शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्याला सिंचनासाठी मंजूर झाले १३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:13 IST

जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे.

ठळक मुद्देमदन येरावार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी करणार भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने जिल्ह्याला १३२ कोटी रूपये मंजूर केले असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ जानेवारीला घारफळ येथे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्यातून किमान २१.६५ टक्के सिंचन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १२.६० टक्केच सिंचन होत आहे. प्रकल्प पूर्ण होऊनही कालवे व वितरिकांची दुरूस्ती नाही, अनेक कालवे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक मध्यम व १४ लघु प्रकल्पांच्या सिंंचन वृद्धीचे काम केले जाणसल्याचे ना. येरावार यांनी सांगितले.जलाशयांतून कालवा व वितरिकांच्या सहायाने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. कालवे देखभाल दुरूस्तीसाठी सिंचन विभागाला पोकलँड, टिप्पर व तत्सम मशीनरी खरेदी केली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने सिंचन व्हावे, यावर भर दिला जात आहे. ६० वर्ष पूर्ण होऊन अद्याप प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावर पाणी पोहोचलेले नाही, असा आरोप ना. येरावार यांनी केला. आता प्रत्यक्ष सिंचन वाढविण्यासाठी जलसंजीवनी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.बळीराजा जलसंजीवनीचे प्रकल्पबळीराजा जलसंजीवनी योजनेतून वर्धा बॅरेज (बाभूळगाव), या मध्यम प्रकल्पासह अमडापूर (उमरखेड), अंतरगाव (दारव्हा), दहेगाव (राळेगाव), हटवांजरी (मारेगाव), मनपूर (यवतमाळ), खर्डा (बाभूळगाव), कोची-आंबेझरी (घाटंजी), कोहळा (नेर), लखमापूर (यवतमाळ), महादापूर (झरीजामणी), महागाव (दारव्हा), पाचपहूर (झरीजामणी), डिगडोह (राळेगाव), वरूड-येवती (यवतमाळ) या लघु प्रकल्पांची दुरुस्ती केली जाणार आहे. या प्रकल्प्पांतून वाढीव १८ हजार ८८१ हेक्टरचे सिंचन होणार आहे. त्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कें्रदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर भूमिपूजनला येणार आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार