शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

ढाणकीची पाणीटंचाई पाचवीलाच पुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:57 IST

ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी विहिरीवर रांग, गावाची पाणीपुरवठा योजना पडली ठप्प

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत.नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर गावाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा दुवा असलेले मुख्याधिकारी येथे राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांचे दर्शनच झाले नाही. ढाणकीला पैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा होत होता. मात्र आता पैनगंगा नदीचे गांजेगाव येथील दरवाजे उघडल्याने तेथे नदी पात्रात पाणीच उरले नाही. तेथे साचलेल्या गढूळ पाण्याचा ढाणकीला पुरवठा करण्यात आला. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून आलेले हेच पाणी त्यांना प्राशन करावे लागले. त्यावर शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करता तसेच पाणी गावकऱ्यांना पुरविण्यात आले. दूषित पाणी हेच सर्व साथ रोगांचे मूळ कारण असते. मात्र कपडे धुण्यायोग्य हे पाणी नसताना ढाणकीवासीयांना असे पाणी पुरवठा करणारे शासन, प्रशासन मूग गिळून बसले. वरिष्ठ अदिकारी, लोकप्रतिनिधी हे पाणी प्राशन करतील काय, असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहे.गावातील पाणी विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात चालावा, यासाठीच तर हा खटाटोप नाही ना, अशी शंका गावकरी उपस्थित करीत आहे. गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असताना लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यांना जनतेचे कोणतेही सोयसुतक नाही. दरवर्षी पाणीटंचाई येते, मग आंदोलने होतात, वेळ मारून नेण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र गावाला कायमस्वरूपी व्यवस्था न झाल्याने सर्वांनीच या गावाला वाºयावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे.ढाणकीकर संयमी असल्याने त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नाही. परिणामी आबालवृद्ध भर उन्हात, रात्री हंडाभर पाण्यासाठी डोक्यांवर भांडी घेऊन वणवण भटकत आहे. आपल्या मुलीवरही लग्नानंतर जन्मभर असेच पाणी भरण्याची वेळ येईल, या भीतीने गावात मुलगी द्यायला वधू पिता धजावत नाही. दुसरीकडे माहेरवाशीन मुलीला माहेरी येण्याची विनवणी करताना पालकांना जड जात आहे. या परिस्थितीवर एका पित्याने चक्क कविताच लिहिली. ही कविता सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या कवितेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर मांडली जात आहे. सोबतच प्रशासनाची लक्तरे टांगली जात आहे.बापाच काळीज चर्रर्र, रसाला येऊ नकोउन्हाळ्यात प्रत्येक मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुरलेली असते. विदर्भात उन्हाळ्यात मुली माहेरा येतात. सोबत जावयालाही आंब्याच्या रसासाठी बोलविण्याची पद्धत आहे. मात्र ढाणकीत पाणीटंचाईमुळे बापाचे काळीज चर्रर्र होत आहे. स्वत: पिताच मुलीला माहेरी येऊ नको म्हणून विनवणी करीत आहे. परिणामी यावर्षी उन्हाळ्यात बापाच्या घरी जाऊन पाहुणपण करणाºया मुलींच्या नशीबी चार सुखाचे क्षण येणार की नाही, असा प्रश्न आहे. मुलींची ाालमेल होत आहे. वर्षातून एकदा तरी माहेरी जाण्यासाठी त्या आसुसलेल्या आहेत. मात्र ढाणकीतील पाणीटंचाईमुळे जन्मदातेच त्यांना माहेरी येण्यापासून रोखत असल्याचे विदारक चित्र आहे. एका बापाने आपल्या कवितेतून अव्यवस्थेवर जोरदार आसूड ओढला आहे. तथापि लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आणि सर्व व्यवस्थाच निगरगट्ट झाली आहे. आता समाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ढाणकीतील महिला, नागरिकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.मुली तु ढाणकीला माहेरी येऊ नकोमुली तु ढाणकीला माहेरी येऊ नको,मी तुझा बाप स्वत: म्हणतो,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,उगीच स्वत:ची आबदा करुन घेऊ नको,पंधरा-पंधरा दिवस येथे नळाला पाणी येत नाही,विनंती, तक्रार केली, तरी कोणी दखल घेत नाही,सुखी जीव तू तुझा उगी टांगणीला ठेवू नको,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,येथे सर्व रस्त्यात जीवघेणे खड्डे,दुर्गंधीचे राज्य,प्रचंड माती आणि धुळीचे साम्राज्य,चांगल्या शरीराला आजाराचे निमंत्रण देऊ नको,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,निष्क्रीय राजकारण्यांच्या दहशतीचा ताप आहे,त्रासाची आम्हां सवय, तू काळजी करू नको,मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको’.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई