शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

पेयजल कार्यक्रमात जिल्हा माघारला

By admin | Updated: February 25, 2015 02:20 IST

उन्हाळ्याचे चटके जाणवायला आता सुरूवात झाली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने नदी, नाले आत्ताच कोरडे पडले आहे.

वणी : उन्हाळ्याचे चटके जाणवायला आता सुरूवात झाली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने नदी, नाले आत्ताच कोरडे पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याअभावी मानव व जनावरांचे घसे कोरडे पडण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हा प्रशासन अजूनही गतीमान झालेले दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात जिल्हा राज्यात माघारल्याचे निष्पन्न होत आहे.राज्य शासनाने सन २०१२-१३ च्या पेयजल कार्यक्रमाचा कृती आराखडा जाहीर केला. यामध्ये नोव्हेंबर २०१२ पर्यंत यवतमाळ जिल्ह्यात पेयजल कार्यक्रमाचे उद्दिष्ट केवळ १८ टक्के पूर्ण झाले होते. मात्र लगतच्याच चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेत ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. ३३ जिल्ह्यांच्या सर्व्हेक्षणामध्ये यवतमाळ जिल्हा २८ व्या क्रमांकावर होता. यात सुधारणा करीत जानेवारी १३ पर्यंत यवतमाळ जिल्ह्याने ३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. २१ व्या क्रमांकावर जिल्हा पोहोचला. चंद्रपूर जिल्ह्याने ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पहिल्या १० जिल्ह्यात प्रवेश केला. लगतच्याच दोन जिल्ह्याच्या प्रगतीत एवढी तफावत कशी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये गतीमानता का आली नाही, असा प्रश्न पडतो. ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यातच दीड महिन्याचा वेळ येथे लावला जात आहे. निविदा आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना मिळाव्यात, यासाठी चालढकल केली जात असल्याचे काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत असल्याने यावर्षी जनतेला उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पाणी साठविण्याच्या कोणत्याही योजना पाणी पुरवठा विभागाने हाती घेतल्या नाही. त्यामुळे सर्व नदी, नाले कोरडे पडले आहेत. जल पुनर्भरणाची कामेही केल्या गेली नाही. रेन वॉटर हार्व्हेस्टींग योजनेला जिल्ह्यात चालना देण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी सर्वत्र निरूपयोगी ठरले. आता केवळ भूगर्भातील पाण्यावरच जनतेला अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र भूगर्भातील पाण्यावर उभ्या होणाऱ्या ग्रामीण पेयजल योजनाही साकारण्यास अधिकारी फारसे उत्सुक दिसत नाही. अनेक तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता बळावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)