शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

ढाणकीची पाणीटंचाई पाचवीलाच पुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:57 IST

ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी विहिरीवर रांग, गावाची पाणीपुरवठा योजना पडली ठप्प

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत.नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर गावाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा दुवा असलेले मुख्याधिकारी येथे राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांचे दर्शनच झाले नाही. ढाणकीला पैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा होत होता. मात्र आता पैनगंगा नदीचे गांजेगाव येथील दरवाजे उघडल्याने तेथे नदी पात्रात पाणीच उरले नाही. तेथे साचलेल्या गढूळ पाण्याचा ढाणकीला पुरवठा करण्यात आला. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून आलेले हेच पाणी त्यांना प्राशन करावे लागले. त्यावर शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करता तसेच पाणी गावकऱ्यांना पुरविण्यात आले. दूषित पाणी हेच सर्व साथ रोगांचे मूळ कारण असते. मात्र कपडे धुण्यायोग्य हे पाणी नसताना ढाणकीवासीयांना असे पाणी पुरवठा करणारे शासन, प्रशासन मूग गिळून बसले. वरिष्ठ अदिकारी, लोकप्रतिनिधी हे पाणी प्राशन करतील काय, असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहे.गावातील पाणी विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात चालावा, यासाठीच तर हा खटाटोप नाही ना, अशी शंका गावकरी उपस्थित करीत आहे. गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असताना लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यांना जनतेचे कोणतेही सोयसुतक नाही. दरवर्षी पाणीटंचाई येते, मग आंदोलने होतात, वेळ मारून नेण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र गावाला कायमस्वरूपी व्यवस्था न झाल्याने सर्वांनीच या गावाला वाºयावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे.ढाणकीकर संयमी असल्याने त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नाही. परिणामी आबालवृद्ध भर उन्हात, रात्री हंडाभर पाण्यासाठी डोक्यांवर भांडी घेऊन वणवण भटकत आहे. आपल्या मुलीवरही लग्नानंतर जन्मभर असेच पाणी भरण्याची वेळ येईल, या भीतीने गावात मुलगी द्यायला वधू पिता धजावत नाही. दुसरीकडे माहेरवाशीन मुलीला माहेरी येण्याची विनवणी करताना पालकांना जड जात आहे. या परिस्थितीवर एका पित्याने चक्क कविताच लिहिली. ही कविता सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या कवितेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर मांडली जात आहे. सोबतच प्रशासनाची लक्तरे टांगली जात आहे.बापाच काळीज चर्रर्र, रसाला येऊ नकोउन्हाळ्यात प्रत्येक मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुरलेली असते. विदर्भात उन्हाळ्यात मुली माहेरा येतात. सोबत जावयालाही आंब्याच्या रसासाठी बोलविण्याची पद्धत आहे. मात्र ढाणकीत पाणीटंचाईमुळे बापाचे काळीज चर्रर्र होत आहे. स्वत: पिताच मुलीला माहेरी येऊ नको म्हणून विनवणी करीत आहे. परिणामी यावर्षी उन्हाळ्यात बापाच्या घरी जाऊन पाहुणपण करणाºया मुलींच्या नशीबी चार सुखाचे क्षण येणार की नाही, असा प्रश्न आहे. मुलींची ाालमेल होत आहे. वर्षातून एकदा तरी माहेरी जाण्यासाठी त्या आसुसलेल्या आहेत. मात्र ढाणकीतील पाणीटंचाईमुळे जन्मदातेच त्यांना माहेरी येण्यापासून रोखत असल्याचे विदारक चित्र आहे. एका बापाने आपल्या कवितेतून अव्यवस्थेवर जोरदार आसूड ओढला आहे. तथापि लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आणि सर्व व्यवस्थाच निगरगट्ट झाली आहे. आता समाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ढाणकीतील महिला, नागरिकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.मुली तु ढाणकीला माहेरी येऊ नकोमुली तु ढाणकीला माहेरी येऊ नको,मी तुझा बाप स्वत: म्हणतो,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,उगीच स्वत:ची आबदा करुन घेऊ नको,पंधरा-पंधरा दिवस येथे नळाला पाणी येत नाही,विनंती, तक्रार केली, तरी कोणी दखल घेत नाही,सुखी जीव तू तुझा उगी टांगणीला ठेवू नको,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,येथे सर्व रस्त्यात जीवघेणे खड्डे,दुर्गंधीचे राज्य,प्रचंड माती आणि धुळीचे साम्राज्य,चांगल्या शरीराला आजाराचे निमंत्रण देऊ नको,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,निष्क्रीय राजकारण्यांच्या दहशतीचा ताप आहे,त्रासाची आम्हां सवय, तू काळजी करू नको,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको’.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई