शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

६५० हेक्टरवरचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:04 IST

तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : गारा घेऊन शेतकरी तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली. कृषी विभागाची यंत्रणा सर्वेक्षणाचे काम करत आहे तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गारा घेऊन बुधवारी तहसील कार्यालयात मदतीसाठी धडक दिली.दारव्हा तालुक्यात सहा हजार ५८९ हेक्टरवर रबीची लागवड झाली आहे. मंगळवारी सायंकाळी अर्धा तास गारपीट झाली. गारा व वादळी पाऊस सोबतच आल्याने पिकाचे नुकसान झाले. अर्ध्या तासात २६ मिमी पावसाची नोंद झाली. नुकसानीच्या सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात ६५० हेक्टर बाधित झाल्याचा अहवाल आहे. सर्वाधिक फटका ३८ गावांना बसला. यात शेलोडी, राजूरा, किन्ही वळगी, तरोडा, बिजोरा, बोथ, गौळपेंड, धूळापूर, मुंडळ, बोरी बु., भोपापूर, फुबगाव, भांडेगाव या गावांचा समावेश आहे.४१२ हेक्टरमधील हरभरा पीक, १८८ हेक्टरमधील गहू, १२ हेक्टरवरील केळी फळबाग, १७ हेक्टरमधील संत्रा फळबाग, दोन हेक्टरवरील आंबा फळबाग, २१ हेक्टरमधील भाजीपाला पीक पूर्णत: नष्ट झाले. खोपडी येथील दत्ता राहाणे या शेतकऱ्यांची पाच एकर आंबा बाग, बोथचे सुभाष पांडुरंग डुकरे यांची संत्र्याची ७०० झाडे नष्ट झाली.या नैसर्गिक आपत्तीने हादरलेल्या डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांनी गारा, गहू, हरभरा, फळबाग पिकांचे अवशेष घेवून थेट तहसील कार्यालय गाठले. नायब तहसीलदार सरागे यांना निवेदन देवून तत्काळ सर्वेक्षण व मदतीची मागणी केली. यावेळी विनोद राठोड, प्रभाकर राठोड, तुळशीराम मेश्राम, बापुराव गव्हाणे, सुधाकर राठोड, भगवान जाधव, गोविंद जाधव, रमेश आडे, रामहरी जामदकर, मिलिंद ढवळे, रमेश जाधव, मारोती गव्हाणे उपस्थित होते. तालुक्यात युद्धपातळीवर नुकसानीचा सर्वे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नालंदा भरणे यांनी दिली.आर्णी तालुक्यातही नुकसानआर्णी : तालुक्यातील लोणबेहळ, आबोडा, कवठाबाजार, राणीधानोरा, साकुर, कोसधनी, सेंदूरसनी, अजनखेड परिसरात शेतातील गहू, हरबरा, तिळ, ज्वारी, मक्का पिकांना फटका बसला. गहू गारपिटीने खाली पडला. महसूल विभागाने नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.