शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीदार गावांसाठी अंकितची सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगावोगावी जागृती : सात दिवसात ७६१ किलोमीटरचा प्रवास, मुंबईला होणार मोहिमेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.राज्यावर यंदा दुष्काळाचे ढग जमा झाले. हा दुष्काळ गावांना पाणीदार करण्यासाठी उत्तम संधी आहे. हाच धागा पकडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अंकित राधेश्याम जयस्वाल याने सायकलवारी सुरू करून गावोगावी जनजागृती करण्याचा वसा घेतला. तो एकूण ७६१ किलोमीटरची वारी करणार आहे. २०१९ ची वॉटर कप स्पर्धा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी गावांमध्ये जागृतीसाठी अंकीतने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सायकलवरून गावोगावी प्रबोधन करण्याचे काम तो करीत आहे.वर्धा जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथून त्याने मोहिमेला प्रारंभ केला. तो दररोज किमान १५० किलोमिटरचा प्रवास करीत आहे. या प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये अंकीत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गावकºयांना करतो. दुष्काळाला संधी समजून आपले गाव पाणीदार करण्याबबात जागृती करतो. यात त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करणारा अंकीत बुधवारी कळंबमार्गे सायकलने यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला आहे. या दरम्यान लागणाऱ्या गावांमध्ये त्याने पाणीदार गावांबाबत जागृती केली. आता तो मेहकर, औरंगाबाद, विंचुर, इगतपुरीमार्गे मुंबईला निघाला आहे. यात तो ७६१ किलोमिटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.पाणी कमवा, प्रदूषण टाळाआपण केवळ पाण्याचा वापर करतो. मात्र हे पाणी कमाविण्यासाठी प्रयत्न होत नाही. वॉटर कप स्पधेतून पाणी कमाविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात अंकीत जागृती करीत फिरत आहे. उद्याचा महाराष्ट्र संपन्न व्हावा, असा आपला उद्देश असल्याचे त्याने सांगितले.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाणीदार गाव चळवळ राबविली जात आहे. यावर्षी ८ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २२ मेपर्यंत गावकरी आपले गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. गावोगावी जागृती होत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा