शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

डोळ्यात नाही, आता गावात पाणी आणूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:54 IST

पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे.

ठळक मुद्देसंकल्प : कळंब तालुक्यातील ९३ गावे ‘वॉटर कप’मध्ये, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कामांना सुरुवात

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे. परंतु आता ‘डोळ्यात नाही तर, गावात पाणी आणूया’, हा संकल्प ९३ गावातील लोकांनी केला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत टंचाईमुक्त गावासाठी त्यांची धडपड सुरू आहे.गतवर्षी ६४ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. खडकी, शंकरपूर, राजूर, गणेशवाडी, खटेश्वर आदी गावांनी दखलपात्र कामे केली. यावर्षी स्पर्धेत ९३ गावे सहभागी झालीत. ६० गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण पूर्ण करुन जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली. यात नरसापूर, इचोरा, रासा, उमरी, गांढा, खडकी, नांझा, सावंगी (डाफ), निमगव्हाण आदी गावाचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप राबविली जात आहे. ही स्पर्धा म्हणजे जलसंधारण व मृदसंधारणाचे यथायोग्य व्यवस्थापन करणे होय. या स्पर्धेत गावांच्या पुढाकारातून केलेले सामूहिक प्रयत्न हीच या कामाची कसोटी लावणारी आहे. रोपवाटिका, शोषखड्डे, चर, बीज संकलन, तळे या कामांना गती देण्यात आली आहे. स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होत असली तरी, अनेक गावात आतापासूनच कामाला सुरुवात झाली आहे.लोकांचा उत्साह वाढावा यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, पाणी फाऊंडेशनच्या तालुका समन्वयक अर्चना दवारे यांच्या मार्गदर्शनात गावागावात शिवारफेरी आयोजित केली जात आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा सकारात्मक प्रयत्न गावातील नागरिकांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे.योजनेविषयी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार म्हणाले, राळेगाव उपविभागातील कळंब आणि राळेगाव तालुक्यात अनेक गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. दुष्काळावर मात करण्याºया या कामात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे येणाºया काळात दुष्काळावर निश्चित मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकसहभागातून उभी झाली मोठी रक्कमगतवर्षी अनेक गावात तीन ते साडेतीन लाख रुपये लोकसहभागातून उभे झाले होते. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही मोठा सहभाग होता. याहीवर्षी अनेक गावातील दानशूर व्यक्ती स्पर्धेत तन-मन ऐवढेच नाही तर धन देऊनही आपला खारीचा वाटा उचलत आहे.

टॅग्स :Waterपाणी