शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:13 IST

निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

ठळक मुद्दे१० हजार हेक्टर शेतजमिनीवरील खडक उघडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले.सततच्या दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. मात्र ऋतुचक्र बदलाने फळबाग लागवडच अडचणीत सापडली आहे. गतवर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि तापलेल्या अतिउन्हामुळे फळबागा होरपळल्या आहेत. यामध्ये संत्रा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी फळबागेच्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. यामुळे नुकसानीचा खरा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पावसाअभावी नागपूर आणि अमरावती विभागासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ हजार हेक्टवरील फळबागा नष्ट झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. हे नुकसान भरून न निघणारे आहे. शेतकरी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करीत असताना निसर्गाचा हा प्रघात झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच खचले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात नुकसानग्रस्त फळबागांचे सर्व्हेक्षणच झाले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने हा आरोप फेटाळला आहे. तथापि नेमक्या कुठल्या बागांचे सर्व्हेक्षण झाले आणि कुठल्या बागा सुटल्या, हे कोडेच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. यामुळे वाळलेल्या फळबागांचे सर्व्हेक्षण न झालेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे.फळबाग लागवडीचा कल कायम राहावा म्हणून कृषी मंत्रालयाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वालाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळबागांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून हेक्टरी ६० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये फळबाग लागवड करणे आणि ठिबक सिंचनासह इतर बाबींचा समावेश आहे.शेतकऱ्यांचा थेट मंत्र्यांना फोनजिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील विलास परसराम पाटील यांची संत्राबाग करपली. त्यांच्या बागेची नोंद कृषी सहाय्यकानी केली नाही. यामुळे त्यांना हेक्टरी केवळ सहा हजार ४०० रूपयांची मदत मिळाली. फळबागेच्या मदतीला ते मुकले. जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहे. त्यामुळे पाटील यांनी थेट कृषीमंत्र्यांकडे तक्रार केली.सर्वाधिक नुकसान चंद्रपूर आणि यवतमाळमध्येगतवर्षी आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या. राज्यभरात १० हजार हेक्टरवरील पीक खरडून गेले. यात सर्वाधिक नुकसान चंद्रपूरमध्ये झाले. या जिल्ह्यात तब्बल चार हजार ४१० हेक्टर शेतजमीन खरडून गेली. यवतमाळमध्ये तीन हजार ९९८ हेक्टरचे नुकसान झाले. या ठिकाणी खडक उघडा पडला. ही शेत जमीन दुरूस्त होणे अवघड आहे. तेथे पीक येणार नाही. ही शेती आता बंजर होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती