शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

इंदिरा आवास योजनेचे निकष बदलले

By admin | Updated: August 18, 2016 01:18 IST

यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जायचा. परंतु आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे.

नावातही बदल : लाभाच्या रकमेत २५ हजारांची वाढ, बीडीओंच्या अध्यक्षतेत समिती गजानन अक्कलवार कळंब यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जायचा. परंतु आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे योजनेच्या निकषातही बदल करण्यात आले आहे. सदर योजनेमध्ये पूर्वी ९५ हजार रुपये दिले जायचे. आता एक लाख २० हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय संबंधित लाभार्थ्याला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत अभियानांतर्गतसुध्दा लाभ दिला जाणार आहे. यापूर्वी २०१५-१६ पर्यंत लाभार्थी निवडीकरिता सन २००२ च्या दारीद्र्य रेषेखालील यादीचा वापर केला जायचा. परंतु आता २०१६-१७ पासून सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणणा-२०११ च्या याद्यीनुसार लाभ दिला जाणार आहे. सर्वांच्या माहितीसाठी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची यादी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या याद्या ग्रामपंचायती व ग्रामसभेसमोर प्रसिध्द करण्यासाठी तसेच त्या यादीवर नागरिकांचे आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कालबध्द कार्यक्रम जिल्हा परिषद स्तरावरून आखून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त याद्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करून याद्यातील अपात्र कुटुंबांची नावे वगळणे, पात्र कुटुंबांची नावे समाविष्ट करणे याबाबत ग्रामसभेमध्ये प्रत्यक्ष निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामसभेकरिता पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त यादीच्या संदर्भात किंवा ग्रामसभेने मंजूर केलेल्या याद्यावर नागरिकांना आक्षेप घ्यावयाचे असल्यास त्यांनी आपले आक्षेप पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करायचे आहे. पंचायत समिती स्तरावर प्राप्त हरकती, दावे निकाली काढण्याकरिता गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली आहे. तसेच तालुका स्तरीय समितीने दिलेल्या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. भविष्यात घरकूल योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हीच यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये लाभार्थ्याची निवड होईल तसेच कोणी वगळले जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यादीतून कोणी वगळले गेले असल्यास नावाचा समावेश करण्यासाठी तालुका स्तरीय समितीकडे विहित मुदतीत आक्षेप, दावा, हरकत. अपील, तक्रार द्यावी लागणार नाही. सदर योजनेचा लाभ घेताना नागरिकांनी जागृत असणे गरजेचे आहे. यादीविषयी कुणाला तक्रार असल्यास तातडीने संपर्क करावा. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेसाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहीती गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे यांनी दिली.