शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

डोळ्यात नाही, आता गावात पाणी आणूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:54 IST

पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे.

ठळक मुद्देसंकल्प : कळंब तालुक्यातील ९३ गावे ‘वॉटर कप’मध्ये, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कामांना सुरुवात

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे. परंतु आता ‘डोळ्यात नाही तर, गावात पाणी आणूया’, हा संकल्प ९३ गावातील लोकांनी केला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत टंचाईमुक्त गावासाठी त्यांची धडपड सुरू आहे.गतवर्षी ६४ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. खडकी, शंकरपूर, राजूर, गणेशवाडी, खटेश्वर आदी गावांनी दखलपात्र कामे केली. यावर्षी स्पर्धेत ९३ गावे सहभागी झालीत. ६० गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण पूर्ण करुन जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली. यात नरसापूर, इचोरा, रासा, उमरी, गांढा, खडकी, नांझा, सावंगी (डाफ), निमगव्हाण आदी गावाचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप राबविली जात आहे. ही स्पर्धा म्हणजे जलसंधारण व मृदसंधारणाचे यथायोग्य व्यवस्थापन करणे होय. या स्पर्धेत गावांच्या पुढाकारातून केलेले सामूहिक प्रयत्न हीच या कामाची कसोटी लावणारी आहे. रोपवाटिका, शोषखड्डे, चर, बीज संकलन, तळे या कामांना गती देण्यात आली आहे. स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होत असली तरी, अनेक गावात आतापासूनच कामाला सुरुवात झाली आहे.लोकांचा उत्साह वाढावा यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, पाणी फाऊंडेशनच्या तालुका समन्वयक अर्चना दवारे यांच्या मार्गदर्शनात गावागावात शिवारफेरी आयोजित केली जात आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा सकारात्मक प्रयत्न गावातील नागरिकांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे.योजनेविषयी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार म्हणाले, राळेगाव उपविभागातील कळंब आणि राळेगाव तालुक्यात अनेक गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. दुष्काळावर मात करण्याºया या कामात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे येणाºया काळात दुष्काळावर निश्चित मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकसहभागातून उभी झाली मोठी रक्कमगतवर्षी अनेक गावात तीन ते साडेतीन लाख रुपये लोकसहभागातून उभे झाले होते. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही मोठा सहभाग होता. याहीवर्षी अनेक गावातील दानशूर व्यक्ती स्पर्धेत तन-मन ऐवढेच नाही तर धन देऊनही आपला खारीचा वाटा उचलत आहे.

टॅग्स :Waterपाणी