शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या चार दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:09 IST

तीन वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांसाठी खूशखबर आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येत्या तीन दिवसात धडकणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू व्हावे लागेल, असे संकेत शिक्षण विभागातून मिळाले आहेत.

ठळक मुद्देतत्काळ कार्यमुक्ती : शिक्षण विभागाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तीन वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांसाठी खूशखबर आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येत्या तीन दिवसात धडकणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू व्हावे लागेल, असे संकेत शिक्षण विभागातून मिळाले आहेत. विशेष म्हणजे, एकंदर आठ हजार शिक्षकांपैकी चार हजार जणांच्या बदल्या होण्याची शक्यता असून ही शिक्षण क्षेत्रासाठी मोठी उलथापालथ ठरणार आहे.जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील ‘क’ वर्गीय कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया ९ मेपासून सुरू झाली आहे. सीईओंनी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १५ मेपर्यंत संपविण्यात येणार असून शेवटचा दिवस शिक्षण विभागासाठी राखून ठेवण्यात आला आहे. परंतु, शिक्षण विभागातील ‘क’वर्गातील कर्मचारी असलेल्या शिक्षकांचे बदली आदेश राज्यस्तराहून येणार आहेत. हे आदेश येण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील, अशी शक्यता शिक्षणाधिकाºयांनी वर्तविली आहे.ग्रामविकास मंत्रालयाच्या स्तरावरून राज्यातील शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मे रोजी धुळे आणि बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे बदली आदेश तेथील सीईओंना पाठविण्यात आले. तर १२ मे रोजी जळगाव, सातारा, वाशिम, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा परिषदांनाही बदली आदेश मिळाले आहेत. तर यवतमाळसह इतर जिल्ह्यांचे आदेश लवकरच पाठविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.बदली प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. राज्यस्तरावरून आदेश येताच शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी भरलेला मूळ अर्ज, त्यात संवर्ग एकमधून लाभ घेतला असल्यास संबंधित पुरावे, असे सर्व दस्तावेज शिक्षणाधिकाºयांनी मागविले आहेत. प्रत्येक शिक्षकाचे असे दस्तावेज गोळा करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर एका कर्मचाºयाची खास नियुक्ती करण्यात आली आहे. हे दस्तावेज १५ मेपर्यंत तातडीने मागविण्यात आले आहे. बदलीचा आदेश मिळताच शिक्षक कार्यमुक्त होणार असून दुसºयाच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू झाल्याचा अहवाल द्यावा लागणार आहे.पोळा, दसरा, दिवाळी हुकली... धोंड्याचा महिना सार्थकीफेब्रुवारी २०१७ पासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ‘पाईपलाईन’मध्ये होती. यादरम्यान, कधी पोळ्याच्या दिवशी आदेश येणार तर कधी दसऱ्याच्या दिवशी आदेश धडकणार, अशा वावड्या उठत राहिल्या. पण त्या फोल ठरल्या. दिवाळीच्या सुट्यांमध्ये बदल्यांची प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ऐनवेळी बदल्याच स्थगित झाल्या होत्या. पोळा, दसरा, दिवाळी असे मुहूर्त हुकले. मात्र आता धोंड्याच्या महिन्यात बदल्या पूर्णत्वास जात आहेत.बोगस लाभार्थी जाणार ‘ब्लॅक लिस्ट’मध्येआॅनलाईन अर्जात एखाद्या शिक्षकाने खोटी माहिती भरलेली आढळल्यास त्याची बदली रद्द करण्याचे आदेश आहेत. त्याला मूळ शाळेत पदस्थापना न देता पूर्ण बदली प्रक्रिया झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत बदली केली जाणार. शिस्तभंगाची कारवाई करून त्याच्या दोन वेतनवाढीही रोखण्यात येणार आहे. त्याला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकून पुढील पाच वर्षे त्याला बदली प्रक्रियेत अर्ज भरण्यास अपात्र ठरविले जाणार आहे.दोन-दोन दिवसांच्या अंतराने विविध जिल्ह्यांचे बदली आदेश पाठविले जात आहे. धुळे, बुलडाणा जिल्हा परिषदांना बदल्यांचे आदेश मिळाले आहेत. येत्या ३-४ दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचेही आदेश येतील.-डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, यवतमाळ