा काटा काढतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १५ दिवसांनी वसीम पठाण याने छोटू खान याच्याशी वाद घातला. तेव्हाही छोटू खान याने वसीमला संपविण्याची धमकी दिली. नीरज व छोटू खान यांनी कट रचून शेख रहेमानच्या हाताने हे हत्याकांड घडवून आणले, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. शहरात दुहेरी हत्याकांडाची वार्ता पसरताच खळबळ निर्माण झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली.  मृतांना निघृर्णपणे घाव घातल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य होत नव्हते. अखेर मोबाईलवरून ओळख पटली....असे घडले हत्याकांड- वसीम पठाण याला फोन करून भांडण मिटविण्यासाठी बोलावण्यात आले. शेख रहेमान, वसीम पठाण, उमेश येरमे, नीलेश उईके, नितीन पवार व विधीसंघर्षग्रस्त बालक हे सहा जण दोन दुचाकीवरून आर्णी मार्गावरील एका बारमध्ये दारू प्यायले. नंतर जेवण करण्यासाठी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर गेले. जेवतानाच वसीम व रहेमानमध्ये वाद झाला. नंतर उमेश येरमे हा चालत वनवासी मारोती परिसरात आला. उमेशला शोधण्याासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी राॅडने उमेशवर हल्ला चढवत त्याला संपविण्यात आले. हे पाहून वसीमने तेथून पळ काढला. पाठलाग करून त्याच्यावरही सपासप वार करण्यात आले. यावेळी वसीमच्या कंबरेलाही धारदार चाकू खोचलेला होता. मात्र, तो त्याला काढण्याची संधीच मिळाली नाही. नंतर आरोपी तेथून पसार झाले. त्यांनी नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) येथील खंडाळा या गावात आश्रय घेतला. त्यांना ठाणेदार मनोज केदारे यांच्या निर्देशावरून पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व त्यांच्या पथकाने अटक केली, तर दर्शन दिकोंडवार यांनी नीरज वाघमारे व छोटे खान या दोघांना ताब्यात घेतले.

२०१७ मध्ये वसीम विरोधात कारवाई - मृतक वसीम पठाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करायचा. २०१७ मध्ये एलसीबीने वसीमच्या घरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यावेळी एक पिस्टल व तीन तलवारी सापडल्या होत्या. 

सहा वर्षांनंतर  नवरात्रातच हत्याकांड- रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी खून होणे हे यवतमाळकरांसाठी नवीन राहिलेले नाही. २०१५ मध्ये नवरात्रीच्या दरम्यानच मच्छीपूल परिसरात तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर, आता नवरात्रातच आर्णी रोडवर दुहेरी हत्याकांड घडले आहे. नवरात्रीच्या काळात शहरात भाविकांची वर्दळ असते. पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असते. अशा स्थितीत अंतर्गत धुसफूस सुरू असलेल्या गटांमध्ये संपविण्याचे प्रयत्न केले जातात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस