शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दारव्हात साडेपाच कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:11 IST

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : ३७२ घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली.तालुक्यात १५ व १६ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी, पाझर तलाव व नाल्याकाठच्या गावांना मोठा फटका बसला. तालुक्यातील सर्वात मोठ्या अडाण धरणाने पातळी गाठल्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. रामगाव (रामेश्वर), सांगवी (रेल्वे), बोदेगाव, तरनोळी, नखेगाव, घनापूर, लालापूर, फुबगाव, डोल्हारी आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोल्हारीचे प्रमोद खाडे, लालापूरचे गणेश इंगोले यांच्यासह गावातील इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.तेलगव्हाण येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जवळपासच्या ५० हेक्टरवरील शेतीत पाणी शिरले. तोरणाळा येथील तीन माती बंधारे वाहून गेले. त्यामधील पाण्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. भांडेगाव येथील देवराव चव्हाण यांच्या शेतातील पिके खरडून गेली. हातणी येथील किसन वांड्रसवार यांनी मोठा खर्च करून आपल्या शेतात केळीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे त्यांचा पूर्ण खर्च वाया गेला. तसेच गुलाब अंबुरे, नंदकिशोर बारसे यांचेसुद्धा प्रचंड नुकसान झाले.चोरखोपडी पाझर तलाव तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती आहे. या गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांमधील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह फळबाग उध्वस्त झाली. तसेच घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्णत: बाधित कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाची मदत करण्यात आली आहे.घरांचे व शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नुकसानीची अंदाजित आकडेवारी वरिष्ठांना पाठविली आहे. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान असल्यामुळे पूर्ण सर्वेक्षणाअंतीच नुकसानीचा अंतिम आकडा कळेल, असे सांगण्यात आले.तात्पुरती मदतमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तत्काळ तात्पुरत्या स्वरूपाची मदत देऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

टॅग्स :Rainपाऊस