शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणाच्या तोंडावर २१ लाख शेतकरी वाऱ्यावर; मंत्र्यांचे केवळ दौरे, मदत केव्हा मिळणार?

By रूपेश उत्तरवार | Updated: August 23, 2022 11:57 IST

१८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यवतमाळ : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जुलैपर्यंत राज्यातील १५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. आता ऑगस्टच्या मध्यात नुकसानीचा आकडा तीन लाख ७५ हजार हेक्टरने वाढून १८ लाख ७५ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. अद्याप पंचनामे सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाकडून एक दमडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. मंत्री केवळ पाहणी दौरे करण्यातच वेळ घालवित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी पोळा सणाच्या तोंडावर राज्यातील २१ लाख शेतकरी वाऱ्यावर आहेत.

राज्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असली तरी सर्जा-राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी विदर्भ, मराठवाडा क्षेत्रात ९ ते १० वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. त्यांना उभारी देण्याची आवश्यकता असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. मदत मिळत नसल्याने शेतकरी पुरते खचले आहेत.

नवीन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर दुप्पट आणि तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची थाटात घोषणा करण्यात आली. परंतु त्याबाबतचे लेखी आदेश अद्याप निघाले नाहीत. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची आवश्यकता होती. मात्र, मदत न देता मंत्र्यांचे केवळ दौरे झाले. त्यांनीही केवळ विचारपूस करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

विदर्भ आणि मराठवाड्यात कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाकरी खाल्ल्या. यामुळे ते पाेटतिडकीने समस्या सोडवतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्यापही कुठलीही मदत मिळाली नाही. जून ते जुलै अखेरपर्यंत राज्यात १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. १९ हजार हेक्टर जमीन खरडून गेली. हा अहवाल ताजा असताना निसर्ग संकट कायम आहे. पुन्हा अतिवृष्टीने २० जिल्ह्यांत तीन लाख ७४ हेक्टरचे नुकसान केले. नुकसानीचा हा आकडा आता १८ लाख ७४ हजार हेक्टरच्या घरात आहे.

पोळा साजरा करायचा कसा

निसर्ग प्रकोपाने शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. घरात पैसा उरला नाही. कर्ज काढून पेरणी केली होती. आता नव्याने घर चालवायला पैसे नाही. अशा स्थितीत सर्जा-राजाचा पोळा सण साजरा करावा कसा, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांत निर्माण झाला आहे. यामुळे गाव शिवारावर अवकळा पसरली आहे.

१५ दिवसांत ७५ हजार हेक्टरचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १५ दिवसांत ७५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नव्याने नोंद झाली. जिल्ह्याचा नुकसानीचा आकडा पावणेचार लाख हेक्टरवर पोहोचला आहे. आताही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी