शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

जिल्ह्याला सिंचनासाठी मंजूर झाले १३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:13 IST

जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे.

ठळक मुद्देमदन येरावार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी करणार भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने जिल्ह्याला १३२ कोटी रूपये मंजूर केले असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ जानेवारीला घारफळ येथे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्यातून किमान २१.६५ टक्के सिंचन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १२.६० टक्केच सिंचन होत आहे. प्रकल्प पूर्ण होऊनही कालवे व वितरिकांची दुरूस्ती नाही, अनेक कालवे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक मध्यम व १४ लघु प्रकल्पांच्या सिंंचन वृद्धीचे काम केले जाणसल्याचे ना. येरावार यांनी सांगितले.जलाशयांतून कालवा व वितरिकांच्या सहायाने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. कालवे देखभाल दुरूस्तीसाठी सिंचन विभागाला पोकलँड, टिप्पर व तत्सम मशीनरी खरेदी केली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने सिंचन व्हावे, यावर भर दिला जात आहे. ६० वर्ष पूर्ण होऊन अद्याप प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावर पाणी पोहोचलेले नाही, असा आरोप ना. येरावार यांनी केला. आता प्रत्यक्ष सिंचन वाढविण्यासाठी जलसंजीवनी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.बळीराजा जलसंजीवनीचे प्रकल्पबळीराजा जलसंजीवनी योजनेतून वर्धा बॅरेज (बाभूळगाव), या मध्यम प्रकल्पासह अमडापूर (उमरखेड), अंतरगाव (दारव्हा), दहेगाव (राळेगाव), हटवांजरी (मारेगाव), मनपूर (यवतमाळ), खर्डा (बाभूळगाव), कोची-आंबेझरी (घाटंजी), कोहळा (नेर), लखमापूर (यवतमाळ), महादापूर (झरीजामणी), महागाव (दारव्हा), पाचपहूर (झरीजामणी), डिगडोह (राळेगाव), वरूड-येवती (यवतमाळ) या लघु प्रकल्पांची दुरुस्ती केली जाणार आहे. या प्रकल्प्पांतून वाढीव १८ हजार ८८१ हेक्टरचे सिंचन होणार आहे. त्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कें्रदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर भूमिपूजनला येणार आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार