शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

पिके जोमात, तलाव मात्र कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:15 IST

ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुका : पूस धरणात केवळ ३९ टक्केच पाणी, तालुक्यात ३९० मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून पावसाने अनियमितता दाखविली. पिकांलायक पाऊस झाल्याने पिके तग धरून आहे. त्यामुळे शिवार हिरवे दिसत असले तरी नदी-नाले मात्र करोडे आहे. शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला. चाऱ्याचा प्रश्न मिटला. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात ३९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पिकांसाठी पोषक पावसाने शेतकरी सुखावला. मात्र मुक्या जनावरांची निसर्गाकडून कुचेष्टा होत आहे.तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या हजेरीमुळे सध्या नयनरम्य वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर बघितल्यानंतर येणारा-जाणारा व्यक्ती प्रफुल्लीत होत आहे. चोहीकडे हिरवळ पसरलेली आहे. त्यात विविध प्रकारची फुले, तलाव यामुळे तर या भागावरून नजर हटत नाही. डोंगरमाथ्यावरून परिसरातील तलाव, शेत शिवारांचे मनोहारी दर्शन घडते.यावर्षी जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसाने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे शेतशिवार हिरवे दिसून येत असले तरी तलाव, पाणवठे, नदी, नाले कोरडेच आहे. यंदा काही प्रमाणात विहिरी, बोअर यांना पाणी आहे. मात्र हे पाणीही पुढे पुरेल याची शक्यता नाही.आता उरला केवळ एक महिनाआॅगस्ट महिना आता संपत आला. जेमतेम एक महिना पावसाळा उरला आहे. या काळात जर मोठा पाऊस पडला नाही, तर गेल्यावर्षीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. दररोज आकाशात ढगांची दाटी होते. मात्र पाऊस वारंवार हुलकावणी देत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी नदी-नाले वाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीकपात