शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पाणीदार गावांसाठी अंकितची सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगावोगावी जागृती : सात दिवसात ७६१ किलोमीटरचा प्रवास, मुंबईला होणार मोहिमेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.राज्यावर यंदा दुष्काळाचे ढग जमा झाले. हा दुष्काळ गावांना पाणीदार करण्यासाठी उत्तम संधी आहे. हाच धागा पकडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अंकित राधेश्याम जयस्वाल याने सायकलवारी सुरू करून गावोगावी जनजागृती करण्याचा वसा घेतला. तो एकूण ७६१ किलोमीटरची वारी करणार आहे. २०१९ ची वॉटर कप स्पर्धा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी गावांमध्ये जागृतीसाठी अंकीतने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सायकलवरून गावोगावी प्रबोधन करण्याचे काम तो करीत आहे.वर्धा जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथून त्याने मोहिमेला प्रारंभ केला. तो दररोज किमान १५० किलोमिटरचा प्रवास करीत आहे. या प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये अंकीत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गावकºयांना करतो. दुष्काळाला संधी समजून आपले गाव पाणीदार करण्याबबात जागृती करतो. यात त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करणारा अंकीत बुधवारी कळंबमार्गे सायकलने यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला आहे. या दरम्यान लागणाऱ्या गावांमध्ये त्याने पाणीदार गावांबाबत जागृती केली. आता तो मेहकर, औरंगाबाद, विंचुर, इगतपुरीमार्गे मुंबईला निघाला आहे. यात तो ७६१ किलोमिटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.पाणी कमवा, प्रदूषण टाळाआपण केवळ पाण्याचा वापर करतो. मात्र हे पाणी कमाविण्यासाठी प्रयत्न होत नाही. वॉटर कप स्पधेतून पाणी कमाविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात अंकीत जागृती करीत फिरत आहे. उद्याचा महाराष्ट्र संपन्न व्हावा, असा आपला उद्देश असल्याचे त्याने सांगितले.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाणीदार गाव चळवळ राबविली जात आहे. यावर्षी ८ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २२ मेपर्यंत गावकरी आपले गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. गावोगावी जागृती होत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा