शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:13 IST

निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

ठळक मुद्दे१० हजार हेक्टर शेतजमिनीवरील खडक उघडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले.सततच्या दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. मात्र ऋतुचक्र बदलाने फळबाग लागवडच अडचणीत सापडली आहे. गतवर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि तापलेल्या अतिउन्हामुळे फळबागा होरपळल्या आहेत. यामध्ये संत्रा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी फळबागेच्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. यामुळे नुकसानीचा खरा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पावसाअभावी नागपूर आणि अमरावती विभागासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ हजार हेक्टवरील फळबागा नष्ट झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. हे नुकसान भरून न निघणारे आहे. शेतकरी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करीत असताना निसर्गाचा हा प्रघात झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच खचले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात नुकसानग्रस्त फळबागांचे सर्व्हेक्षणच झाले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने हा आरोप फेटाळला आहे. तथापि नेमक्या कुठल्या बागांचे सर्व्हेक्षण झाले आणि कुठल्या बागा सुटल्या, हे कोडेच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. यामुळे वाळलेल्या फळबागांचे सर्व्हेक्षण न झालेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे.फळबाग लागवडीचा कल कायम राहावा म्हणून कृषी मंत्रालयाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वालाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळबागांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून हेक्टरी ६० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये फळबाग लागवड करणे आणि ठिबक सिंचनासह इतर बाबींचा समावेश आहे.शेतकऱ्यांचा थेट मंत्र्यांना फोनजिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील विलास परसराम पाटील यांची संत्राबाग करपली. त्यांच्या बागेची नोंद कृषी सहाय्यकानी केली नाही. यामुळे त्यांना हेक्टरी केवळ सहा हजार ४०० रूपयांची मदत मिळाली. फळबागेच्या मदतीला ते मुकले. जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहे. त्यामुळे पाटील यांनी थेट कृषीमंत्र्यांकडे तक्रार केली.सर्वाधिक नुकसान चंद्रपूर आणि यवतमाळमध्येगतवर्षी आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या. राज्यभरात १० हजार हेक्टरवरील पीक खरडून गेले. यात सर्वाधिक नुकसान चंद्रपूरमध्ये झाले. या जिल्ह्यात तब्बल चार हजार ४१० हेक्टर शेतजमीन खरडून गेली. यवतमाळमध्ये तीन हजार ९९८ हेक्टरचे नुकसान झाले. या ठिकाणी खडक उघडा पडला. ही शेत जमीन दुरूस्त होणे अवघड आहे. तेथे पीक येणार नाही. ही शेती आता बंजर होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती