शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

By admin | Updated: May 2, 2015 02:01 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त पोस्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण ...

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त पोस्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक जे.बी.डाखोरे आदी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यात उमरखेड तालुक्यातील निंगनुर येथे सुरज आखरे नावाचा तिन वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या खड्डयात पडला होता. त्याला खड्यातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी काम केल्याबद्दल उमरखेड तहसिलदारासह टीडीआरएफचे हरिश्चंद्र राठोड, शुभम बैस, रोशन राठोड, अभिषेक राजहंस, धीरज राऊत, तनय कोथडे, प्रतिक काळसरपे, पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. राळेगाव तालुक्यात कारेगाव येथे काही दिवसांपूर्वी विहीरीमध्ये गुदमरुन पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तहसिलदार सुरेश कव्हळे व वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांनी स्वत: विहीरीत उतरून धाडस दाखविले होते. त्याबद्दल दोघांचाही पालकमंत्र्यांच्याहस्ते उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. महसूल विभागाच्यावतीने चांगल्या कामासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ अधिकारी व कर्मचारी पुरस्काराने यवतमाळचे नायब तहसिलदार के.एम. बोरकर तसेच उपविभागीय कार्यालयातील लिपीक रत्नदिप मेश्राम यांना गौरविण्यात आले. पोलीस मुख्यालयातील हवालदार विजय रामरावजी इंगोले यांना पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकाच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले होते. त्यांचाही यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून पालकमंत्र्यांनी गौरव केला. केळापूर तालुक्यातील बोरगाव येथील तलाठी ए.पी. मुंजेकर यांना आदर्श तलाठी पुरस्कार तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनानाथ नागोजी आत्राम हे सेवानिवृत्ती नंतरही वणी तहसिल कार्यालयात देत असलेल्या सेवेबद्दल प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)