शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पाणीदार गावांसाठी अंकितची सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगावोगावी जागृती : सात दिवसात ७६१ किलोमीटरचा प्रवास, मुंबईला होणार मोहिमेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.राज्यावर यंदा दुष्काळाचे ढग जमा झाले. हा दुष्काळ गावांना पाणीदार करण्यासाठी उत्तम संधी आहे. हाच धागा पकडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अंकित राधेश्याम जयस्वाल याने सायकलवारी सुरू करून गावोगावी जनजागृती करण्याचा वसा घेतला. तो एकूण ७६१ किलोमीटरची वारी करणार आहे. २०१९ ची वॉटर कप स्पर्धा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी गावांमध्ये जागृतीसाठी अंकीतने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सायकलवरून गावोगावी प्रबोधन करण्याचे काम तो करीत आहे.वर्धा जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथून त्याने मोहिमेला प्रारंभ केला. तो दररोज किमान १५० किलोमिटरचा प्रवास करीत आहे. या प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये अंकीत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गावकºयांना करतो. दुष्काळाला संधी समजून आपले गाव पाणीदार करण्याबबात जागृती करतो. यात त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करणारा अंकीत बुधवारी कळंबमार्गे सायकलने यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला आहे. या दरम्यान लागणाऱ्या गावांमध्ये त्याने पाणीदार गावांबाबत जागृती केली. आता तो मेहकर, औरंगाबाद, विंचुर, इगतपुरीमार्गे मुंबईला निघाला आहे. यात तो ७६१ किलोमिटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.पाणी कमवा, प्रदूषण टाळाआपण केवळ पाण्याचा वापर करतो. मात्र हे पाणी कमाविण्यासाठी प्रयत्न होत नाही. वॉटर कप स्पधेतून पाणी कमाविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात अंकीत जागृती करीत फिरत आहे. उद्याचा महाराष्ट्र संपन्न व्हावा, असा आपला उद्देश असल्याचे त्याने सांगितले.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाणीदार गाव चळवळ राबविली जात आहे. यावर्षी ८ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २२ मेपर्यंत गावकरी आपले गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. गावोगावी जागृती होत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा