शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:13 IST

निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

ठळक मुद्दे१० हजार हेक्टर शेतजमिनीवरील खडक उघडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले.सततच्या दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. मात्र ऋतुचक्र बदलाने फळबाग लागवडच अडचणीत सापडली आहे. गतवर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि तापलेल्या अतिउन्हामुळे फळबागा होरपळल्या आहेत. यामध्ये संत्रा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी फळबागेच्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. यामुळे नुकसानीचा खरा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पावसाअभावी नागपूर आणि अमरावती विभागासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ हजार हेक्टवरील फळबागा नष्ट झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. हे नुकसान भरून न निघणारे आहे. शेतकरी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करीत असताना निसर्गाचा हा प्रघात झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच खचले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात नुकसानग्रस्त फळबागांचे सर्व्हेक्षणच झाले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने हा आरोप फेटाळला आहे. तथापि नेमक्या कुठल्या बागांचे सर्व्हेक्षण झाले आणि कुठल्या बागा सुटल्या, हे कोडेच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. यामुळे वाळलेल्या फळबागांचे सर्व्हेक्षण न झालेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे.फळबाग लागवडीचा कल कायम राहावा म्हणून कृषी मंत्रालयाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वालाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळबागांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून हेक्टरी ६० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये फळबाग लागवड करणे आणि ठिबक सिंचनासह इतर बाबींचा समावेश आहे.शेतकऱ्यांचा थेट मंत्र्यांना फोनजिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील विलास परसराम पाटील यांची संत्राबाग करपली. त्यांच्या बागेची नोंद कृषी सहाय्यकानी केली नाही. यामुळे त्यांना हेक्टरी केवळ सहा हजार ४०० रूपयांची मदत मिळाली. फळबागेच्या मदतीला ते मुकले. जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहे. त्यामुळे पाटील यांनी थेट कृषीमंत्र्यांकडे तक्रार केली.सर्वाधिक नुकसान चंद्रपूर आणि यवतमाळमध्येगतवर्षी आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या. राज्यभरात १० हजार हेक्टरवरील पीक खरडून गेले. यात सर्वाधिक नुकसान चंद्रपूरमध्ये झाले. या जिल्ह्यात तब्बल चार हजार ४१० हेक्टर शेतजमीन खरडून गेली. यवतमाळमध्ये तीन हजार ९९८ हेक्टरचे नुकसान झाले. या ठिकाणी खडक उघडा पडला. ही शेत जमीन दुरूस्त होणे अवघड आहे. तेथे पीक येणार नाही. ही शेती आता बंजर होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती