शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अडत्यांचे मनमानी कमिशन, कोट्यवधीची होतेय उलाढाल; नियमांच्या पळवाटांमुळे शेतकऱ्यांची लुट

By रूपेश उत्तरवार | Updated: March 16, 2023 13:41 IST

कायदा म्हणतो शेतकऱ्यांना २४ तासांत चुकारे द्या

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने कायद्यात दोन बाबींचा समावेश केला. त्यात पहिली बाब म्हणजे शेतमालाचे पैसे २४ तासांत अदा करायचे. शेतकऱ्यांकडून कुठलीही अडत घ्यायची नाही. मात्र, या दोन्ही नियमांवर अडत्यांनी कायद्यात पळवाट शोधली आहे. शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना नगदी पैशासाठी कमिशन द्यावे लागते. अन्यथा, दोन ते चार दिवस विलंबाचा धनादेश दिला जातो. हे सर्व व्यवहार कायद्याला बगल देऊन केले जातात. यातून २४ तासांत पैसे न मिळाल्याने नियमांचा भंग होतो. धान्य आणि कापूस विक्रीत अनाधिकृत कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. यात शेतकरी लुटला जात आहे.

खरेदी झालेल्या शेतमालाचा अडत्यांनी धनादेश दिला तर तो वठविण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यातही खातेदाराला एकावेळी पन्नास हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येत नाही. वर्षभराच्या उधारीचे सर्वांना एकाचवेळी पैसे द्यायचे असतात. शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही. त्यांना ई बँकिंग करता येत नाही. त्यांना जमा झालेले पैसे उधारीने रक्कम आणलेल्यांना द्यायचे असतात. त्यांच्याकडे फोनपे नसतो. यामुळे पैसे मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच कारणाने शेतकरी नगदी पैशासाठी हट्ट धरतात. यातूनच अनधिकृत कमिशनखोरी वाढली आहे.

कापसाला जादा पैशाचे आमिष आणि एक टक्का कट्टीतून वजाबाकी

आपल्या केंद्रालाच कापूस यावा म्हणून काही केंद्र इतर ठिकाणापेक्षा जास्त दराची घोषणा करतात आणि कापूस विकल्यानंतर त्यावर नगदी पैशाची अर्धा ते दोन टक्के कट्टी आकारून पैसे कापून घेतात. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोकडीच रक्कम पडते. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी धनादेश दिला जातो. हा धनादेश चार ते आठ दिवस पुढचा असतो. यातून शेतकऱ्यांची एकच कोंडी केली जाते.

व्यापारीकडून आणि शेतकऱ्यांकडून कमिशन

बाजार समितीमध्ये व्यापारी शेतमालाची खरेदी करतात. खरेदी झालेल्या शेतमालाचे अडत्यांना पैसे देतात. अडत्यांना नंतर व्यापारी पैसे अदा करतात. यासाठी प्रत्येक बाजार समितीत वेगवेगळा नियम आहे. तीन दिवसांत व्यापाऱ्यांनी अडत्यांना पैसे परत दिले तर साधारणत: २५ पैसे अडत असते. ११ दिवसांत पैसे दिले तर एक ते दीड टक्का अडत व्यापारी देतात. प्रत्येक बाजार समितीत याचा एक वैयक्तिक स्वरूपात अघोषित करार असतो. असे असतांनाही शेतकऱ्यांना पैसे देताना हीच अडते मंडळी नगदी पैशाकरिता अर्धा ते दोन टक्के कमिशन शेतकऱ्यांकडून घेतात. यात शेतकरीच लुटला जातो.

असे कुणी करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. या प्रकरणात बाजार समित्यांनी लक्ष घालून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी थेट सहकार विभागाकडे तक्रार करू शकतात.

- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेतीbusinessव्यवसायFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ