शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

महिलांनी कष्टाने उभी केलेली शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.

ठळक मुद्देदारुबंदीच्या भूमिकेने केला घात : रुढा गावातील घटनेने चीड, शेवग्याची झाडे अज्ञातांनी कापून फेकली

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावखेड्यातील दहा महिला एकत्र आल्या. सामूहिक शेतीचा संकल्प त्यांनी केला. प्रत्येकीने तळपत्या उन्हात भविष्याची सोनेरी स्वप्न पाहून मातीत घाम गाळला. त्यातून शेवगा शेती केली. परंतु दारुविके्रत्यांनी त्यांची शेतीच उद्ध्वस्त केली. हा संतापजनक प्रकार रुढा गावात सोमवारी रात्री घडला.शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.या चीड आणणाऱ्या प्रकाराला सूडबुध्दीची किनार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी प्रामाणिकपणे जनजागृतीचे कार्य केले. यात जागृती बचत गटाच्या महिलाही मागे नव्हत्या. गावात कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महिलांच्या पुढाकारात दारूबंदीची घोषणा करण्यात आली. गावासोबतच बाहेरगावचे पण लोकं रुढामध्ये दारु पिण्यासाठी यायचे. त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोना होऊ नये, यासाठी दारुबंदी केली.परंतु विनंती करूनही कोणी दारुविक्री थांबविली नाही. त्यामुळे महिलांनी स्वत: दारुविक्री बंद पाडली. पोलिीसांना दारू पकडून दिली. याचाच राग म्हणून दारुविके्रत्यांनी महिलांच्या सामूहिक शेतातील पाणी देणाºया मोटारचे पाईप कापले. पण महिलाही खचून गेल्या नाही. त्यांनी हार न मानता हिमतीने डोक्यावरुन गुंडांनी पाणी दिले. महिला असूनही हार मानायला तयार नसल्याने दारुविक्रेते आणखी बैचेन झाले. आता तर त्यांची चक्क शेवग्याची झाडेच कापून टाकली. यात शेताचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकारामुळे महिलांना मोठा धक्का बसला. या घटनेची तक्रार अश्विनी घोंगडे यांनी कळंब पोलिसात केली. प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण महिलांच्या विकासाला खीळकष्टातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ग्रामीण महिलांना उभारी देण्याचे काम करण्याऐवजी त्यांचे पंख छाटण्याचे पाप या काही लोकांनी केले. येणाºया काळात या महिला शेतीपूरक इतर व्यवसायातही यशस्वी ठरु शकल्या असत्या. परंतु त्यांना उभारी न देता मागे खेचण्याचे काम करण्यात आले. आता या महिला पुरत्या खचून गेल्या आहे. त्यांना खऱ्या अर्थाने आता आर्थिक मदतीची गरज आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी