शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात साडेपाच कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:11 IST

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : ३७२ घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली.तालुक्यात १५ व १६ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी, पाझर तलाव व नाल्याकाठच्या गावांना मोठा फटका बसला. तालुक्यातील सर्वात मोठ्या अडाण धरणाने पातळी गाठल्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. रामगाव (रामेश्वर), सांगवी (रेल्वे), बोदेगाव, तरनोळी, नखेगाव, घनापूर, लालापूर, फुबगाव, डोल्हारी आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोल्हारीचे प्रमोद खाडे, लालापूरचे गणेश इंगोले यांच्यासह गावातील इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.तेलगव्हाण येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जवळपासच्या ५० हेक्टरवरील शेतीत पाणी शिरले. तोरणाळा येथील तीन माती बंधारे वाहून गेले. त्यामधील पाण्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. भांडेगाव येथील देवराव चव्हाण यांच्या शेतातील पिके खरडून गेली. हातणी येथील किसन वांड्रसवार यांनी मोठा खर्च करून आपल्या शेतात केळीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे त्यांचा पूर्ण खर्च वाया गेला. तसेच गुलाब अंबुरे, नंदकिशोर बारसे यांचेसुद्धा प्रचंड नुकसान झाले.चोरखोपडी पाझर तलाव तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती आहे. या गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांमधील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह फळबाग उध्वस्त झाली. तसेच घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्णत: बाधित कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाची मदत करण्यात आली आहे.घरांचे व शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नुकसानीची अंदाजित आकडेवारी वरिष्ठांना पाठविली आहे. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान असल्यामुळे पूर्ण सर्वेक्षणाअंतीच नुकसानीचा अंतिम आकडा कळेल, असे सांगण्यात आले.तात्पुरती मदतमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तत्काळ तात्पुरत्या स्वरूपाची मदत देऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

टॅग्स :Rainपाऊस