शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पीक परिस्थिती महसूलच्या लेखी उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मधात पीक चांगली होते. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. झडी स्वरूपातील पावसाने शेत शिवार उद्ध्वस्त केले. शासनाची यंत्रणा या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना आपल्या घरात मूग आणि उडीद आणता आला नाही. सोयाबीनला कोंब फुटल्याने सोयाबीनमध्ये बि उरले नाही. कापूस ओला झाला. मोठ्या प्रमाणात पातीगळ झाली.

ठळक मुद्देनजर पैसेवारी : जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप, सारेच हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी प्रारंभापासून जिल्ह्यातील पीक परिस्थिती चिंताजनक आहे. पीक हातात येण्याच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यानंतरही महसूल विभागाने जाहीर केलेली नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली. जिल्ह्यातील २०४५ गावांची पीक पैसेवारी ६५ टक्के जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत.जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मधात पीक चांगली होते. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. झडी स्वरूपातील पावसाने शेत शिवार उद्ध्वस्त केले. शासनाची यंत्रणा या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना आपल्या घरात मूग आणि उडीद आणता आला नाही. सोयाबीनला कोंब फुटल्याने सोयाबीनमध्ये बि उरले नाही. कापूस ओला झाला. मोठ्या प्रमाणात पातीगळ झाली. ज्वारी सडत आहे. तिळ सडत आहे. तूर वाळत आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत महसूल प्रशासनाने पीक पैसेवारी जाहीर केली.सर्वांच्या डोळ्यांसमक्ष पीक उद्ध्वस्त होताना शेतकरी पाहत आहे. मग अशा स्थितीत महसूल विभागाच्या यंत्रणेनेने पीक उत्तम असल्याचा निर्वाळा कसा दिला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाची मालिका शेतकऱ्यांना त्रासून सोडत असताना प्रशासन मात्र कागदावर रेघोट्या मारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जाणकार व्यक्त करीत आहे.अहवाल वस्तुस्थितीला धरून नाहीपिकांच्या स्थितीचे तीन अहवाल सादर होतात. त्यातला पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे. यात जिल्ह्याची पीक परिस्थिती ६५ टक्के आहे. ५० टक्क्याच्या वर पैसेवारी येणे म्हणजे पीक स्थिती उत्तम, असा निष्कर्ष काढला जातो. हा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.अशी आहे पीक पैसेवारीयवतमाळ ६५ टक्के, कळंब ६७, बाभूळगाव ६८, आर्णी ६२, दारव्हा ६४, दिग्रस ६५, नेर ६३, पुदस ६५, उमरखेड ६७, महागाव ६२, केळापूर ६४, घाटंजी ६५, राळेगाव ६६, वणी ६७, मारेगाव ६५ तर झरीची पैसेवारी ६३ टक्के जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी