शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दिग्रसचे धरण ठरतेय मृत्यूचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनांदगव्हाण, अरुणावती : सुरक्षा यंत्रणा नाही, आतापर्यंत अनेकांचे गेले बळी

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले नांदगव्हाण व अरुणावती धरण मृत्यूचे केंद्र ठरत आहे. गेल्या काही दिवसात या धरणात पडून अनेकांचे बळी गेले आहे.नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.धरणावर संबंधित विभागाने कोणतीच सुरक्षा व्यवस्था उभारली नाही. यावर्षी पावसामुळे नांदगव्हाण धरण ओव्हरफ्लो झाले. अरुणावती धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. धरणाचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी अनेकजण भेटी देतात. मात्र त्यापैकी काही जण घरी परत पोहोचू शकत नाही. आतापर्यंत स्टंटबाजीच्या नादात काहींचा जीव गेला. तरीही सुरक्षात्मक पावले उचलण्यात आली नाही.प्रेमी युगुलांसाठी नंदनवननांदगव्हाण व अरुणावती धरणाचे ठिकाण म्हणजे प्रेमी युगुलांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यांची नेहमी या परिसरात रेलचेल असते. त्यातूनही अनेक अघटित घटना घडतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी किमान प्रवेशद्वारावर सुरक्षा यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. दोन्ही धरणांवर लहान मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. त्यातूनही अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प