शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्हा बँक ३९ टक्के, राष्ट्रीयीकृत ११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना १५०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असले तरी आतापर्यंत या बँकांचे वाटप अवघे १०४ कोटींच्या घरात आहे.

ठळक मुद्देखरीप पीक कर्ज वाटप : हजारो शेतकरी प्रतीक्षेतच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक कर्ज वाटपातील राष्ट्रीयीकृत बँकांची संथगती यावर्षीही कायम आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीड महिन्यातच ३९ टक्क्यांवर पोहोचली असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र जेमतेम ८ ते ११ टक्क्यातच खेळत आहे.२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना १५०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असले तरी आतापर्यंत या बँकांचे वाटप अवघे १०४ कोटींच्या घरात आहे. त्यांची ही टक्केवारी ८ ते ११ अशी असून गती संथ आहे.राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज देत नाही, ही जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची दरवर्षीचीच ओरड आहे. त्यात तेवढेच तथ्यही आहे. अनेक गावांना राष्ट्रीयीकृत बँकांशी जोडले गेल्याने त्यांचा नाईलाज आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांना मात्र सहज कर्ज उपलब्ध होते. जुन्या सरकारमधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील एकट्या जिल्हा बँकेशी संबंधित ३० हजार शेतकरी माफीपासून वंचित आहे. दीड लाखांची माफी, त्यावरील रक्कम भरा अशी ही योजना होती.संचालक मंडळाची बैठकजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची ८ मे रोजी बैठक पार पडली. यात अनेक विषय मार्गी लावले गेले. बँकेच्या सुरक्षा एजंसीला वर्षभर मुदतवाढ देण्यात आली. कारण सध्या निविदा प्रक्रिया राबविता येत नाही. खर्चाला मान्यता देणे व अन्य काही विषय मंजूर करण्यात आले. संचालक मंडळाची दुसरी बैठक लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.माफीपासूून वंचितांनाही पीककर्जमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जाहीर केलेल्या ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत शेतकºयांना सरसकट दीड लाखापर्यंंतचे कर्जमाफ केले गेले. परंतु यवतमाळसह काही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने शासनाकडून माफीचा पैसाच आला नाही. जिल्ह्याची माफीची ही रक्कम ६५० कोटी रुपये एवढी असून शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ५८ हजार आहे. त्यात १८ हजार जिल्हा बँकेचे तर ४० हजार राष्ट्रीयीकृत बँकांचे सभासद आहेत. या माफीपोटी जिल्हा बँकेला १३७ कोटी तर राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे ५०० कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे. माफीची ही रक्कम प्राप्त न झाल्याने संबंधित ५८ हजार शेतकरी यावर्षीच्या पीक कर्जापासून वंचित आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये माफी न मिळालेल्यांनाही कर्ज देण्याची घोषणा केल्याने या शेतकºयांचा कर्जाचा मार्ग सुकर झाला आहे.

टॅग्स :bankबँक