शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

६५० हेक्टरवरचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:04 IST

तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : गारा घेऊन शेतकरी तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली. कृषी विभागाची यंत्रणा सर्वेक्षणाचे काम करत आहे तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गारा घेऊन बुधवारी तहसील कार्यालयात मदतीसाठी धडक दिली.दारव्हा तालुक्यात सहा हजार ५८९ हेक्टरवर रबीची लागवड झाली आहे. मंगळवारी सायंकाळी अर्धा तास गारपीट झाली. गारा व वादळी पाऊस सोबतच आल्याने पिकाचे नुकसान झाले. अर्ध्या तासात २६ मिमी पावसाची नोंद झाली. नुकसानीच्या सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात ६५० हेक्टर बाधित झाल्याचा अहवाल आहे. सर्वाधिक फटका ३८ गावांना बसला. यात शेलोडी, राजूरा, किन्ही वळगी, तरोडा, बिजोरा, बोथ, गौळपेंड, धूळापूर, मुंडळ, बोरी बु., भोपापूर, फुबगाव, भांडेगाव या गावांचा समावेश आहे.४१२ हेक्टरमधील हरभरा पीक, १८८ हेक्टरमधील गहू, १२ हेक्टरवरील केळी फळबाग, १७ हेक्टरमधील संत्रा फळबाग, दोन हेक्टरवरील आंबा फळबाग, २१ हेक्टरमधील भाजीपाला पीक पूर्णत: नष्ट झाले. खोपडी येथील दत्ता राहाणे या शेतकऱ्यांची पाच एकर आंबा बाग, बोथचे सुभाष पांडुरंग डुकरे यांची संत्र्याची ७०० झाडे नष्ट झाली.या नैसर्गिक आपत्तीने हादरलेल्या डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांनी गारा, गहू, हरभरा, फळबाग पिकांचे अवशेष घेवून थेट तहसील कार्यालय गाठले. नायब तहसीलदार सरागे यांना निवेदन देवून तत्काळ सर्वेक्षण व मदतीची मागणी केली. यावेळी विनोद राठोड, प्रभाकर राठोड, तुळशीराम मेश्राम, बापुराव गव्हाणे, सुधाकर राठोड, भगवान जाधव, गोविंद जाधव, रमेश आडे, रामहरी जामदकर, मिलिंद ढवळे, रमेश जाधव, मारोती गव्हाणे उपस्थित होते. तालुक्यात युद्धपातळीवर नुकसानीचा सर्वे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नालंदा भरणे यांनी दिली.आर्णी तालुक्यातही नुकसानआर्णी : तालुक्यातील लोणबेहळ, आबोडा, कवठाबाजार, राणीधानोरा, साकुर, कोसधनी, सेंदूरसनी, अजनखेड परिसरात शेतातील गहू, हरबरा, तिळ, ज्वारी, मक्का पिकांना फटका बसला. गहू गारपिटीने खाली पडला. महसूल विभागाने नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.