शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटात पीक विमा कंपन्या गायब; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:30 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब, कपाशीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतशिवारात दररोज कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे.

यावर्षी बरसणारा पाऊस शेतकऱ्यांवर संकटांची मालिका घेऊन आला आहे. प्रारंभी मूग आणि उडीदाचे पीक हातातून गेले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या परिस्थितीत पाऊस थांबण्याचेही नाव घेत नाही. यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना आधार देणार होती. तत्काळ नुकसानीची २५ टक्के मदत दिली जाणार होती. ही बाब केवळ घोषणाच ठरली आहे. विमा उतरविणाऱ्या शेतकरऱ्यांना अजूनही विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा शोध लागला नाही.

गावपातळीवर दररोज नुकसानीचे पंचनामे करावे लागतील, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. दररोज नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. धुवारी आणि पावसाने कापसाचे बोंड सडले आहेत. ज्वारीचे कणीस काळे पडले आहेत. तुरीवर मर रोगाने आक्रमण केले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणार कोण, असा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाच हजार शेतकऱ्यांना फटकातीन महिन्यात पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान झाले. तर ७५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली. या ठिकाणी नव्याने पीक घेणे सध्या अवघड आहे. त्याकरिता मोठ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

दोन कोटींचे नुकसानकापूस, सोयाबीन, तूर या पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दोन कोटी २२ लाख रूपयांचा प्रस्ताव कृषी विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या तरतुदीनुसारच ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तीन महिन्यात तीन हजार हेक्टरची नोंदकृषी, महसूल आणि जिल्हा परिषद अशा तीन एजंसीजने एकत्र येत सर्व्हेक्षण केले. जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांच्या सर्व्हेक्षणात तीन हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचा यात कुठेही उल्लेख नाही. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहवाल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीला कोट्यवधीचा फटका बसला.

 

टॅग्स :agricultureशेती