शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:45 AM

घाटंजी : राज्यातील २ हजार ३८८ वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी पुणे येथील समाज ...

घाटंजी : राज्यातील २ हजार ३८८ वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर २२ सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत गेल्या ७० वर्षांपासून १०० टक्के अनुदानित आणि शासन मान्यता असलेली अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह योजना चालविली जाते. शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती व जमातींच्या आश्रमशाळा, विमुक्त जाती व जमातीच्या आश्रमशाळा, अंध व अपंगांच्या शाळा व संलग्न वसतिगृहे यासह विविध प्रकारच्या योजना नव्याने सरकारने अमलात आणल्या. नवीन योजनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू केली.

परंतु गेल्या ७० वर्षांपासून अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही. उलट वेतन श्रेणीपासून त्यांना वंचित ठेवले. २००३ आणि २०१३ मध्ये कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत सामावून घ्यावे म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत वेतन श्रेणीचा प्रस्ताव सादर झाला. मात्र, केवळ राजकीय श्रेयवादामुळे तत्कालीन सरकारने वसतिगृह कर्मचाऱ्यांना मानधनात तुटपुंजी वाढ देऊन तोंडाला पाने पुसली.

विनाअनुदानित तत्त्वावर सुरू केलेल्या योजनांना अनुदानित करून त्या योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू केली जात आहे. परंतु फक्त मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी २४ तास काम करणाऱ्या वसतिगृह कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय खात्याकडून तुटपुंजे मानधन ऊन त्यांची थट्टा केली जात आहे. त्यामुळे पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर आमरण कर्मचारी प्रदीप वाक्पैजन यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.

बॉक्स

आत्तापर्यंत पाच कर्मचाऱ्यांची आत्महत्या

कमी वेतन श्रेणीमुळे आत्तापर्यंत राज्यातील पाच वसतिगृह कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यात विश्वंभर कांबळे (लातूर), प्रकाश बोरकर (परभणी), भरत राजुरे (लातूर), भाऊ गोतावळे (उस्मानाबाद), श्रीराम शहाणे (नांदेड) यांचा समावेश आहे. तरीही शासनाला जाग आली नसल्याचा आरोप प्रदीप वाक्पैजन यांनी केला आहे.