शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

१४ तालुक्यात नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षणच नाही

By admin | Updated: April 18, 2015 02:10 IST

अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

यवतमाळ : अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले. मात्र शासकीय यंत्रणेने अद्याप १४ तालुक्यात नुकसानीच्या सर्वेक्षणाला प्रारंभही केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नित्याचाच झाला आहे. उन्हाळा की पावसाळा हे समजणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यात रोजच कोण्या ना कोण्या तालुक्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. वादळ, वारा, विजा यामुळे नुकसानही तेवढेच मोठे होते आहे. आधीच दुष्काळात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. कृषी, महसूल यंत्रणेकडून हे सर्वेक्षण अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ११ व १२ एप्रिलला पडलेल्या अवकाळी पावसाचे केवळ बाभूळगाव व महागाव या दोनच तालुक्यातील सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाले आहे. बाभूळगाव तालुक्यात १५३ तर महागाव तालुक्यात ६१ हेक्टर क्षेत्रात नुकसान दाखविले गेले आहे. उर्वरित १४ तालुक्यात अद्याप सर्वेक्षणच सुरू झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथे नुकसान किती याचा शासकीय आकडा शोधणे कठीण झाले आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात संत्रा, आंबा, भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र सर्वेक्षण झालेल्या दोन तालुक्यात केवळ एक हेक्टरमधील आंब्याला नुकसान झाल्याचा उफराटा अहवाल दिला गेला आहे. दोन तालुक्यांमिळून २१४ हेक्टरमध्ये नुकसान दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात उमरखेड, दिग्रस, दारव्हा, कळंब, आर्णी, झरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला असून पिकांचे नुकसानही तेवढेच मोठे आहे. भाजीपाला पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आजही अवकाळी पाऊस सुरू असून नुकसानही होतच आहे. मात्र त्यानंतरही १४ तालुक्यांमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही. (शहर वार्ताहर)