शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अतिवृष्टीमुळे पीक गेले, कुटुंबाचं पोट भरायचं कसं? दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 11:23 IST

नापिकी, कर्जाच्‍या बोज्‍यातून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

यवतमाळ/भंडारा : अतिवृष्टीमुळे पीक गेल्याने आणि नापिकीला कंटाळून यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना माळेगाव (ता. आर्णी) येथे सोमवारी रात्री घडली. प्रेम धनू पवार (४५) असे मृताचे नाव आहे.

घटनेची माहिती माळेगाव येथील पोलीस पाटील कांबळे यांनी पाेलिसांना दिली. ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी माळेगाव येथे दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रेम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

संताराम नारायण ढवळे (७५) रा. केसलवाडा (वाघ) असे मृताचे नाव आहे. त्यांची गराडा शेतशिवारात ०.२९ हेक्टर शेत आहे. काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाले. यामुळे चिंतेत असलेल्या संतारामने मंगळवारी घरातील आड्याला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना व महसूल विभागाला देण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेती