शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डायरियाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 22:25 IST

दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्याचा परिणाम : ‘मेडिकल’मध्ये शंभरावर रुग्ण दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. यवतमाळ शहरात नळावाटे येणाऱ्या दूषित पाण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याच दूषित पाण्याने शहरातील विविध भागात डायरियाची लागण झाली आहे.यवतमाळ शहरातील सिंघानियानगर, वंजारीफैल, पिंपळगाव, चमेडियानगर या भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. यवतमाळ शहरात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गत १५ दिवसांपासून निळोणा प्रकल्पाचे पाणी नळावाटे सोडले जात आहे. मात्र या पाण्याच्या गुणवत्तेवर नागरिकांना सुरुवातीपासूनच शंका आहे. अनेक भागात नळावाटे आलेले पाणी दुर्गंधी युक्त आणि हिरवट रंगाचे होते. त्यातच शहरातील शिवाजी गार्डन परिसरात नळ योजनेचा मुख्य व्हॉल फुटून गटाराचे पाणी शिरले आहे. तेच पाणी नळावाटे वितरित होत आहे. त्यामुळे ही डायरियाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यवतमाळ शहरात एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईमुळे दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे डायरियाचे रुग्णही सातत्याने येत आहेत. माळीपुरा परिसरात कॉलरा सारख्या आजाराचीही भर उन्हाळ्यात लागण झाली होती. यात एकाचा मृत्यूही झाला. २ एप्रिलपासून वैद्यकीय महाविद्यालयात ३२४ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ४३ रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहे.जिल्ह्यातील वाटखेड, म्हसोला, जामडोह, नागीपोड, वडकी, तिवसा, येवती, मांगलादेवी या गावातूनही मोठ्या प्रमाणात डायरियाचे रुग्ण उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले व वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयात १५ जून २६ जून या दहा दिवसात तब्बल ९८ रुग्ण दाखल झाले. मोठ्या प्रमाणात डायरियाचे रुग्ण येत असल्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी प्रशासनालाही याची माहिती दिलेली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालयाला डायरियाची लागण झाल्याबाबत अवगत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात विहिरींचे पाणी निर्जंतुकीकरण होत नसल्यानेही आजार बळावत आहे. याकडे पंचायत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.अशी घ्या पावसाळ्यात आरोग्याची काळजीपावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने डायरियाचा आजार बळावतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे.पाणी व अन्य पदार्थ हे झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन ड्रॉप टाकावा. पाणी काढण्यासाठी दांडीच्या भाड्याचा वापर करावा.उघड्यावरचे अन्न पदार्थ खावू नये, गरम व नुकतेच शिजलेले अन्न पदार्थ खावे. कच्च्या पालेभाज्या व अर्धवट शिजलेले अन्न पदार्थ खान्याचे टाळावे.जेवणापूर्वी व शौचालयानंतर साबनाने हात धुवावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. कटाक्षाने शौचालयाचा वापर करावा.उघड्यावर कचरा टाकू नये. घरात माशा होणार नाही, याची काळजी घ्यावी. लहान मुलांना खेळल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून द्यावे आदी दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.शासकीय रुग्णालयात डायरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज आहे. आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. त्या भागात उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना वैद्यकीय महाविद्यालयाकडून नियमित माहिती देण्यात येत आहे.- डॉ.मनीष श्रीगिरीवार,अधिष्ठाता, वैद्यकीयमहाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय