शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

काही पोलिसांच्या दंडुकेशाहीविरूद्ध असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातून ब्लड बँक कर्मचारी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना त्याला विचारपूस न करता पहिले चोपण्यात आले. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नाही.

ठळक मुद्देसोशल मीडियात चक्क ‘पोलीसराज’ची धमकी : ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासनाच्या आवाहनाला जनमानसातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशा स्थितीत काही महाभाग गालबोट लावण्याचे काम करत आहे. यवतमाळ शहरात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडुकेशाही सुरू केली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना फटकारले तरी कोणाचाच आक्षेप नाही. मात्र विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातून ब्लड बँक कर्मचारी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना त्याला विचारपूस न करता पहिले चोपण्यात आले. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नाही. औषधी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला दंड ठोकला. जयविजय चौकात नगरपरिषद कर्मचाºयाला कर्तव्यावर जात असतानाच मारहाण केली. अशा एकापाठोपाठ अनेक घटना घडत आहेत. रूग्णालयातून सुटी झालेल्या भावाला गावी परत नेण्यासाठी आलेल्या जवळा (ता. आर्णी) येथील युवकाच्या वाहनाला आर्णी रोडवरील वडगाव येथे कारण आणि ओळख सांगूनही बळजबरीने चालान देण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांचा हा सपाटा सुरू आहे. गुरूवारी कळंब चौक परिसरातील एका पथकाने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांचा जमाव बाहेर पडला. तातडीने अतिरिक्त कुमक पोहोचल्याने प्रकरण निवळले. घरात राहून सर्वच नागरिक पोलिसांना सहकार्य करत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, औषधी खरेदीसाठी घराबाहेर पडत आहे. अशांनाही योग्य विचारपूस करूनच पोलिसांनी पुढे जाऊ द्यायला पाहिजे. बहुतांश पोलिसांकडून याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. मात्र काही आतताईपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दंडुकेशाहीचा अवलंब केला आहे. कोणतीही विचारपूस न करता थेट मारहाण केली जाते. हा प्रकार वेळीच नियंत्रणात न आल्यास बंदविरूद्ध जनक्षोभ उसळण्याची भीती आहे. पोलिसराजची धमकी देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्षसंचारबंदी ही एक-दोन दिवसांसाठी लागू नाही. १४ एप्रिलपर्यंत किमान २१ दिवस नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे. अनेकांचा रोजगार यामुळे बुडाला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र या सर्व परिस्थितीतही यवतमाळ जिल्ह्यातील जनता प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. कधी नव्हे अशा स्वरूपाचा बंद सर्वचजण अनुभवत आहे. अशा स्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवर घालणे आवश्यक आहे. त्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन घराबाहेर पडलेल्या व्यक्तीची योग्य चौकशी करूनच त्याला पुढे जाऊ द्यायचे की नाही हे ठरवावे. काहींसाठी आर्थिक दंड, लाठी व इतरही शिक्षा होऊ शकतात, याचा वापर करताना समोरचा व्यक्ती काय सांगतो हे दोन शब्द ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी, पोलिसातील वरिष्ठ अधिकारीही कर्मचाºयांना संयम राखण्याचे निर्देश देत आहेत. मात्र काही पोलीस आपला मनमानी कारभार हाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे शहरात घडलेल्या दोन दिवसातील घटनांवरून स्पष्ट होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस