शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नेर नगरपरिषदेच्या विकास आराखड्याचा तिढा सुटला

By admin | Updated: August 3, 2014 23:38 IST

जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या नेर-नबाबपूर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २०११ मध्येच स्थानिक नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले.

नेर : जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या नेर-नबाबपूर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २०११ मध्येच स्थानिक नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या प्राधिकरणाला विकास आराखडा सादर करण्यासाठी ४ आॅक्टोबर २०१३ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत आराखडा सादर न झाल्याने नगररचना संचालकांनी स्थानिक नियोजन प्राधिकरणाला हद्दपार केले. या विरोधातच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने अंतिरिम स्थगनादेश दिला आहे. यामुळे शहर विकासाच्या आराखड्याचा तिढा सुटणार आहे. शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्यावतीने सर्व तांत्रिक बाबींची कार्यपूर्ती करण्याकरिता सहायक संचालक नगररचना यवतमाळ यांची नगररचना अधिकारी म्हणून नगरपरिषदेने नियुक्ती केली. हा आराखडा सादर करण्यासाठी शासनाकडून गरजेनुसार मुदतवाढही मंजूर करून घेतली. नियमानुसार दोन वर्षाच्या आत वाढीव मुदतीच्या म्हणजे ४ आॅक्टोबर २०१३ अगोदर हा विकास आराखडा प्रसिद्ध करणे आवश्यक होते. प्रारूप योजना प्रसिद्धीकरिता नगररचना विभागाने नगरपरिषदेला हस्तांतरित केला. त्यावेळी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. हा आराखडा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला आहे. मात्र आचारसंहिता असल्याने सभाच झाली नाही. नगरचना विभागाने या बाबत कोणताही निर्णय व सूचना दिल्या नाही. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात येताच नगरपरिषदेने प्रारूप योजना प्रसिद्ध करून आक्षेप मागविले. नगरचना विभागाने प्रस्तावित मुदतवाढीची मंजुरी गृहीत धरून प्राप्त आक्षेपावर निर्णय घेण्याकरिता कलम २८ २ नुसार तज्ज्ञ समितीची संचालकांनी नियुक्ती करून प्रक्रिया पुढे नेली. मात्र संचालकांनी निवडणुकीचा कालावधी ग्राह्य न धरता २४ १ नुसार स्ािनिक विकास योजना प्रक्रियेतून नियोजन प्राधिकरण नगरपरिषदेस हद्दपार केले आणि पुढील कार्यवाही करण्याकरिता अधिकारी नियुक्तीचे आदेश दिले. या अन्यायकारक निर्णयाने नगरपरिषदेच्या अधिकारावर गदा आली. स्थानिकाच्या दृष्टीने असलेली गंभीर बाब होती. या प्रकरणी नगराध्यक्ष पवन जयस्वाल व नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणात अंतिरिम स्थगनादेश दिला. या खटल्यात नगरपरिषदेच्यावतीने अ‍ॅड.प्रवीण देशमुख यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाच्या निकालाने शहर विकासाच्या आराखड्याला गती मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)