शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

इंदिरा आवास योजनेचे निकष बदलले

By admin | Updated: August 18, 2016 01:18 IST

यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जायचा. परंतु आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे.

नावातही बदल : लाभाच्या रकमेत २५ हजारांची वाढ, बीडीओंच्या अध्यक्षतेत समिती गजानन अक्कलवार कळंब यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जायचा. परंतु आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे योजनेच्या निकषातही बदल करण्यात आले आहे. सदर योजनेमध्ये पूर्वी ९५ हजार रुपये दिले जायचे. आता एक लाख २० हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय संबंधित लाभार्थ्याला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत अभियानांतर्गतसुध्दा लाभ दिला जाणार आहे. यापूर्वी २०१५-१६ पर्यंत लाभार्थी निवडीकरिता सन २००२ च्या दारीद्र्य रेषेखालील यादीचा वापर केला जायचा. परंतु आता २०१६-१७ पासून सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणणा-२०११ च्या याद्यीनुसार लाभ दिला जाणार आहे. सर्वांच्या माहितीसाठी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची यादी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या याद्या ग्रामपंचायती व ग्रामसभेसमोर प्रसिध्द करण्यासाठी तसेच त्या यादीवर नागरिकांचे आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कालबध्द कार्यक्रम जिल्हा परिषद स्तरावरून आखून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त याद्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करून याद्यातील अपात्र कुटुंबांची नावे वगळणे, पात्र कुटुंबांची नावे समाविष्ट करणे याबाबत ग्रामसभेमध्ये प्रत्यक्ष निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामसभेकरिता पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त यादीच्या संदर्भात किंवा ग्रामसभेने मंजूर केलेल्या याद्यावर नागरिकांना आक्षेप घ्यावयाचे असल्यास त्यांनी आपले आक्षेप पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करायचे आहे. पंचायत समिती स्तरावर प्राप्त हरकती, दावे निकाली काढण्याकरिता गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली आहे. तसेच तालुका स्तरीय समितीने दिलेल्या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. भविष्यात घरकूल योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हीच यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये लाभार्थ्याची निवड होईल तसेच कोणी वगळले जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यादीतून कोणी वगळले गेले असल्यास नावाचा समावेश करण्यासाठी तालुका स्तरीय समितीकडे विहित मुदतीत आक्षेप, दावा, हरकत. अपील, तक्रार द्यावी लागणार नाही. सदर योजनेचा लाभ घेताना नागरिकांनी जागृत असणे गरजेचे आहे. यादीविषयी कुणाला तक्रार असल्यास तातडीने संपर्क करावा. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेसाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहीती गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे यांनी दिली.