शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

जिल्ह्याला सिंचनासाठी मंजूर झाले १३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:13 IST

जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे.

ठळक मुद्देमदन येरावार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी करणार भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने जिल्ह्याला १३२ कोटी रूपये मंजूर केले असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ जानेवारीला घारफळ येथे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्यातून किमान २१.६५ टक्के सिंचन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १२.६० टक्केच सिंचन होत आहे. प्रकल्प पूर्ण होऊनही कालवे व वितरिकांची दुरूस्ती नाही, अनेक कालवे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक मध्यम व १४ लघु प्रकल्पांच्या सिंंचन वृद्धीचे काम केले जाणसल्याचे ना. येरावार यांनी सांगितले.जलाशयांतून कालवा व वितरिकांच्या सहायाने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. कालवे देखभाल दुरूस्तीसाठी सिंचन विभागाला पोकलँड, टिप्पर व तत्सम मशीनरी खरेदी केली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने सिंचन व्हावे, यावर भर दिला जात आहे. ६० वर्ष पूर्ण होऊन अद्याप प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावर पाणी पोहोचलेले नाही, असा आरोप ना. येरावार यांनी केला. आता प्रत्यक्ष सिंचन वाढविण्यासाठी जलसंजीवनी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.बळीराजा जलसंजीवनीचे प्रकल्पबळीराजा जलसंजीवनी योजनेतून वर्धा बॅरेज (बाभूळगाव), या मध्यम प्रकल्पासह अमडापूर (उमरखेड), अंतरगाव (दारव्हा), दहेगाव (राळेगाव), हटवांजरी (मारेगाव), मनपूर (यवतमाळ), खर्डा (बाभूळगाव), कोची-आंबेझरी (घाटंजी), कोहळा (नेर), लखमापूर (यवतमाळ), महादापूर (झरीजामणी), महागाव (दारव्हा), पाचपहूर (झरीजामणी), डिगडोह (राळेगाव), वरूड-येवती (यवतमाळ) या लघु प्रकल्पांची दुरुस्ती केली जाणार आहे. या प्रकल्प्पांतून वाढीव १८ हजार ८८१ हेक्टरचे सिंचन होणार आहे. त्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कें्रदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर भूमिपूजनला येणार आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार