शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:44 IST

शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : पात्राची झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. या नदीत चक्क नागरी वसाहतीतील अतिशय घाण पाणी सोडले जात असल्याने पात्र दूषित झाले आहे.गरजेनुसार आजही काही प्रमाणात शहरात वितरण करण्यासाठी या नदीचे पाणी घेतले जात आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांत गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र या केंद्रात खरोखरच पाण्याचे शुद्धीकरण होते काय, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील दामले फैलभागातून नालिद्वारे मोठ्या प्रमाणावर घाण पाणी नदीत सोडले जात आहे. १५ दिवसांपासून नवरगाव धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले होते. परंतु आता नदीची जलपातळी घटल्याने पात्राची स्थिती विदारक झाली आहे. वणी शहरवासियांची तहान निर्गुडा नदीवरच निर्भर असताना, सन २०१६ मध्ये वेकोलिच्यावतीने यंत्राद्वारे नदी पात्रात सफाई अभियान राबविण्यात आले होते. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. पुढे नदीच्या उद्धारासाठी निर्मल निर्गुडा मिशन राबविण्यात आले. लोकसहभागातून नदी स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या पुढाकारात विविध संघटना व राजकीय पुढारी पुढे आलेत. यातून नदीचे पात्र मोठे करण्यात आले खरे, पण ज्या खडकामुळे नदी स्वच्छ रहायची, तो घाटच उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेवर २० लाख ४० हजार रुपयांचा खर्च झाला. उर्वरित कामे शासनाकडूनही केल्या जाणार असल्याच्या अफवा त्यावेळी पसरविण्यात आल्या. मात्र तसे काहीही घडले नाही. परिणामी नदीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नदी पार करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदी पात्रात दुतर्फा प्रचंड घाण साचली आहे. विसर्जनानिमित्त बांधण्यात आलेला तात्पुरत्या बांधाचा मलबा अद्यापही नदीत पडून आहे. ते काढण्याचा विसर पालिकेला पडला आहे.वाळूची खुलेआम चोरीयंदा पावसाळ्यात निर्गुडा नदीला दोनवेळा मोठे पूर आलेत. त्यामुळे नदीत वाळूदेखील मोठ्या प्रमाणावर आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गणेशपूर पुलाच्या दोन्ही बाजुच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळूची चोरी केली जात आहे. तीन चाकी गाडीतून ही रेती नेली जात आहे. महसूल विभाग मात्र अद्यापही या विषयात अनभिज्ञ आहे.

टॅग्स :riverनदीwater pollutionजल प्रदूषण