शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
2
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
3
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
4
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
5
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
6
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
7
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
8
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
9
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
10
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
11
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
12
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
13
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
14
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
15
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
16
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
17
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
18
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
19
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
20
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:44 IST

शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : पात्राची झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. या नदीत चक्क नागरी वसाहतीतील अतिशय घाण पाणी सोडले जात असल्याने पात्र दूषित झाले आहे.गरजेनुसार आजही काही प्रमाणात शहरात वितरण करण्यासाठी या नदीचे पाणी घेतले जात आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांत गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र या केंद्रात खरोखरच पाण्याचे शुद्धीकरण होते काय, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील दामले फैलभागातून नालिद्वारे मोठ्या प्रमाणावर घाण पाणी नदीत सोडले जात आहे. १५ दिवसांपासून नवरगाव धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले होते. परंतु आता नदीची जलपातळी घटल्याने पात्राची स्थिती विदारक झाली आहे. वणी शहरवासियांची तहान निर्गुडा नदीवरच निर्भर असताना, सन २०१६ मध्ये वेकोलिच्यावतीने यंत्राद्वारे नदी पात्रात सफाई अभियान राबविण्यात आले होते. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. पुढे नदीच्या उद्धारासाठी निर्मल निर्गुडा मिशन राबविण्यात आले. लोकसहभागातून नदी स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या पुढाकारात विविध संघटना व राजकीय पुढारी पुढे आलेत. यातून नदीचे पात्र मोठे करण्यात आले खरे, पण ज्या खडकामुळे नदी स्वच्छ रहायची, तो घाटच उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेवर २० लाख ४० हजार रुपयांचा खर्च झाला. उर्वरित कामे शासनाकडूनही केल्या जाणार असल्याच्या अफवा त्यावेळी पसरविण्यात आल्या. मात्र तसे काहीही घडले नाही. परिणामी नदीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नदी पार करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदी पात्रात दुतर्फा प्रचंड घाण साचली आहे. विसर्जनानिमित्त बांधण्यात आलेला तात्पुरत्या बांधाचा मलबा अद्यापही नदीत पडून आहे. ते काढण्याचा विसर पालिकेला पडला आहे.वाळूची खुलेआम चोरीयंदा पावसाळ्यात निर्गुडा नदीला दोनवेळा मोठे पूर आलेत. त्यामुळे नदीत वाळूदेखील मोठ्या प्रमाणावर आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गणेशपूर पुलाच्या दोन्ही बाजुच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळूची चोरी केली जात आहे. तीन चाकी गाडीतून ही रेती नेली जात आहे. महसूल विभाग मात्र अद्यापही या विषयात अनभिज्ञ आहे.

टॅग्स :riverनदीwater pollutionजल प्रदूषण