शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक ३९ टक्के, राष्ट्रीयीकृत ११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना १५०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असले तरी आतापर्यंत या बँकांचे वाटप अवघे १०४ कोटींच्या घरात आहे.

ठळक मुद्देखरीप पीक कर्ज वाटप : हजारो शेतकरी प्रतीक्षेतच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक कर्ज वाटपातील राष्ट्रीयीकृत बँकांची संथगती यावर्षीही कायम आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीड महिन्यातच ३९ टक्क्यांवर पोहोचली असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र जेमतेम ८ ते ११ टक्क्यातच खेळत आहे.२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना १५०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असले तरी आतापर्यंत या बँकांचे वाटप अवघे १०४ कोटींच्या घरात आहे. त्यांची ही टक्केवारी ८ ते ११ अशी असून गती संथ आहे.राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज देत नाही, ही जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची दरवर्षीचीच ओरड आहे. त्यात तेवढेच तथ्यही आहे. अनेक गावांना राष्ट्रीयीकृत बँकांशी जोडले गेल्याने त्यांचा नाईलाज आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांना मात्र सहज कर्ज उपलब्ध होते. जुन्या सरकारमधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील एकट्या जिल्हा बँकेशी संबंधित ३० हजार शेतकरी माफीपासून वंचित आहे. दीड लाखांची माफी, त्यावरील रक्कम भरा अशी ही योजना होती.संचालक मंडळाची बैठकजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची ८ मे रोजी बैठक पार पडली. यात अनेक विषय मार्गी लावले गेले. बँकेच्या सुरक्षा एजंसीला वर्षभर मुदतवाढ देण्यात आली. कारण सध्या निविदा प्रक्रिया राबविता येत नाही. खर्चाला मान्यता देणे व अन्य काही विषय मंजूर करण्यात आले. संचालक मंडळाची दुसरी बैठक लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.माफीपासूून वंचितांनाही पीककर्जमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जाहीर केलेल्या ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत शेतकºयांना सरसकट दीड लाखापर्यंंतचे कर्जमाफ केले गेले. परंतु यवतमाळसह काही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने शासनाकडून माफीचा पैसाच आला नाही. जिल्ह्याची माफीची ही रक्कम ६५० कोटी रुपये एवढी असून शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ५८ हजार आहे. त्यात १८ हजार जिल्हा बँकेचे तर ४० हजार राष्ट्रीयीकृत बँकांचे सभासद आहेत. या माफीपोटी जिल्हा बँकेला १३७ कोटी तर राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे ५०० कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे. माफीची ही रक्कम प्राप्त न झाल्याने संबंधित ५८ हजार शेतकरी यावर्षीच्या पीक कर्जापासून वंचित आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये माफी न मिळालेल्यांनाही कर्ज देण्याची घोषणा केल्याने या शेतकºयांचा कर्जाचा मार्ग सुकर झाला आहे.

टॅग्स :bankबँक