शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

पिके जोमात, तलाव मात्र कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:15 IST

ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुका : पूस धरणात केवळ ३९ टक्केच पाणी, तालुक्यात ३९० मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून पावसाने अनियमितता दाखविली. पिकांलायक पाऊस झाल्याने पिके तग धरून आहे. त्यामुळे शिवार हिरवे दिसत असले तरी नदी-नाले मात्र करोडे आहे. शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला. चाऱ्याचा प्रश्न मिटला. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात ३९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पिकांसाठी पोषक पावसाने शेतकरी सुखावला. मात्र मुक्या जनावरांची निसर्गाकडून कुचेष्टा होत आहे.तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या हजेरीमुळे सध्या नयनरम्य वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर बघितल्यानंतर येणारा-जाणारा व्यक्ती प्रफुल्लीत होत आहे. चोहीकडे हिरवळ पसरलेली आहे. त्यात विविध प्रकारची फुले, तलाव यामुळे तर या भागावरून नजर हटत नाही. डोंगरमाथ्यावरून परिसरातील तलाव, शेत शिवारांचे मनोहारी दर्शन घडते.यावर्षी जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसाने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे शेतशिवार हिरवे दिसून येत असले तरी तलाव, पाणवठे, नदी, नाले कोरडेच आहे. यंदा काही प्रमाणात विहिरी, बोअर यांना पाणी आहे. मात्र हे पाणीही पुढे पुरेल याची शक्यता नाही.आता उरला केवळ एक महिनाआॅगस्ट महिना आता संपत आला. जेमतेम एक महिना पावसाळा उरला आहे. या काळात जर मोठा पाऊस पडला नाही, तर गेल्यावर्षीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. दररोज आकाशात ढगांची दाटी होते. मात्र पाऊस वारंवार हुलकावणी देत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी नदी-नाले वाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीकपात