शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

इंदिरा आवास योजनेचे निकष बदलले

By admin | Updated: August 18, 2016 01:18 IST

यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जायचा. परंतु आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे.

नावातही बदल : लाभाच्या रकमेत २५ हजारांची वाढ, बीडीओंच्या अध्यक्षतेत समिती गजानन अक्कलवार कळंब यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जायचा. परंतु आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे योजनेच्या निकषातही बदल करण्यात आले आहे. सदर योजनेमध्ये पूर्वी ९५ हजार रुपये दिले जायचे. आता एक लाख २० हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय संबंधित लाभार्थ्याला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत अभियानांतर्गतसुध्दा लाभ दिला जाणार आहे. यापूर्वी २०१५-१६ पर्यंत लाभार्थी निवडीकरिता सन २००२ च्या दारीद्र्य रेषेखालील यादीचा वापर केला जायचा. परंतु आता २०१६-१७ पासून सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणणा-२०११ च्या याद्यीनुसार लाभ दिला जाणार आहे. सर्वांच्या माहितीसाठी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची यादी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या याद्या ग्रामपंचायती व ग्रामसभेसमोर प्रसिध्द करण्यासाठी तसेच त्या यादीवर नागरिकांचे आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कालबध्द कार्यक्रम जिल्हा परिषद स्तरावरून आखून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त याद्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करून याद्यातील अपात्र कुटुंबांची नावे वगळणे, पात्र कुटुंबांची नावे समाविष्ट करणे याबाबत ग्रामसभेमध्ये प्रत्यक्ष निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामसभेकरिता पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त यादीच्या संदर्भात किंवा ग्रामसभेने मंजूर केलेल्या याद्यावर नागरिकांना आक्षेप घ्यावयाचे असल्यास त्यांनी आपले आक्षेप पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करायचे आहे. पंचायत समिती स्तरावर प्राप्त हरकती, दावे निकाली काढण्याकरिता गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली आहे. तसेच तालुका स्तरीय समितीने दिलेल्या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. भविष्यात घरकूल योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हीच यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये लाभार्थ्याची निवड होईल तसेच कोणी वगळले जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यादीतून कोणी वगळले गेले असल्यास नावाचा समावेश करण्यासाठी तालुका स्तरीय समितीकडे विहित मुदतीत आक्षेप, दावा, हरकत. अपील, तक्रार द्यावी लागणार नाही. सदर योजनेचा लाभ घेताना नागरिकांनी जागृत असणे गरजेचे आहे. यादीविषयी कुणाला तक्रार असल्यास तातडीने संपर्क करावा. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेसाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहीती गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे यांनी दिली.