शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

खरीपपूर्व माती परीक्षण कार्यक्रमाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:13 IST

शेतीचे हेल्थकार्ड तयार करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. लागवड खर्च वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी माती परीक्षणावर भर दिला जात आहे.

ठळक मुद्देकृषी यंत्रणा उदासीन : शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नाही

राजू राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणबेहळ : शेतीचे हेल्थकार्ड तयार करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. लागवड खर्च वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी माती परीक्षणावर भर दिला जात आहे. शासनस्तरावर पाठपुरावा होत असला तरी प्रत्यक्ष गावातील चित्र वेगळे आहे. हा माती परीक्षण कार्यक्रम कागदोपत्रीच राबविला जातो. कृषी विभागाची स्थानिक पातळीवरील यंत्रणा गंभीर नसल्याने शेतकरी हिताच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे.शेती उत्पादनासाठी शेतकºयांना कृषी केंद्रचालकच मार्गदर्शन करतात. अधिक नफ्याची उत्पादने व बियाणे शेतकºयांच्या माथी मारली जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने नापिकीच्या चक्रात अडकतो. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. या खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण करून प्रत्येक शेतकºयाकडे मातीचे हेल्थकार्ड सोपविणे आवश्यक होते. शासनस्तरावरून तसा कार्यक्रमही आखण्यात आला.शास्त्रशुद्ध पद्धतीने नमुने गोळा करून परीक्षणाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी क्षेत्र सहायक असलेल्या कृषी सहायकांवर आहे. मात्र हा वर्ग पूर्णत: शेतकºयांकडे दुर्लक्ष करून आहे. गावात फिरकत नाही. तालुक्याच्या ठिकाणावरूनच कारभार केला जातो. कधी कधी रस्त्यावरच्या गावात ठिय्या देऊन नियोजन केले जाते. अंतर्गत भागात कुणी जाण्यास तयार नाही. परिणामी शेतकरी परंपरागत पद्धतीने पिकाला खतपाणी देतो. यात त्याची फसगत होते. मुळात मातीमध्ये कुठले अन्नद्रव्य कमी आहे, अधिक आहे याची माहिती नसल्याने खतांचा वारेमाप वापर होतो. आर्थिक बजेट वाढतो.सोबतच खताच्या अतिवापराने अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. यामुळे शेतकरी पूर्णत: नागवला जातो. शेती हिताचा माती परीक्षण राबविणे गरजेचे आहे. काही सुज्ञ शेतकरी या कार्यक्रमाबाबत स्थानिक कृषी विभागाकडे विचारणा करतात. त्यांनाही अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. उडवाउडवीची उत्तरे देऊन मार्गी लावले जाते.आर्णी तालुक्यातील कृषी विभागाची यंत्रणा पूर्णपणे जलयुक्त शिवारच्या मागे आहे. अर्थार्जनात व्यस्त आहे. यामुळे अनेक कृषी कर्मचाºयांनी दुसºयांच्या नावाने चक्क कंत्राट घेणे सुरू केले आहे. त्यामुळेच शेतकरी सतत नापिकीच्या चक्रव्यूहात अडकत आहे. वारेमाप कीटकनाशकाचा वापर करून शेतकºयांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही कृषी विभागाची यंत्रणा शेतीसाठी काम करण्यास तयार नसल्याचे भयावह वास्तव दिसून येते.मिनी कीट व मोबाईल व्हॅनची उपयोगिता काय ?माती परीक्षणासाठी महसूल मंडळस्तरावर प्रत्येक ठिकाणी मिनी किटचे वितरण केले आहे. याशिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या यवतमाळ येथील केंद्राकडे फिरत्या प्रयोगशाळेसाठी मोबाईल अद्यावत व्हॅन दिली आहे. त्यानंतरही गावात जाऊन कुणीही माती परीक्षणासाठी मार्गदर्शन करताना दिसत नाही. केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी माती परीक्षण अहवाल मागविला जातो. मात्र खरीप, रबी, उन्हाळी पिकांची लागवड करण्यापूर्वी मातीची तपासणी होत नाही. एकप्रकारे कृषी साहित्य विक्रेत्यांना पूरक व्यवस्था कृषी विभागाकडून निर्माण केली जात आहे. त्यामुळे निकृष्ट उत्पादने शेतकरी वारेमाप वापरत आहे.