शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कर्जमाफी नव्हे, ही कर्जवसुली!

By admin | Updated: June 27, 2017 01:26 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम आधी स्वत: भरावी लागणार आहे.

देवानंद पवार : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचा आक्षेपलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम आधी स्वत: भरावी लागणार आहे. त्यामुळे ही कर्जमाफी नसून कर्जवसुलीचा सरकारचा नवा फंडा आहे, अशी टीका शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केली आहे.एकाच गोष्टीसाठी सरकारने एकाच महिन्यात तीन वेळा वेगवेगळ्या घोषणा करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे, असेही पवार यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे. दोन जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी ३१ आॅक्टोबरपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलन केल्यामुळे पुन्हा तातडीने दहा हजारांचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. यात शंभर टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. ३० जून २०१६ ही मुदत ठेवण्याऐवजी ३१ मार्च २०१७ अशी मुदत ठेवल्याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. एखाद्या शेतकऱ्याकडे तीन लाखाचे कर्ज असेल तर त्याने दीड लाख बँकेत भरल्याशिवाय त्याला उर्वरित दीड लाखाची कर्जमाफी मिळणार नाही. त्यामुळे सरकारची घोषणा म्हणजे, लबाडाचे आवतन आहे. जेवल्याशिवाय खरे नाही. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जीआर पाहिल्याशिवाय या घोषणेचे स्वागत करू नये, असेही देवानंद पवार म्हणाले.