शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

अडत्यांचे मनमानी कमिशन, कोट्यवधीची होतेय उलाढाल; नियमांच्या पळवाटांमुळे शेतकऱ्यांची लुट

By रूपेश उत्तरवार | Updated: March 16, 2023 13:41 IST

कायदा म्हणतो शेतकऱ्यांना २४ तासांत चुकारे द्या

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने कायद्यात दोन बाबींचा समावेश केला. त्यात पहिली बाब म्हणजे शेतमालाचे पैसे २४ तासांत अदा करायचे. शेतकऱ्यांकडून कुठलीही अडत घ्यायची नाही. मात्र, या दोन्ही नियमांवर अडत्यांनी कायद्यात पळवाट शोधली आहे. शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना नगदी पैशासाठी कमिशन द्यावे लागते. अन्यथा, दोन ते चार दिवस विलंबाचा धनादेश दिला जातो. हे सर्व व्यवहार कायद्याला बगल देऊन केले जातात. यातून २४ तासांत पैसे न मिळाल्याने नियमांचा भंग होतो. धान्य आणि कापूस विक्रीत अनाधिकृत कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. यात शेतकरी लुटला जात आहे.

खरेदी झालेल्या शेतमालाचा अडत्यांनी धनादेश दिला तर तो वठविण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यातही खातेदाराला एकावेळी पन्नास हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येत नाही. वर्षभराच्या उधारीचे सर्वांना एकाचवेळी पैसे द्यायचे असतात. शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही. त्यांना ई बँकिंग करता येत नाही. त्यांना जमा झालेले पैसे उधारीने रक्कम आणलेल्यांना द्यायचे असतात. त्यांच्याकडे फोनपे नसतो. यामुळे पैसे मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच कारणाने शेतकरी नगदी पैशासाठी हट्ट धरतात. यातूनच अनधिकृत कमिशनखोरी वाढली आहे.

कापसाला जादा पैशाचे आमिष आणि एक टक्का कट्टीतून वजाबाकी

आपल्या केंद्रालाच कापूस यावा म्हणून काही केंद्र इतर ठिकाणापेक्षा जास्त दराची घोषणा करतात आणि कापूस विकल्यानंतर त्यावर नगदी पैशाची अर्धा ते दोन टक्के कट्टी आकारून पैसे कापून घेतात. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोकडीच रक्कम पडते. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी धनादेश दिला जातो. हा धनादेश चार ते आठ दिवस पुढचा असतो. यातून शेतकऱ्यांची एकच कोंडी केली जाते.

व्यापारीकडून आणि शेतकऱ्यांकडून कमिशन

बाजार समितीमध्ये व्यापारी शेतमालाची खरेदी करतात. खरेदी झालेल्या शेतमालाचे अडत्यांना पैसे देतात. अडत्यांना नंतर व्यापारी पैसे अदा करतात. यासाठी प्रत्येक बाजार समितीत वेगवेगळा नियम आहे. तीन दिवसांत व्यापाऱ्यांनी अडत्यांना पैसे परत दिले तर साधारणत: २५ पैसे अडत असते. ११ दिवसांत पैसे दिले तर एक ते दीड टक्का अडत व्यापारी देतात. प्रत्येक बाजार समितीत याचा एक वैयक्तिक स्वरूपात अघोषित करार असतो. असे असतांनाही शेतकऱ्यांना पैसे देताना हीच अडते मंडळी नगदी पैशाकरिता अर्धा ते दोन टक्के कमिशन शेतकऱ्यांकडून घेतात. यात शेतकरीच लुटला जातो.

असे कुणी करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. या प्रकरणात बाजार समित्यांनी लक्ष घालून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी थेट सहकार विभागाकडे तक्रार करू शकतात.

- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेतीbusinessव्यवसायFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ