शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उदयोन्मुख महिला सरपंचाने साधला कुंभारीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:39 IST

तालुक्यातील कुंभारी गावातून पहिल्यांदा सामान्य महिला मधून प्रिती सतीश भोयर यांची सरपंच म्हणून निवड झाली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रितीतार्इंनी गावात विकास कामाचा सपाटा लावला.

ठळक मुद्देविविध पुरस्कार प्राप्त : विकास कामांसाठी गावात आणला कोट्यवधींचा निधी

विठ्ठल कांबळे ।ऑनलाईन लोकमतघाटंजी : तालुक्यातील कुंभारी गावातून पहिल्यांदा सामान्य महिला मधून प्रिती सतीश भोयर यांची सरपंच म्हणून निवड झाली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रितीतार्इंनी गावात विकास कामाचा सपाटा लावला. त्यामुळे या गावाने तालुका ते राज्य पातळीपर्यंत आपला ठसा उमटविला. या उदयोन्मुख नेतृत्वाचा ‘लोकमत’ने सरपंच अवार्ड देऊन गौरव केला.सरपंचपदी निवड होताच सर्वप्रथम प्रितीतार्इंनी ग्रामसभेद्वारे जेष्ठ नागरिक व तरुणांच्या सहकार्याने विविध समित्या स्थापन केल्या. कामाच्या गरजेनुसार तीन टप्पे करण्यात आले. त्यात अत्यावश्यक गावाची गरज, आवश्यक गावाची गरज आणि सोईनुसार गावाची गरज अशी विभागणी केली. त्यानुसार कामाला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने कुंभारी गाव महाराष्टÑ शासनाच्या आदर्श गाव उपक्रमासाठी निवडले गेले. जिल्हाधिकाºयांनी या गावाच्या विकासासाठी दोन कोटी २० लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे गावाच्या विकासात भर पडली. केंद्र शासनाच्या स्मार्ट व्हिलेज जिल्ह्यातून गावाची निवड झाली. आता विभागीय स्पर्धेसाठी गाव प्रस्तावित आहे. आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत या गावाने भाग घेतला. नाम संस्थेचे उपक्रम घाटंजी विकास गंगा संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात.गावातील नाल्यांचे रुंदीकरण, वृक्ष लागवड, हायमास्क लाईट, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, डिजीटल अंगणवाडी, कोपरा गार्डन, आदिवासी चावडी, दलितवस्ती सुशोभिकरण, महात्मा गांधी भवन, घरकूल योजना, मंदिर सौंदर्यीकरण, पाणी पुरवठा, गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासोबतच, नशाबंदी, नसबंदी, चराईबंदी, लोटाबंदी, कुऱ्हाडबंदी आदी उपक्रम राबविण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी मशीन बसवून पाच रुपयात एटीएम द्वारे २० लीटर पाणी दिले जात आहे. गावात मुख्य ठिकाणी १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. चुलमुक्त योजनेतून ३० गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा या गावाला लाभ मिळणार आहे. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने या गावाची विकासाकडे घोडदौड सुरु आहे.या गावाला निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज पुरस्कार, आदर्श गाव निवड आदी पुरस्कार मिळाले आहे. सरपंच प्रितीताई भोयर यांना सचिव संतोष माहूरे, उपसरपंच रुपराव डुबे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, बचत गट सहकार्य करीत असते. शिक्षक नारायण भोयर यांचे मोलाचे मार्गदर्शनही त्यांना मिळते.

टॅग्स :sarpanchसरपंच