लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येक प्रवासासाठी आणि वाहतुकीसाठी काही नियम आहेत. सध्या रेल्वेचे वेटिंगही संपले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने वेटिंग हाऊसफुल्ल होताच अशा गाड्या रिग्लेक्ट केल्या आहेत. रिग्लेक्ट गाड्यांमध्ये तिकीट फाडता येत नाही. यामुळे वेटिंगचेही तिकीट मिळत नाही. अशा पाच गाड्या सध्या धावत आहेत. यामध्ये रिझर्व्हेशनसह वेटिंग असतानाही प्रवासी प्रवास करण्यास तयार आहेत. यामुळे गाडीमध्ये तीळमात्रही जागा शिल्लक राहिली नाही. यातून या रेल्वे गाड्यांनी प्रवासी घेणे बंद केले आहे. यामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत.
रात्रीच्या रेल्वे खचाखच- एसटीचा संप सुरू आहे. अशा परिस्थितीत खासगी वाहनचालकांनी मनमानी दर आकारणे सुरू केले आहे. अशा परिस्थितीत स्वगृही पोहोचण्यासाठी रेल्वेमध्ये खचाखच गर्दी होत आहे.- वेटिंगमध्ये तिकीट असले तरी प्रवासी रेल्वेत चढता येईल एवढ्याच एका शब्दावर रेल्वेमध्ये बसत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी रेल्वे गाडी हाऊसफुल्ल झाली आहे.
जनरलचे तिकिटच नाही- पूर्वी जनरलचे तिकीट काढून फर्स्ट क्लासमध्ये प्रवेश करणारे अनेक प्रवासी दिसत होते. - कोविडपासून जनरलचे तिकीट बंद करण्यात आले आहे. यामुळे रेल्वेत प्रवास करायचा असेल तर स्पेशल ट्रेनचे तिकीट काढावे लागते.