शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

पिके जोमात, तलाव मात्र कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:15 IST

ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुका : पूस धरणात केवळ ३९ टक्केच पाणी, तालुक्यात ३९० मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून पावसाने अनियमितता दाखविली. पिकांलायक पाऊस झाल्याने पिके तग धरून आहे. त्यामुळे शिवार हिरवे दिसत असले तरी नदी-नाले मात्र करोडे आहे. शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला. चाऱ्याचा प्रश्न मिटला. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात ३९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पिकांसाठी पोषक पावसाने शेतकरी सुखावला. मात्र मुक्या जनावरांची निसर्गाकडून कुचेष्टा होत आहे.तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या हजेरीमुळे सध्या नयनरम्य वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर बघितल्यानंतर येणारा-जाणारा व्यक्ती प्रफुल्लीत होत आहे. चोहीकडे हिरवळ पसरलेली आहे. त्यात विविध प्रकारची फुले, तलाव यामुळे तर या भागावरून नजर हटत नाही. डोंगरमाथ्यावरून परिसरातील तलाव, शेत शिवारांचे मनोहारी दर्शन घडते.यावर्षी जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसाने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे शेतशिवार हिरवे दिसून येत असले तरी तलाव, पाणवठे, नदी, नाले कोरडेच आहे. यंदा काही प्रमाणात विहिरी, बोअर यांना पाणी आहे. मात्र हे पाणीही पुढे पुरेल याची शक्यता नाही.आता उरला केवळ एक महिनाआॅगस्ट महिना आता संपत आला. जेमतेम एक महिना पावसाळा उरला आहे. या काळात जर मोठा पाऊस पडला नाही, तर गेल्यावर्षीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. दररोज आकाशात ढगांची दाटी होते. मात्र पाऊस वारंवार हुलकावणी देत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी नदी-नाले वाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीकपात