शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना त्रास देऊ नका

By admin | Updated: December 29, 2014 02:14 IST

शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करा. शासनाच्या त्यांच्यासाठी असलेल्या योजना वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

आर्णी : शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करा. शासनाच्या त्यांच्यासाठी असलेल्या योजना वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना त्रास होईल असे वर्तन शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होऊ नये, असे आमदार प्रा.राजू तोडसाम म्हणाले.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजू तोडसाम यांनी प्रथमच आर्णी तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतला. परंतु या बैठकीला अरुणावती प्रकल्प, वन विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालय अशा महत्त्वाच्या कार्यालयातील कुणीही उपस्थित नव्हते. बहुसंख्य अधिकाऱ्यांनी या बैठकीला पाठ दाखविल्यामुळे आमदार चांगलेच संतापले. त्यांनी गैरहजर असणाऱ्यांवर कारवाईचे पत्र काढण्याचे निर्देश हेमंत गांगुर्डे यांना दिले. आढावा बैठकीला कार्यालय प्रमुखांनी उपस्थित न राहता आपला प्रतिनिधी पाठविण्यावर जोर दिला. या प्रतिनिधींना संबंधित प्रश्नांची माहितीच नसल्याचेही उघडकीस झाले. काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित ग्रामस्थांनी तो वेळीच हाणून पाडला. पंचायत समितीच्या कृषी विभागातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कशा प्रकारे पैसे मागितले जातात, याची अनेक उदाहरणे शेतकऱ्यांनी आमदाराला सांगितली. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले. तालुका कृषी कार्यालयाचा कशा प्रकारे भोंगळ कारभार सुरू आहे, हे स्वत: आमदारांनीच उघडकीस आणला. कोणतीही सिंचनाची कामे करताना योग्य जागा अंतिम झाल्याशिवाय अंदाजपत्रक बनवू नये, असे निर्देश यावेळी आमदारांनी दिले. कृषी विभागाकडून इंजन व विहिरींचे चेक देताना शेतकऱ्यांना कशा प्रकारे पैसे मागितले जातात आणि पैसे दिल्यावर काम कसे जलद गतीने होते, हेसुद्धा शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. आरोग्य विभागातील उपकेंद्रांवर कर्मचारीच राहात नाही. अधिकारी, कर्मचारी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. शिक्षण विभागात पदवीधर शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळांमधील संगणक सुरूच नाही. अनेक शाळांमध्ये वीज पुरवठा नाही. अंगणवाडीमध्ये मुलांसाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आर्णी नगरपरिषद झाल्यामुळे या भागात येणाऱ्या अंगणवाड्या नगरपरिषदांमध्ये येणे आवश्यक होत्या. परंतु तीन वर्ष होऊनही ते झाले नाही. यामुळे या अंगणवाड्यांची दयनीय अवस्था आहे. काही अंगणवाड्यांना छप्परसुद्धा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार या बैठकीत समोर आला. अधिकाऱ्यांनीसुद्धा या बाबीला दुजोरा दिला. परंतु नगरपरिषदेचे मुख्याधिकारीच बैठकीला उपस्थित नसल्यामुळे याबाबत कोणताही ठोस निर्णय होवू शकला नाही. आर्णी ते सावळी हा रस्ता अद्यापही रखडल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला असता संबंधित कंत्राटदाराला या प्रकरणी दंडसुद्धा आकारण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या सोयीच्या पांदण रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशा सूचना आमदारांनी दिल्या. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यासाठी पंचायत समितीने आतापासूनच योग्य नियोजन करायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. या बाबत विशेष बैठक घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे ताबडतोब देण्यात यावे, तसेच त्यांना वीज जोडणीही त्वरित मिळावी, अशा सूचना संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. विहिरीच्या देयकासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये केवळ येरझारा माराव्या लागतात, काही ठिकाणी पैसे द्यावे लागतात. मनरेगात एकाच मस्टरच्या नावावर दोन कामातून पैसे उकळण्यात येतात. पंचायत समितीमधून एक मस्टर दोन कामावर कसे पोहोचते आदी तक्रारीसुद्धा यावेळी करण्यात आल्या.बैठकीला परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक व शेतकऱ्यांचीही उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)