शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

सूक्ष्मनियोजन आराखड्यातून विकास

By admin | Updated: January 20, 2015 22:43 IST

प्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुकेश इंगोले - दारव्हाप्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एकात्मिक नियोजनाद्वारे स्थानिक गरजांना अनुसरून विविध योजनांच्या समन्वयाद्वारे गतीमान व समतोल विकास साधण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समितीचे गठन करण्यात आले आहे. नियोजनाची ही लोकाभिमुख कार्यपद्धती अधिक विकसित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष असे की, संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात दारव्हा तालुक्यातून होत आहे. मुंगसाजी महाराजांची पावन भूमी असलेल्या धामणगाव (देव) या गावी उद्या बुधवारला जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यात सदर निर्णय अंमलात आणला जाईल. पुढच्या टप्प्यात राज्यात उर्वरित जिल्ह्यात हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास तसेच नियोजन विभागाच्यावतीने यशदा संस्थेच्या मदतीने राज्यातील सहा महसुली विभागातील प्रत्येकी एका मागास तालुक्यात लोकसहभागावर आधारित ग्राम सूक्ष्म नियोजनाद्वारे एकात्मिक ग्रामपंचायत आराखडे तयार करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवच्या आधारे येथून पुढे सूक्ष्म नियोजन पद्धतीने जिल्हा आराखडे तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचातय स्तरावरील सूक्ष्म नियोजन सतत सहा दिवस चालेल. या प्रक्रियेमध्ये लोकसहभागाची विविध मनोरंजक तंत्रे जसे मशालफेरी, शिवार फेरी, संसाधन नकाशा, सामाजिक नकाशा, ऋतूचक्राचे विश्लेषण इत्यादीद्वारे गावातील विकासाचे प्रश्न, समस्या यावर सर्वांच्या सहभागातून चर्चा करण्यात येईल. कुटुंब सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक घरातील स्थिती व समस्या जाणून घेणे, गावातील वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र इत्यादींना भेटी देवून प्रत्येक क्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधा व त्रुटी, कमतरता याची गाव पातळीवरील नियोजन प्रपत्रामध्ये नोंद करण्यात येईल.अशाप्रकारे सतत चार दिवस लोकसहभागातून गावामध्ये चर्चा, माहिती संकलन इत्यादी झाल्यानंतर पाचव्या दिवशी वार्डनिहाय सभा त्यानंतर महिला ग्रामसभा होईल व शेवटच्या दिवशी ग्रामसभा घेवून सर्व माहिती, समस्या, प्रस्तावित उपाययोजना यावर सांगोपांग चर्चा होईल. उपरोक्त प्रक्रियेच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुढील १५ वर्षे कालावधीतील विकासाचा दृष्टिक्षेप, विविध शासकीय योजनांखाली घ्यावयाची कामे निधी याचा विकास आराखडा व त्याचबरोबर गावपातळीवर लोकसहभागातून स्वयंस्फूर्तीने करावयाच्या कार्यक्रमांचा गाव कृती आराखडा संमत करण्यात येईल. सूक्ष्मनियोजनाच्या आरंभी ग्रामसंसाधन गट तयार करण्यात येईल, या गटामध्ये ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी, बचत गटाचे सदस्य, युवक मंडळाचे सदस्य व इतर इच्छुक ग्रामस्थांचा समावेश राहणार आहे व गटाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असणाऱ्या धामणगाव (देव) येथून होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे त्यांचे कर्मचारी धामणगावचे सरपंच जगदीश जाधव व गावातील नगारिक परिश्रम घेत आहे.