शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अस्मानी संकटात पीक विमा कंपन्या गायब; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:30 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब, कपाशीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतशिवारात दररोज कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे.

यावर्षी बरसणारा पाऊस शेतकऱ्यांवर संकटांची मालिका घेऊन आला आहे. प्रारंभी मूग आणि उडीदाचे पीक हातातून गेले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या परिस्थितीत पाऊस थांबण्याचेही नाव घेत नाही. यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना आधार देणार होती. तत्काळ नुकसानीची २५ टक्के मदत दिली जाणार होती. ही बाब केवळ घोषणाच ठरली आहे. विमा उतरविणाऱ्या शेतकरऱ्यांना अजूनही विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा शोध लागला नाही.

गावपातळीवर दररोज नुकसानीचे पंचनामे करावे लागतील, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. दररोज नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. धुवारी आणि पावसाने कापसाचे बोंड सडले आहेत. ज्वारीचे कणीस काळे पडले आहेत. तुरीवर मर रोगाने आक्रमण केले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणार कोण, असा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाच हजार शेतकऱ्यांना फटकातीन महिन्यात पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान झाले. तर ७५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली. या ठिकाणी नव्याने पीक घेणे सध्या अवघड आहे. त्याकरिता मोठ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

दोन कोटींचे नुकसानकापूस, सोयाबीन, तूर या पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दोन कोटी २२ लाख रूपयांचा प्रस्ताव कृषी विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या तरतुदीनुसारच ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तीन महिन्यात तीन हजार हेक्टरची नोंदकृषी, महसूल आणि जिल्हा परिषद अशा तीन एजंसीजने एकत्र येत सर्व्हेक्षण केले. जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांच्या सर्व्हेक्षणात तीन हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचा यात कुठेही उल्लेख नाही. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहवाल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीला कोट्यवधीचा फटका बसला.

 

टॅग्स :agricultureशेती