शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

पोळा सणाच्या तोंडावर २१ लाख शेतकरी वाऱ्यावर; मंत्र्यांचे केवळ दौरे, मदत केव्हा मिळणार?

By रूपेश उत्तरवार | Updated: August 23, 2022 11:57 IST

१८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यवतमाळ : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जुलैपर्यंत राज्यातील १५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. आता ऑगस्टच्या मध्यात नुकसानीचा आकडा तीन लाख ७५ हजार हेक्टरने वाढून १८ लाख ७५ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. अद्याप पंचनामे सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाकडून एक दमडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. मंत्री केवळ पाहणी दौरे करण्यातच वेळ घालवित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी पोळा सणाच्या तोंडावर राज्यातील २१ लाख शेतकरी वाऱ्यावर आहेत.

राज्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असली तरी सर्जा-राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी विदर्भ, मराठवाडा क्षेत्रात ९ ते १० वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. त्यांना उभारी देण्याची आवश्यकता असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. मदत मिळत नसल्याने शेतकरी पुरते खचले आहेत.

नवीन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर दुप्पट आणि तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची थाटात घोषणा करण्यात आली. परंतु त्याबाबतचे लेखी आदेश अद्याप निघाले नाहीत. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची आवश्यकता होती. मात्र, मदत न देता मंत्र्यांचे केवळ दौरे झाले. त्यांनीही केवळ विचारपूस करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

विदर्भ आणि मराठवाड्यात कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाकरी खाल्ल्या. यामुळे ते पाेटतिडकीने समस्या सोडवतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्यापही कुठलीही मदत मिळाली नाही. जून ते जुलै अखेरपर्यंत राज्यात १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. १९ हजार हेक्टर जमीन खरडून गेली. हा अहवाल ताजा असताना निसर्ग संकट कायम आहे. पुन्हा अतिवृष्टीने २० जिल्ह्यांत तीन लाख ७४ हेक्टरचे नुकसान केले. नुकसानीचा हा आकडा आता १८ लाख ७४ हजार हेक्टरच्या घरात आहे.

पोळा साजरा करायचा कसा

निसर्ग प्रकोपाने शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. घरात पैसा उरला नाही. कर्ज काढून पेरणी केली होती. आता नव्याने घर चालवायला पैसे नाही. अशा स्थितीत सर्जा-राजाचा पोळा सण साजरा करावा कसा, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांत निर्माण झाला आहे. यामुळे गाव शिवारावर अवकळा पसरली आहे.

१५ दिवसांत ७५ हजार हेक्टरचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १५ दिवसांत ७५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नव्याने नोंद झाली. जिल्ह्याचा नुकसानीचा आकडा पावणेचार लाख हेक्टरवर पोहोचला आहे. आताही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी