शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

महिलांनी कष्टाने उभी केलेली शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.

ठळक मुद्देदारुबंदीच्या भूमिकेने केला घात : रुढा गावातील घटनेने चीड, शेवग्याची झाडे अज्ञातांनी कापून फेकली

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावखेड्यातील दहा महिला एकत्र आल्या. सामूहिक शेतीचा संकल्प त्यांनी केला. प्रत्येकीने तळपत्या उन्हात भविष्याची सोनेरी स्वप्न पाहून मातीत घाम गाळला. त्यातून शेवगा शेती केली. परंतु दारुविके्रत्यांनी त्यांची शेतीच उद्ध्वस्त केली. हा संतापजनक प्रकार रुढा गावात सोमवारी रात्री घडला.शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.या चीड आणणाऱ्या प्रकाराला सूडबुध्दीची किनार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी प्रामाणिकपणे जनजागृतीचे कार्य केले. यात जागृती बचत गटाच्या महिलाही मागे नव्हत्या. गावात कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महिलांच्या पुढाकारात दारूबंदीची घोषणा करण्यात आली. गावासोबतच बाहेरगावचे पण लोकं रुढामध्ये दारु पिण्यासाठी यायचे. त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोना होऊ नये, यासाठी दारुबंदी केली.परंतु विनंती करूनही कोणी दारुविक्री थांबविली नाही. त्यामुळे महिलांनी स्वत: दारुविक्री बंद पाडली. पोलिीसांना दारू पकडून दिली. याचाच राग म्हणून दारुविके्रत्यांनी महिलांच्या सामूहिक शेतातील पाणी देणाºया मोटारचे पाईप कापले. पण महिलाही खचून गेल्या नाही. त्यांनी हार न मानता हिमतीने डोक्यावरुन गुंडांनी पाणी दिले. महिला असूनही हार मानायला तयार नसल्याने दारुविक्रेते आणखी बैचेन झाले. आता तर त्यांची चक्क शेवग्याची झाडेच कापून टाकली. यात शेताचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकारामुळे महिलांना मोठा धक्का बसला. या घटनेची तक्रार अश्विनी घोंगडे यांनी कळंब पोलिसात केली. प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण महिलांच्या विकासाला खीळकष्टातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ग्रामीण महिलांना उभारी देण्याचे काम करण्याऐवजी त्यांचे पंख छाटण्याचे पाप या काही लोकांनी केले. येणाºया काळात या महिला शेतीपूरक इतर व्यवसायातही यशस्वी ठरु शकल्या असत्या. परंतु त्यांना उभारी न देता मागे खेचण्याचे काम करण्यात आले. आता या महिला पुरत्या खचून गेल्या आहे. त्यांना खऱ्या अर्थाने आता आर्थिक मदतीची गरज आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी