शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोट्यवधींचा निधी मिळूनही स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे वाटचाल, विकासाला लागले ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST

ग्राऊंड रिपोर्ट फोटो अखिलेश अग्रवाल पुसद : धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पुसद शहर अवतीभवतीच्या वनराई व डोंगर कपारींनी नैसर्गिक ...

ग्राऊंड रिपोर्ट

फोटो

अखिलेश अग्रवाल

पुसद : धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पुसद शहर अवतीभवतीच्या वनराई व डोंगर कपारींनी नैसर्गिक जीवनाची अनुभूती देते. मात्र, अनियमित स्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा, तुंबलेल्या नाल्या, गल्लीबोळातील घाण असे चित्र पहावयास मिळते. कोट्यवधींचा निधी मिळूनही शहराची वाटचाल स्वच्छ, सुंदरतेकडून अस्वच्छतेकडे सुरू आहे.

पुसद नगर परिषदेची स्थापना १४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाली. शहरात सध्या २९ वाॅर्ड आहेत. शहराची लोकसंख्या एक लाखांच्या आसपास आहे. शहर स्वच्छतेचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आले. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आहेत. मात्र, त्या काही वाॅर्डात नियमित फिरत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही वाॅर्डात मात्र घंटागाड्या नियमित रोज फिरताना दिसतात.

शहरात रोज २० टन कचरा निघतो. वसंतनगर, गढी वाॅर्ड, हटकेश्वर वाॅर्ड, माळीपुरा, खतीब वाॅर्ड, नवीन पुसद, मोतीनगर, टिळकनगर, तुकाराम बापू वाॅर्ड, आंबेडकर वाॅर्ड, सुभाष वाॅर्ड, शिवाजी वाॅर्ड, पार्वतीबाईनगर, आठवडी बाजार परिसर, भाजी मंडी परिसरात नेहमी कचऱ्याचे ढीग व घाण पहावयास मिळते. नाल्यांची सफाईदेखील नियमित केली जात नाही. काही ठिकाणी नाल्यातील कचरा रस्त्यावर कित्येक दिवस पडून राहतो.

बॉक्स

सांडपाण्याची व्यवस्था तोकडी

शहरातील अनेक जुन्या व नव्या वसाहतींमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही. आहे तेथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पूस नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्ते उखडल्याने हाेतोय त्रास

शहरातील अनेक भागातील रस्ते उखडल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास होत आहे. गल्लीबोळातील रस्ते ही नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. बांधकाम करणारे रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते.

अतिक्रमणाचा भस्मासूर कायमच

शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्याकडेला अनेक व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यांचे साहित्य रस्त्यावर येत आहे. पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

विकास आराखडा उरला नावालाच

विकास आराखड्यातील रस्तेसुद्धा अतिक्रमणाने वेढले आहेत. काही रस्ते लुप्त झाले आहेत. विशेष म्हणजे अशाप्रकारची अनेक अतिक्रमणे मतपेटीवर डोळा ठेवून राजकीय हेतूने बसविण्यात आली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांच्याकडेला असलेल्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

अनेक वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांची वानवा

शहराच्या अवतीभवतीची नागरी वस्ती वाढत आहे. नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधा पोहोचल्या नाहीत. नागरिक वारंवार प्रशासनाकडे विनंती करतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

मुख्य चौकात जनावरांचा ठिय्या

शिवाजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक परिसर व इतर भागात मोकाट जनावरांचे कळप हिंडत असतात. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना त्रास होतो. ही मोकाट जनावरे महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण करीत असल्याप्रमाणे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस व नागरिकांची फजिती होते.

नगर परिषद परिसरातही स्वच्छतेचा अभाव दिसतो. नगरपरिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात.