शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:44 IST

शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : पात्राची झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. या नदीत चक्क नागरी वसाहतीतील अतिशय घाण पाणी सोडले जात असल्याने पात्र दूषित झाले आहे.गरजेनुसार आजही काही प्रमाणात शहरात वितरण करण्यासाठी या नदीचे पाणी घेतले जात आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांत गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र या केंद्रात खरोखरच पाण्याचे शुद्धीकरण होते काय, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील दामले फैलभागातून नालिद्वारे मोठ्या प्रमाणावर घाण पाणी नदीत सोडले जात आहे. १५ दिवसांपासून नवरगाव धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले होते. परंतु आता नदीची जलपातळी घटल्याने पात्राची स्थिती विदारक झाली आहे. वणी शहरवासियांची तहान निर्गुडा नदीवरच निर्भर असताना, सन २०१६ मध्ये वेकोलिच्यावतीने यंत्राद्वारे नदी पात्रात सफाई अभियान राबविण्यात आले होते. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. पुढे नदीच्या उद्धारासाठी निर्मल निर्गुडा मिशन राबविण्यात आले. लोकसहभागातून नदी स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या पुढाकारात विविध संघटना व राजकीय पुढारी पुढे आलेत. यातून नदीचे पात्र मोठे करण्यात आले खरे, पण ज्या खडकामुळे नदी स्वच्छ रहायची, तो घाटच उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेवर २० लाख ४० हजार रुपयांचा खर्च झाला. उर्वरित कामे शासनाकडूनही केल्या जाणार असल्याच्या अफवा त्यावेळी पसरविण्यात आल्या. मात्र तसे काहीही घडले नाही. परिणामी नदीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नदी पार करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदी पात्रात दुतर्फा प्रचंड घाण साचली आहे. विसर्जनानिमित्त बांधण्यात आलेला तात्पुरत्या बांधाचा मलबा अद्यापही नदीत पडून आहे. ते काढण्याचा विसर पालिकेला पडला आहे.वाळूची खुलेआम चोरीयंदा पावसाळ्यात निर्गुडा नदीला दोनवेळा मोठे पूर आलेत. त्यामुळे नदीत वाळूदेखील मोठ्या प्रमाणावर आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गणेशपूर पुलाच्या दोन्ही बाजुच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळूची चोरी केली जात आहे. तीन चाकी गाडीतून ही रेती नेली जात आहे. महसूल विभाग मात्र अद्यापही या विषयात अनभिज्ञ आहे.

टॅग्स :riverनदीwater pollutionजल प्रदूषण