शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डायरियाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 22:25 IST

दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्याचा परिणाम : ‘मेडिकल’मध्ये शंभरावर रुग्ण दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. यवतमाळ शहरात नळावाटे येणाऱ्या दूषित पाण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याच दूषित पाण्याने शहरातील विविध भागात डायरियाची लागण झाली आहे.यवतमाळ शहरातील सिंघानियानगर, वंजारीफैल, पिंपळगाव, चमेडियानगर या भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. यवतमाळ शहरात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गत १५ दिवसांपासून निळोणा प्रकल्पाचे पाणी नळावाटे सोडले जात आहे. मात्र या पाण्याच्या गुणवत्तेवर नागरिकांना सुरुवातीपासूनच शंका आहे. अनेक भागात नळावाटे आलेले पाणी दुर्गंधी युक्त आणि हिरवट रंगाचे होते. त्यातच शहरातील शिवाजी गार्डन परिसरात नळ योजनेचा मुख्य व्हॉल फुटून गटाराचे पाणी शिरले आहे. तेच पाणी नळावाटे वितरित होत आहे. त्यामुळे ही डायरियाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यवतमाळ शहरात एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईमुळे दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे डायरियाचे रुग्णही सातत्याने येत आहेत. माळीपुरा परिसरात कॉलरा सारख्या आजाराचीही भर उन्हाळ्यात लागण झाली होती. यात एकाचा मृत्यूही झाला. २ एप्रिलपासून वैद्यकीय महाविद्यालयात ३२४ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ४३ रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहे.जिल्ह्यातील वाटखेड, म्हसोला, जामडोह, नागीपोड, वडकी, तिवसा, येवती, मांगलादेवी या गावातूनही मोठ्या प्रमाणात डायरियाचे रुग्ण उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले व वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयात १५ जून २६ जून या दहा दिवसात तब्बल ९८ रुग्ण दाखल झाले. मोठ्या प्रमाणात डायरियाचे रुग्ण येत असल्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी प्रशासनालाही याची माहिती दिलेली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालयाला डायरियाची लागण झाल्याबाबत अवगत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात विहिरींचे पाणी निर्जंतुकीकरण होत नसल्यानेही आजार बळावत आहे. याकडे पंचायत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.अशी घ्या पावसाळ्यात आरोग्याची काळजीपावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने डायरियाचा आजार बळावतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे.पाणी व अन्य पदार्थ हे झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन ड्रॉप टाकावा. पाणी काढण्यासाठी दांडीच्या भाड्याचा वापर करावा.उघड्यावरचे अन्न पदार्थ खावू नये, गरम व नुकतेच शिजलेले अन्न पदार्थ खावे. कच्च्या पालेभाज्या व अर्धवट शिजलेले अन्न पदार्थ खान्याचे टाळावे.जेवणापूर्वी व शौचालयानंतर साबनाने हात धुवावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. कटाक्षाने शौचालयाचा वापर करावा.उघड्यावर कचरा टाकू नये. घरात माशा होणार नाही, याची काळजी घ्यावी. लहान मुलांना खेळल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून द्यावे आदी दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.शासकीय रुग्णालयात डायरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज आहे. आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. त्या भागात उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना वैद्यकीय महाविद्यालयाकडून नियमित माहिती देण्यात येत आहे.- डॉ.मनीष श्रीगिरीवार,अधिष्ठाता, वैद्यकीयमहाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय