शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कोट्यवधींचा निधी मिळूनही स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे वाटचाल, विकासाला लागले ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST

ग्राऊंड रिपोर्ट फोटो अखिलेश अग्रवाल पुसद : धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पुसद शहर अवतीभवतीच्या वनराई व डोंगर कपारींनी नैसर्गिक ...

ग्राऊंड रिपोर्ट

फोटो

अखिलेश अग्रवाल

पुसद : धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पुसद शहर अवतीभवतीच्या वनराई व डोंगर कपारींनी नैसर्गिक जीवनाची अनुभूती देते. मात्र, अनियमित स्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा, तुंबलेल्या नाल्या, गल्लीबोळातील घाण असे चित्र पहावयास मिळते. कोट्यवधींचा निधी मिळूनही शहराची वाटचाल स्वच्छ, सुंदरतेकडून अस्वच्छतेकडे सुरू आहे.

पुसद नगर परिषदेची स्थापना १४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाली. शहरात सध्या २९ वाॅर्ड आहेत. शहराची लोकसंख्या एक लाखांच्या आसपास आहे. शहर स्वच्छतेचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आले. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आहेत. मात्र, त्या काही वाॅर्डात नियमित फिरत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही वाॅर्डात मात्र घंटागाड्या नियमित रोज फिरताना दिसतात.

शहरात रोज २० टन कचरा निघतो. वसंतनगर, गढी वाॅर्ड, हटकेश्वर वाॅर्ड, माळीपुरा, खतीब वाॅर्ड, नवीन पुसद, मोतीनगर, टिळकनगर, तुकाराम बापू वाॅर्ड, आंबेडकर वाॅर्ड, सुभाष वाॅर्ड, शिवाजी वाॅर्ड, पार्वतीबाईनगर, आठवडी बाजार परिसर, भाजी मंडी परिसरात नेहमी कचऱ्याचे ढीग व घाण पहावयास मिळते. नाल्यांची सफाईदेखील नियमित केली जात नाही. काही ठिकाणी नाल्यातील कचरा रस्त्यावर कित्येक दिवस पडून राहतो.

बॉक्स

सांडपाण्याची व्यवस्था तोकडी

शहरातील अनेक जुन्या व नव्या वसाहतींमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही. आहे तेथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पूस नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्ते उखडल्याने हाेतोय त्रास

शहरातील अनेक भागातील रस्ते उखडल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास होत आहे. गल्लीबोळातील रस्ते ही नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. बांधकाम करणारे रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते.

अतिक्रमणाचा भस्मासूर कायमच

शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्याकडेला अनेक व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यांचे साहित्य रस्त्यावर येत आहे. पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

विकास आराखडा उरला नावालाच

विकास आराखड्यातील रस्तेसुद्धा अतिक्रमणाने वेढले आहेत. काही रस्ते लुप्त झाले आहेत. विशेष म्हणजे अशाप्रकारची अनेक अतिक्रमणे मतपेटीवर डोळा ठेवून राजकीय हेतूने बसविण्यात आली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांच्याकडेला असलेल्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

अनेक वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांची वानवा

शहराच्या अवतीभवतीची नागरी वस्ती वाढत आहे. नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधा पोहोचल्या नाहीत. नागरिक वारंवार प्रशासनाकडे विनंती करतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

मुख्य चौकात जनावरांचा ठिय्या

शिवाजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक परिसर व इतर भागात मोकाट जनावरांचे कळप हिंडत असतात. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना त्रास होतो. ही मोकाट जनावरे महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण करीत असल्याप्रमाणे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस व नागरिकांची फजिती होते.

नगर परिषद परिसरातही स्वच्छतेचा अभाव दिसतो. नगरपरिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात.