शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

१४ तालुक्यात नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षणच नाही

By admin | Updated: April 18, 2015 02:10 IST

अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

यवतमाळ : अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले. मात्र शासकीय यंत्रणेने अद्याप १४ तालुक्यात नुकसानीच्या सर्वेक्षणाला प्रारंभही केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नित्याचाच झाला आहे. उन्हाळा की पावसाळा हे समजणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यात रोजच कोण्या ना कोण्या तालुक्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. वादळ, वारा, विजा यामुळे नुकसानही तेवढेच मोठे होते आहे. आधीच दुष्काळात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. कृषी, महसूल यंत्रणेकडून हे सर्वेक्षण अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ११ व १२ एप्रिलला पडलेल्या अवकाळी पावसाचे केवळ बाभूळगाव व महागाव या दोनच तालुक्यातील सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाले आहे. बाभूळगाव तालुक्यात १५३ तर महागाव तालुक्यात ६१ हेक्टर क्षेत्रात नुकसान दाखविले गेले आहे. उर्वरित १४ तालुक्यात अद्याप सर्वेक्षणच सुरू झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथे नुकसान किती याचा शासकीय आकडा शोधणे कठीण झाले आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात संत्रा, आंबा, भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र सर्वेक्षण झालेल्या दोन तालुक्यात केवळ एक हेक्टरमधील आंब्याला नुकसान झाल्याचा उफराटा अहवाल दिला गेला आहे. दोन तालुक्यांमिळून २१४ हेक्टरमध्ये नुकसान दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात उमरखेड, दिग्रस, दारव्हा, कळंब, आर्णी, झरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला असून पिकांचे नुकसानही तेवढेच मोठे आहे. भाजीपाला पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आजही अवकाळी पाऊस सुरू असून नुकसानही होतच आहे. मात्र त्यानंतरही १४ तालुक्यांमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही. (शहर वार्ताहर)