शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

अतिवृष्टीमुळे पीक गेले; यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 17:39 IST

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

यवतमाळ : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाती आलेला हंगाम हिरावल्यामुळे वैफल्यग्रस्त दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पहिली घटना महागाव तालुक्यातील दहिवड (खुर्द) येथे, तर दुसरी घटना पुसद तालुक्यातील भंडारी येथे घडली.

मनोहर नारायण पवार (३४), असे दहिवड (खुर्द) येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे ते निराश होते. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या मनोहर पवार यांनी शनिवारी सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, तीन मुली व आप्त परिवार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

पुसद तालुक्यातील भंडारी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत अशोक सखाराम आडे (४४), असे भंडारी येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री त्यांनी स्वत:च्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावला. ही घटना १४ ऑक्टोबरला उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांना घटनास्थळ गाठून मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद शेळके, श्याम घुगे, अनिल राठोड तपास करीत आहेत. तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांचा अहवाल आल्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबास जास्तीत जास्त मदत मिळावी, याकरिता प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्यांची दखल घ्यावी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी मृत शेतकरी मनोहर नारायण पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अति पावसाने शेतकरी उघड्यावर आले आहेत. मात्र, शासन कुंभकर्णी झोपेत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. शासनाने घोषित केलेली नुकसानभरपाईसुद्धा थंडबस्त्यात आहे. शासनाच्या कोरड्या घोषणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचले असून, शेतकरी आत्महत्यांची दखल मानवाधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघाने घ्यावी, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेती