शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

चार दिवसांत कपाशी, सोयाबीन फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:22 IST

गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकºयांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : आर्णी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे.गेल्यावर्षीच्या संकटातून सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी आटोपली. अनेक शेतात बियाणे अंकुरले. या पिकाला शेतकरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहे. मात्र आता कपाशीवर वाणीने आक्रमण केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. गेल्या चार दिवसात १०० एकराच्यावरील क्षेत्रातील कपाशी वाणीने फस्त केली आहे. पावसाअभावी वाणीने कपाशीला पोखोरणे सुरू केले आहे. अंकुरलेल्या कपाशीवर ही कीड आक्रमण करीत आहे. अचानक शेतात आलेल्या वाणीमुळे शेतकरी धास्तावले आहे. गेल्या चार दिवसांपासून कपाशी उध्वस्त होत आहे.कपाशीसोबतच वाणीने जवळपास १७ एकरामधील सोयाबीन गिळंकृत केले आहे. जमिनीत पेरलेले बियाणे ही कीड गिळंकृत करीत आहे. त्यामुळे सोयाबीण उवण होतच नाही. बियाणे उगवले तर वाणीने पुन्हा ते फस्त करते. यामुळे १७ एकरातील सोयाबीन उध्वस्त झाले आहे. अंकुरलेल्या सोयाबीनवर दहा ते १५ कीटक एकत्रितपणे हल्ला करतात. यावर कोणत्याही औषध फवारणीचा फरक परत नाही. दुबार पेरणी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.१२ वर्षांपूर्वी केले होते आक्रमण१२ वर्षांपूर्वी २००५ मध्ये तालुक्यातील साकूर परिसरात वाणीने पिकावर आक्रमण केले होते, असे वृद्ध शेतकरी मोरेश्वर पाटील, विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. त्यावर्षी एका रात्रीतून पीक उध्वस्त झाले होते. तिच अवस्था यावर्षी दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांवर दुपार पेरणीचे संकट घोंगावत असल्याचे साकूरचे सरपंच बाबाराव चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी