शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्मनियोजन आराखड्यातून विकास

By admin | Updated: January 20, 2015 22:43 IST

प्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुकेश इंगोले - दारव्हाप्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एकात्मिक नियोजनाद्वारे स्थानिक गरजांना अनुसरून विविध योजनांच्या समन्वयाद्वारे गतीमान व समतोल विकास साधण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समितीचे गठन करण्यात आले आहे. नियोजनाची ही लोकाभिमुख कार्यपद्धती अधिक विकसित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष असे की, संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात दारव्हा तालुक्यातून होत आहे. मुंगसाजी महाराजांची पावन भूमी असलेल्या धामणगाव (देव) या गावी उद्या बुधवारला जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यात सदर निर्णय अंमलात आणला जाईल. पुढच्या टप्प्यात राज्यात उर्वरित जिल्ह्यात हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास तसेच नियोजन विभागाच्यावतीने यशदा संस्थेच्या मदतीने राज्यातील सहा महसुली विभागातील प्रत्येकी एका मागास तालुक्यात लोकसहभागावर आधारित ग्राम सूक्ष्म नियोजनाद्वारे एकात्मिक ग्रामपंचायत आराखडे तयार करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवच्या आधारे येथून पुढे सूक्ष्म नियोजन पद्धतीने जिल्हा आराखडे तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचातय स्तरावरील सूक्ष्म नियोजन सतत सहा दिवस चालेल. या प्रक्रियेमध्ये लोकसहभागाची विविध मनोरंजक तंत्रे जसे मशालफेरी, शिवार फेरी, संसाधन नकाशा, सामाजिक नकाशा, ऋतूचक्राचे विश्लेषण इत्यादीद्वारे गावातील विकासाचे प्रश्न, समस्या यावर सर्वांच्या सहभागातून चर्चा करण्यात येईल. कुटुंब सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक घरातील स्थिती व समस्या जाणून घेणे, गावातील वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र इत्यादींना भेटी देवून प्रत्येक क्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधा व त्रुटी, कमतरता याची गाव पातळीवरील नियोजन प्रपत्रामध्ये नोंद करण्यात येईल.अशाप्रकारे सतत चार दिवस लोकसहभागातून गावामध्ये चर्चा, माहिती संकलन इत्यादी झाल्यानंतर पाचव्या दिवशी वार्डनिहाय सभा त्यानंतर महिला ग्रामसभा होईल व शेवटच्या दिवशी ग्रामसभा घेवून सर्व माहिती, समस्या, प्रस्तावित उपाययोजना यावर सांगोपांग चर्चा होईल. उपरोक्त प्रक्रियेच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुढील १५ वर्षे कालावधीतील विकासाचा दृष्टिक्षेप, विविध शासकीय योजनांखाली घ्यावयाची कामे निधी याचा विकास आराखडा व त्याचबरोबर गावपातळीवर लोकसहभागातून स्वयंस्फूर्तीने करावयाच्या कार्यक्रमांचा गाव कृती आराखडा संमत करण्यात येईल. सूक्ष्मनियोजनाच्या आरंभी ग्रामसंसाधन गट तयार करण्यात येईल, या गटामध्ये ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी, बचत गटाचे सदस्य, युवक मंडळाचे सदस्य व इतर इच्छुक ग्रामस्थांचा समावेश राहणार आहे व गटाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असणाऱ्या धामणगाव (देव) येथून होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे त्यांचे कर्मचारी धामणगावचे सरपंच जगदीश जाधव व गावातील नगारिक परिश्रम घेत आहे.